सुधिर मांडे - नर्मदा सरीतां श्रेष्ठा,महादेवस्य वल्लभा – नर्मदेहर
शूलपाणि झाड़ी से जानेवाले पैदल मार्ग
सुधिर मांडे - नर्मदा सरीतां श्रेष्ठा,महादेवस्य वल्लभा – नर्मदेहर
नर्मदेहर ....योगायोग म्हणु की मैय्याचे बोलावणे म्हणु....शासकीय सेवेमधुन निव्रत्ती नंतरचे आरामातआयुष्य जगत होतो 21-2-2017 सकाळी सकाळी जुने मित्र श्री प्रदीप डवालकर यांचा फ़ोन , उद्या सकाळी औ,बाद हून नीघतोय गुजराथमधे एका आश्रमात चार दिवसांसाठी जायचे , सकाळीच तयार होऊन मालेगाव पर्यंत या ... ok त्यानुसार 9.00 ला मालेगावला पोचलो गाडीत श्री रंजलकर , सालुंके ,चव्हाण हे होते मी पाचवा सामील सर्वजण एकाच कार्यालयअंतर्गत होतो 5-6तासात गुजरात मधील माँगरोल येथे तपोवन आश्रम येथे पोचलो 3-4 दिवस राहुन जमेल तशी सेवा केली ,सायंकाळी मैया किनारी जाऊन बसायचे....बालपण आठवत होत,गोदावरीमातेच्या कुशीत एका छोट्या खेड्यात घालवलेल बालपणआठवत होते ....सायंकाळी नर्मदाआरती ,ते मंदिरातील घंटेचे आवाज ऐकत बसत होतो अंधार झाल्यावर मगरीच्या भीतीमुळे आश्रमात परतायचो ...बस ..मैयाची ओढ लागली हेच मैयाच प्रथम दर्शन याकाळात मैयाविषयी बरीच माहिती मिळाली होती ...आश्रमात गुरुवार रोजी रात्री पालखीसोहळा असतो रात्री1-00 ला झाला ..खिडकीवाले बाबांचे दर्शन घेतले ..सकाळीच उठुन प्रातीर्वीधी आटोपून परत निघताना मैयाच दर्शन घेतले प्रार्थना केली .....मैय्या परत बोलाव मला .....
.... नर्मदेहर .... ....
आश्रमातुन परत आल्यावर स्वस्थ वाटतच नव्हतं सारखं नर्मदातीरी जाण्याची इच्छा होत होती एका नातेवाईका कडे गेलो असता समोरच ..जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर, नावाचे पुस्तक होत ....त्यांना तुम्ही नंतर वाचा ' आधी मला वाचुद्या,अस म्हणालो . माझी अधीरता पाहुन त्यांनाही हसु आले .... पुस्तक घेऊन घरी आलो ... 250 पानाचे पुस्तक रात्रीतुन वाचुन टाकले , अस्वस्थता आणखी वाढली ... काहीच दुसर् करावस वाटत नव्हत. .... एका समारंभात तिन्ही मुली जावई जमले असता मी नर्मदा परिक्रमेस जाण्याचा विषय काढला .....सर्वांनी एकमताने फेटाळला हे सांगणे नकोच .... पत्नी मात्र दचकली होती तिला माझा स्वभाव माहिती होता.... फीरायची माझी आवड ,डोंगर दऱ्यामधुन एकट्याने फिरायचे, जुन्या वास्तु , जुनी मंदीरे याविषयी माझ्या मनात असलेले आकर्षण तिला परिचित होत आणी इथे तर मैय्याचे किनाऱ्यावर खजीनाच होता की ... बायकोने लगेच ट्र्क बदलला ' मी पण बरोबर येणार, माझी बोलती बंद ... कारण ती हे सगळे सहन करू शकतच नव्हती म्हणजे ती थकेल तेथुन मला परत यावेच लागणार . असे डाव प्रतीडाव सुरु ,मग पर्याय निघाला बसद्वारे परिक्रमा करणे , त्याप्रमाणे एप्रिल2017 मधे तिला बसपरिक्रमा करवून आणले ...तरीही एक अट कायम" कोणतरी ओळखीचे पाहीजे, कोणास न्यावे? अखेर फेसबुक कामी आले FB फ्रेंड श्री रवींद्रजी भीसे व अशोक बाजारे यांचा परीचय झाला त्यांचीही परिक्रमा करण्याची इच्छा होती अखेर सर्व ठरले , बायको ओंकारेश्वर पर्यंत सोडवायला येणार हे ही ठरले मी सर्व अटी मान्य करत होतो . अखेर जाण्याचा दिवस निश्चित झाला ..त्या कालावधीत वासन्ती चितळे यांचे " नर्मदा मैय्याच्या कडेवर" हेपुस्तक वाचुन काढले व प्रतिभाताई व सुधीरजी चितळे यांचे परिक्रमा ऑडीओ ऐकले ... सर्व तयारी पुर्ण झाली होती .... तत्पूर्वी गुरुमहाराज व आईचे आशीर्वाद घ्यायचे होते ...... त्यानुसार जालना येथे श्री गुरु शेषनारायण महाराज भागवत यांचे दर्शन घेण्यास गेलो त्यांनी सर्व ऐकून घेतले व ठीक आहे . "जास्त खोलात जावुन कुणाची चौकशी करू नका व आती धाडस टाळा " बहुतेक माझ्या स्वभावानुसार सांगितले असो ,जालनाहून परत निघालो वाटेत औबादेस आईकडे थांबलो तीलासर्व माहीत होत , भावांनी सर्व कानांवर घातले होते....आईला कौतुक वाटत होत, स्वतःला सांभाळ म्हणुन डोक्यावर हात फिरवला . सगळी तयारी झाली होती , जाण्याच्या दिवसाची वाट पहात बसलो.
नर्मदेहर ......
दि.5-11-2017 रात्री 9-00 ला नाशिकहून इंदौर साठी रवाना झालो , सर्व परिवार निरोप देण्यास हजर होता सर्वांचे चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती, बायको मात्र खुप केवीलवानी झाली होती , मी ही चेहरा लपवत होतो ... सकाळी सात च्या सुमारास आम्ही इंदौरला पोचलो दूसरी बस पकडून ओंकारेश्वरला 11-00 ला श्री गजानन महाराज आश्रमात , परिक्रमावासी म्हणुन नोंदणी केली महंत अनिलदासजी महाराज(1008) यांचे कडे जाऊन परिक्रमा प्रमाणपत्र घेतले, श्री रवींद्रजी भीसे(नाना) व अशोक बाजारे बरोबर होते सर्व आवश्यक कागदपत्रे तयारकरून घेण्यास सायंकाळचे 5-00 वाजले नंतर आश्रमात येवुन सौभाग्यवतीस बरोबर घेवुन श्री ओँकारेश्वर , ममलेश्वराचे दर्शन घेतले गौमूखघाटावर चार जर्मन मुली अग्निहोत्र साधना करत होत्या व आमची सौ. कौतुकाने न्याहाळत होती तेक्षण टिपून घेतले , पुढील काही दिवस मी तिच्या सोबत नसणार होतो , परत येईल किंवा कश्या अवस्थेत येईल, किंवा येणारच नाही शाश्वती कसलीच नव्हती ...तिची मनस्थिती खुप हळवी झाली होती . बराच वेळ मैयाचे किनाऱ्यावर आम्ही निशब्द बसुन होतो . अंधार झाल्यावर उठुन आश्रमात आलो ...... गजाननमहाराजांच दर्शन घेतले मुकपणे जेवण करून अंथरुनावर आडवे झालो ,अनीलदास महाराजांनी सकाळी7. 00 ला संकल्पसिध्दिसाठी गौमुख घाटावर हजर होण्यास सांगितले होते .... विचार करता करता झोप केव्हा लागली समजले नाही....
नर्मदेहर ......
सकाळी7.00 ला गौमुख घाटावर गेलो पु.अनीलदासजी लगेच आले क्षोर कर्म करून मैया मधे स्नान करून पूजेसाठी बसलो,तासाभरातआटोपले कुमारी पुजन केले, परीक्रमेचे नियम समजावून सांगितले एका बाटलीत मैयाचे पाणी भरून दिले . ती बाटली,काठी व हाताला यज्ञकंकण बांधून परिक्रमेस निघन्याची अनुमति दिली पाठीवर सॅक गळ्यात मैयाची बाटली पूजेच साहित्य असलेली शबनम एका हातात काठी दुसऱ्या हाती पाण्याचा कमंडलू परीक्रमेस निघन्यास सज्ज झालो... नर्मदेहर .म्हणुन मी , भीसेनाना , बाजारे तिघांनी पाऊल उचललं . श्रीरंग अवधूत स्वामीन्चे शब्द मनात उमटत होते.. अनाथांच्या नाथा लाज तुझे हाता पुनःपुनःमाथा चरणी ठेवों ..न जाणे मी आन त्वद्यशवर्णन श्यास्र व्याकरण नेणो कधी ..न केले श्रवण कोठोनी मनन न तपश्चरण काय दावू ... नीरस हे बोल बोबडे बेताल वाजवीतो गाल तुज पुढे ... तुची बाप माई गोड करुनी घेई पैलपार नेई बुडो नेदी ... न मागे मी आन वैभवसाधन एक वेळ म्हण ' रंग माझा' मन पुर्ण निशब्द , रिक्त झाले होते कुठुन जायचे अनीलदासजीनाच विचारले ... आज पहीलाच दिवस रोडनेच जावे .... नंतर मैया आहेच सोबतीला , त्यांचा आदेश घेवुन नर्मदेहर म्हणुन पाय उचलला रस्त्यातच बस स्थानक होत तेथे सौ.ला नाश्ता खायला लावला व इंदौर च्या बसमधे बसवले व आम्ही आमच्या मार्गास रवाना झालो ..... ..... मोरटक्का हे ठिकाण 15-16 km. डांबरी सड़क पण हाल झाले , अस 20-22 किलोचा बोजा पाठीवर घेऊन चालणे कसरत चालु होती फ़ोन वाजला अनोळखी नंबर होता ... सरळ प्रश्नच विचारला ' निघालात काय , हो म्हणताच ठीक आहे या मोरटक्क्याला वाट पहातोय. कोण बोलत विचारले प्रकाश जाधव अस उत्तर व फ़ोन कट झाला आश्चर्यच मी तर यांना ओळखत नाही आणी हे माझी मोरटक्क्याला वाट पहातात , चला मैया काळजी घेत आहे , उन्हाचात्रास ,पायाला फोड यायला सुरवात झाली होती नाना व मी चालतच होतो बाजारे मागे रहात होते आमच्या तीघात ते वयाने वडील होते त्यांना येऊ देण्याचे निमित्ताने आम्हीही थांबत होतो . साडेतीन चारचे सुमारास अखेर पोचलो 15km साठी सात तास लागले होते, सद्गुरूसेवासद्न आश्रम शोधून हातपाय धुवुन आसन लावल (सॅक ठेवून बसायला अंथरुन ठेवणे) आरामात बसलो तेथे नर्मदेहर या व्हाट्सअप ग्रुप वरील अरविंद लेले यांची भेट झाली व गप्पा रंगल्या थोड्यावेळानं प्रकाशभाऊ जाधव आले ,त्यांचे सोबत एक स्वामीजी होते, तेही आमच्यात सामील झाले प्रत्यक्ष कुणाला ओळखत नव्हतो ग्रुप वरची ओळख. आश्रमातील माताराम व दांपत्य परिक्रमामधे होत त्या माताराम यांनी जेवणाची तयारी केली आम्ही सर्वांनी जेवणं केली , थोडा सत्संग करू अशी विनंती प्रकाशभाऊँचे बरोबर असलेले स्वामी यांना केली (स्वामींनी चार गायत्री पुरश्चरण केलेले होते) त्यांनी आनंदाने संमतीदिली ते बोलत असता अशोकजी बाजारे यांनी काही क्रॉस प्रश्न विचारले ते मला आवडल नाही पण गप्प बसलो. स्वामींनीही आवरते घेतले ....लगेच अंथरुनावर गेलो फ़ोन वाजला ...लहान भाऊ संजयचा होता त्याचेशी बोलुन झोपी गेलो ....
...... ....नर्मदेहर ....... .....( 2 )
प्रातःकाली उठून सर्व आटोपून मैया पुजन आरती करून पु. नानामहाराजांचे दर्शन घेऊन 'नर्मदेहर' केले ,6.30 ला निघालो. प्रकाशभाऊ,लेलेजी,स्वामीजी आम्हांस रस्ता दाखवीन्यास आले दीडkm पर्यंत ,त्यांचा निरोप घेवुन मैया किनाऱ्याने जात होतो काही वेळ चालल्यानंतर एक आठ नऊ वर्षाची एकमैया समोर होती तीने किनाऱ्यापासून वरच्या बाजूने जाण्यास सांगितले तीला बिस्किटपुडा, दक्षिणा देऊन वरच्या बाजूने निघालो ओढे नाले चिखल झाड़ी खड्डे पार करत कटारगावी धरमदास महाराज यांचे आश्रमात थोडे थांबुन चहा घेतला,पुढं निघालो . अलीबुजुर्ग,टोकसर ही गावं ओलांडून गौमुख आश्रम पर्यंत पोचलो...अशोक बाजारेजी थकत होते त्यांचेसाठी थांबणे भाग होते गौमुख घाट आश्रम येथे गौतमेश्वरमहादेवाचे सुंदर मंदीर होत . गौमुखबावड़ी नांवाची विहीर छान होती सायंकाळचे सहा वाजले होते. मैयाची आरती करून भोजनकरण्यास गेलो आज 22 km चा टप्पा पार केला
नर्मदेहर...(3) ....
गौमुख घाटआश्रमातील प्रसन्न सकाळ अनूभवल्या नंतर प्रसन्न चीत्ताने आरती,पुजन केले बिनादुधाचा चहा मिळाला,त्यात चहा नसेलच तुळशी,पुदिना,अदरक,गवतीचहा याचा जास्त स्वाद होता, कोठेही चहाघेण्यासाठी आम्हास आमचा ग्लास काढावा लागे , स्टीलचा ग्लास भरून चहा, सकाळची थंडी ,जंगलभागात आश्रम , अवर्णनीय... सात वाजता गौमूखघाटास 'नर्मदेहर' केल व विचारत विचारत निघालो सांगणारे श्रध्देने सांगत पणआम्हांला गावांची नावे लक्षातच रहात नसत , असो. पीतपूर गांवात एका घरातून आवाज आला....बाबाजी चाय पी के जाओ लगेच थांबलो नाही कशालाच म्हणायचे नाही , आणी चहा आवश्यक होताच ( पुढे काही वेळ दिवसातून 20-20 वेळ चहा पीलो तर कधी एक कपासाठी तरसाव लागल) शिवकरनजी यांचे घरी चहासाठी बसलो ,ग्रहस्थ आम्हांला बसवून मुझे जरा कामहै . अस सांगून कीक मारून निघून गेला काही वेळानं चहा मिळाला , परत रस्त्यास लागलो . रस्त्यात आज विश्वानंद सरस्वती हे सन्यासी भेटले उंच पूरा लांबलांब ढान्गा टाकत चाललेले विचारपूस झाली ,बरोबर निघालो .... चालताना कुणी कुणाशी बोलायचं नाही प्रत्येकाने नर्मदेहर जप करतच चालायचे ,रस्ता विशेष ठीक नव्हता दुपारी एक दीड चे सुमारास रावेरखेडी ...(श्रीमंत बाजीराव पेशवे यांची समाधी) येथे पोचलो सदावर्त मिळाले , नाना व स्वामीजी यांना स्वयंपाक येत नव्हता बाजारे व मी तयारीला लागलो लाकडेलावून चुली पेटवील्या ,ठिक्कर(कणकेचे गोळे नलाटता हातावरच थापने व विस्तवावर भाजने ... तवा,पोलपात लाटणे यांचकाम नाही) खिचड़ीच पातेल् दुसऱ्या चुलीवर , भाजीला नव्हत वरण करायचा कंटाळा आला तिखट मीठ, गुळाचा खड़ा याबरोबर भागविले , जेवण आटोपून श्रीमन्तान्चे समाधी दर्शन घेतले , कोकणाचे ब्राम्हण, कुठं ते पुणे ...अन कुठं हे जंगल निवडले ....येथील लोक त्यांना पूना के महाराज ' अस म्हणतात विचार करीत पुढील मार्गाला लागलो. सायं साडेसहापर्यंत चालत होतो मर्दाना या गांवात हरीहर कुटी येथे लक्ष्मणदास महाराज यांचे आश्रमात थांबलो ,हातपाय धुवून सायंआरती पूजन आटोपून भोजनाची वाट पहातबसलो, ....आठ वाजता जेवण होऊन अंथरुनावर आडवा झालो.
नर्मदेहर ...(4)
रात्री आश्रमात इतर 4-5 परिक्रमावासी (MP मधील) होते आश्रमात अडचण होती , पहाटे साडेतीन पासून गडबड सुरु झाली होती , आम्ही चौघं (बंगलोरचे स्वामीजी आमच्यात होते) होतो स्नानासाठी नंबर होते आम्ही रस्त्याने उरकून घेऊ असे ठरवून निघालो , आठ km. वर तेली भट्याण हे सीयाराम बाबांचे आश्रम ठिकाण होते तिथं जाण्यास निघालो . सियाराम बाबांविषयी खुप काही ऐकलेल होत , महान तपस्वी म्हणुन पुर्ण नर्मदाखंड त्यांच्या विषयी आदर,श्रध्दायुक्त भावना व्यक्त करत असतो . सीयारामबाबा 1948 च्या दरम्यान येथे आलेहोते मैय्याचे तीरावर सूर्योदय ते सूर्यास्त ..एका पायावर उभे राहुन रामायण वाचत ही तपश्चर्या त्यांनी सलग 20 वर्ष केली होती आज त्यांच वय 105 ते 107 वर्ष सांगितले जाते. मागील चार पाच वर्ष पर्यंत आश्रमात येणाऱ्या परिक्रमावासीन्ची ते स्वतः सेवा करत, प्रत्येकाला स्वहस्ते चहा बिस्किट देत ,आस्थेने चौकशी करत आता तब्येतीमुळे गाववाले त्यांना सक्तीने आराम करायला लावतात ,साधारण अकरा चे दरम्यान आम्ही पोचलो .स्नान ,मैयापुजन, आरती आटोपून आम्ही बाबांचे दर्शनास गेलो ...ते महान व्यक्तिमत्व 20फूट बाय15फूटाच्या खोलीत एका साधारण पलंगावर पाय खाली सोडुन बसलेले होते , अंगावर लंगोटीशिवाय दुसर् कापड नव्हते थंडी पासुन रक्षण व्हावे म्हणून पायाजवळ एक वातिचा स्टोव्ह जळत होता ... अधून मधून पाय हालवला की चटका बसुन जखम व्हायची त्यांना तेही समजत नसे...कुणीतरी सेवेकरी जखमेस औषध लावुन पट्टी बांधत ...पणबाबा नदीवर जातांना तेकाढून टाकतात मैय्याच पाणी हेच माझ दवापाणी म्हणतात , आम्ही दर्शन घेतले मी फोटो घ्यायची परवानगी घेवुन त्यांचे पायाशी बसुन फोटॊ घेतले, त्यानी आम्हास अगरबत्ती,वाती, साखर, चहापावडर, शेवमूरमुरेची पुडी ई. दिले व लवकरच भोजन तयार होईल जेवुन पुढे जावे , परत एकदा नमस्कार करून आम्ही बाहेर आलो मैया जवळ झाडाखाली बसलो ...काही वेळात बाबा मैया कडे जाताना दिसले.... बाबा मैया मधे जाऊन हातातला कमंडलू पाया जवळ ठेवला दुसऱ्या हातातला बिस्किटपुडा फोडून पाण्यातील माश्यांना बिस्किट देत होते मासे त्यांचे अवतीभवती गलका करीत होते ,मी मोबाईलमधे vdo घेत होतो, पुडा संपला बाबांनी आपला कमंडलू मैयाचे रेतीने घासला स्वच्छ पाण्याने भरून घेतला .आश्रमाकडे निघुन गेले ..... आम्हांला भानावर यायला वेळ लागला ...आश्रमात येवुन भोजन आटोपल्यानंतर पुढीलमार्गास लागलो , रस्ता जरा अवघड होताच पण काही वाटलं नाही अशोक बाजारे हळु चालत होते त्याची काळजी करत , रस्ता चुकत परत चक्कर खावून योग्य रस्त्यावर येत कसे तरी असावद या गावी सायं. सात ला पोचलो गावातच शिवमंदिर होत तेथे थांबलो. आणखी काही परिक्रमावासी पण आले जवळपास17-18 जण होते सदावर्त मिळाले ते सर्व जण स्वयंपाकास लागले मी माझी वैयक्तिक युक्ती वापरून आम्हा चौघांचि जेवणाची एका घरी सोय करून घेतली , पुजन,आरती आटोपल्यानंतर आमचेजेवण मंदिरातच आले , गावातील मंडळीसोबतगप्पा मारत जेवण झालं , ते असावद नावाचे गावं ...भगवान परशुराम यांचं जन्मस्थळ ,माता रेणुकेच माहेर असल्याच गाववाल्यांनी सांगितले....बाहेर मोठ मंदिर असल्याची माहिती दिली ...सकाळी जाताना दर्शन घेण्याच ठरवून निद्रादेवीचे अधीन झालो
नर्मदेे हर ( 5 ) .......
असावदमुक्कामी रात्री एक परिक्रमावासी देशपांडे काका वय 74-75 थकले व जखमी झालेले होते त्यांची सेवा केली होती , ते आमच्या बरोबरच निघाले .. निघताना रेणुका मातेच दर्शन घेतले अमलथा गावाकडे जाताना रस्ता चुकला ....तीन चार km चा मोठा चक्कर पडला रस्ता खुरटी झाडं व खडकाळ होता दमणुक होत होती भूल भुलैय्या झाल्याप्रमाणे आम्ही चालत होतो रस्ता विचारणा करण्यास चिटपाखरु दिसत नव्हते दोन अडीच तासाने एक गाव लागले तिथं थोडं थांबून पाणी पीलौ रस्ता विचारून पुढं...अमलथा ओलांडून लेपाघाट मार्गे वेदासंगम येथे पोचलो रस्ता चढ़उतार ओबडधोबड थकवनारा होता.. वेदासंगम येथुंन बाजारे यांनी परत घरी जाण्याचा निर्णय घेतला आमच्या हळु चाल्ण्यामुळे बंगळूरवाले स्वामी आम्हांस सोडुन पुढे निघुन गेले. भोजन घेवुन पुढे निघालो मैया किनाऱ्याने रस्ता खुप अवघड होता.तरीही तिघं निघालो एक नदी आडवी आली पुढे ती मैय्याला मिळाली होती ती ओलांडून जायचं होत एकदोन पोरं पलीकडे बसले होते त्यांनाच विचारले या म्हणाले , पण आमची हिम्मत होत नव्हती .पाण्याचा अंदाज नव्हता, मला पोहता येत होतं पण भीसे व देशपांडेकाकाच काय , पाण्यात मगर असण्याची शक्यता पण होतीच, नदीकाठाने थोडे वर जाऊ असेठरले , वर चढून नदीकाठाने निघालो एक दीड km नंतर एका ठिकाणी नदीपात्र मोठ होतं पण खाली उतरायची अडचण आम्ही 30-35 फुट उंचीवर होतो दिवस कलला होता तेथून लवकर नीघने आवश्यक होतं थोडे पुढं जाव ? .... तेथूनच उतरावे अस ठरले , मी पुढं झालो मागे नाना त्यांचे मागे काका .... क्षणात माझ्या पाया खालचा दगड घसरला मी आडवाझालो सॅक,काठी, कमंडलू इतस्त: फेकले गेले ,जास्त विचार करायला वेळ नव्हता वेगवेगळ्या झुडुपाला वस्तु अडकल्या , काका व नानाच् सर्व सामान माझ्या कडे घेतले व त्यांना रिकामे खाली बसत उतरावे अस सांगितले त्याप्रमाणे ते दोघं ख़ाली गेले .मी वर्तून त्यांचे सामान योग्य दिशेनं ख़ाली टाकले , माझ सामान गोळा करून तेही खाली टाकले व नंतर मी बसत बसत उतरलो ...कोणालाही मार वगैरे लागला नव्हता, सर्व सामान गोळा करून पलीकडे गेलो अंधार होऊ लागला होता आम्ही झपझपा चालत होतो उजव्या हाताला मैया वहात होती . एका झाडीत लाईटचमकत होता .... नर्मदेहर अस ओरडुनच हाक दिली तिकडून आवाज आला ...आजाव ऊपर ..आवो .. वर गेलो साधु बाबा वर उभे होते तरुणच होते बाजूला एक पोपटाच्या पिंजरयाचे सारखा 15-20 फुटाचा पिंजरा होता ... साधूंनी आम्हांस आश्रमात घेतले, अंधार झालेला होता मोकळ्या जागेवर उघड्यावरच आसन लावल पूजा आरती आटोपल्यानंतर साधूंनी आमची चौकशी केली ,एक तासाने भोजनप्रसादी बनेगी अस म्हणुन तो झोपडीत गेला खाली मैय्या वहात असल्याचा जोरदार आवाजयेत होता, नाना व काका आराम करत होते मी साधूला मदत करण्यास गेलो .... परीक्क्मा क्यो करताहो मदत करनाहै तो यही रहे जाओ ..अस म्हणुन मदत नाकारली, मग इतर विषयी गप्पा सुरू झाल्या तो मान्डव्यऋषींचा आश्रम होता. थोड्यावेळातच भोजन सिध्द झाले,डालबाटी तयार होती आम्ही जेवणं आटोपून निघालो , एव्हाना साधुंशी परिचय वाढला होता हळूच विचारले हा एवढा मोठा पिंजरा कशासाठी ..... वहाँ नाग नागिनका जोड़ा रहता ....पिछले कुछ दिनसे नाग दिखता नही अकेली नागीन भटकती. हादरून गेलो ...इथे झोपायच,उघड्यावर तसाच आन्थरुनावर गेलो नाना काका यांना काहीच सांगितले नाही , पडून राहीलो ....कधी तरी झोप लागली.
नर्मदेहर ......... ( 6 )
प्रातर्विधी, आटोपुन ६.३० वा मांडव्य ऋषींच्या आश्रमातुन मैया किना-याने निघालो हिरव्या गालीच्यावरून चालताेय आसे वाटत होते, शालीवाहन येथे पोहोचलो. मैयामध्ये स्नान करून पुजन आरती आटोपली, स्नान करताना पाय घसरून भीसे नाना खडकावर पडले, जास्त मार लागला नाही हे बरे झाले. थोड्यावेळ बसलो, पलिकडील तीरावर महेश्वर हे सुंदर ठिकाण व तेथील भव्य घाट, राजवाडा स्पष्ट दिसत होते, आम्ही दक्षिण तटावर होतो अंदाजे दोन हजार वर्ष पूर्व शालिवाहन राजाची राज्याची सीमा येथ पर्यंत होती ,त्याची आठवण म्हणुन मैय्याचे दक्षिण तीरावर शालिवाहन हे गाव क्षेत्र वसवले गेले होते, पलीकडे उज्जैनचा राजा विक्रमादित्य याचे राज्य... दोन्ही राजे समकालीन , दोन्ही राजे शककर्ते ...... मैयाचे उत्तरतटावर विक्रम शक व दक्षिणतटावर शालिवाहन शक ..... आणी दोन्ही महान साम्राज्यसीमाच्या रूपात मैया ...आहा..हा काय ते दिवस असतील... थोडावेळ ते दृश्य बघुन आश्रमात जाऊन शिक्का मारुन घेतला, चहा घेऊन पुढे रवाना झालो, ढालखेडा मार्गे बलगाव येथे मौनी बाबा आश्रमात जाण्याचे ठरले, दुपारचा १.३० वाजला होता, भुका लागल्या होत्या एका वीट भट्टीवर चौकशी करता आश्रम ५-६ किमी दुर आहे असे समजले देशपांडे काकांनी एका प्रजापती ( कुंभार) माताराम यांना भोजन व्यवस्था होईल का? असे विचारले त्यांनी ५-६ पोळ्या तिखट-मीठ, तेल आणुन दिले तेच आम्ही तिघांनी तिथेच वीट भट्टीवर बसुन भोजन केले व पुढे रवाना झालो. रस्त्यात एका झाडाखाली थोडी विश्रांती घेतली,व पुढे निघालो. एक टी-पाॅईंट लागला कोणत्या रस्त्याने जायचे कळत नव्हते त्यामुळे थांबलो. एक मनुष्य आला, काकांनी त्या माणसाला ढालखेडाचा रस्ता विचारला, काकांना व्यवस्थित न ऐकु आल्यामुळे त्यांनी परत विचारले तर तो माणुस रागावलाच, एक बार बोले तो समझमे नही आता है क्या? मी बाजुला थांबलेलो होतो, तो तेथुन जाताना पुटपुटला कैसे कैसे आते है परिक्रमा में... क्षणभर मनात विचार आला जर मी परिक्रमेत नसतो तर?? आणि आपण क्रोध का करतो? हा विचार पुढील प्रवासात पुरला.
ढालखेडा आेलांडुन पुढे अकबरपुरा या गावात एका गृहस्थाने चहा पिण्यास आवाज दिला, चहा पिऊन पुढे निघालो. रस्त्याने चालताना कोणीच एकमेकांशी बोलत नाही अखंड नर्मदे हर चा जप चालु होता. सायंकाळी ७ वाजता खलघाट येथे राम मंदीर आश्रमात पोहोचलो, आरती पुजन झाले, जेवण खुप छान मिळाले. आलु पराठा, आसमंतारा चटणी, कढी गोळे, तळलेली मिरची, मुळा हे सर्व होते पाेटभर जेवण करून ८.३० वाजता झोपलो..
नर्मदेहर ...( 7 )
प्रातर्विधी आटोपून सकाळी6:00 ला प्रयाण केले , थंडी भरपूर असल्यामुळे थंडपाण्याने स्नान करणे अवघड होते . त्यामुळे रस्त्याने विहीर, हॅण्डपंप, नदी शक्य असेल तिथं उरकून घेत होतो , पाय खराब होत होते पायाला आलेले फोड़ जागेवरच जिरुन ती त्वचा कडक होत होती,त्याकडे लक्षच देत नव्हतो , तरीही चाल वाढत नव्हतीच माझ्यासाठी ते काळजीच कारण होत , देशपांडेकाकाची ही दूसरी परिक्रमा होती पण ते हट्टी वआग्रहीपणा करतात ,दुपारचे जेवणाचीवेळ किंवा मुक्कामी असु तिथं बरेच परिक्रमावासी असत त्यांना सारखे काहीतरी सूचना करत,कधीकधी भांडण करत व समोरचा जास्त वैतागून बोलला की गप बसत , त्यांच्या बाजूने आम्हीही बोलावं अशीअपेक्षा ठेवत .... भीसेनाना गरीब स्वभावाचे होते स्वतःच मत कधीच मांडत नसे , मला विनाकारण वादविवाद नको होते , म्हणून मी संयम बाळगत असे, त्यामुळे काका माझ्यावर चीडचीड करत . आजही तोच प्रकार झाला होता . आम्ही सगळेच गपगप होतो. जंगल, खडकाळ ,धुळीचा असेरस्ते पारकरत चीचली गावी पोचलो पाईप स्नान उरकून आरती,पूजन केल . गावात जैस्वाल यांचेकडे सदावर्त होते, तयार भोजन खिचडी,ताक व साखर ,असे जेवण करून पुढे निघालो, कठोरा गावात जाण्यासाठी (बर्खड) बोर्कटा नदी ओलांडून जायचे होते ...प्रवाह वेगवान होता त्यामुळे वर दोन तीन km वरजाऊन ओलांडावीच लागणार होती .थोडा वेळ बसलो ,तेवढ्यात काहीजण जुने लाईटचे सीमेंटचे खांब घेऊन आले व त्याचा पुल बनवला व त्यावरून आम्ही पलीकडे पोचलो , मैय्याची क्रुपा .त्या लोकांशी बोलताना समजलं की सकाळी दोन परिक्रमा वासी पाण्यात पडले त्यांना लागले वगैरे नाही पणत्यांचे सर्व सामान बॅग सर्व भिजले व एकाची शबनम बॅग वाहुन गेली आम्ही मात्र सुखरूप पलीकडे आलो , नंदगाव येथे मुक्कामी आलो लहान भाऊ सन्जूचा फ़ोन नचुकता दोन दिवसाआड येत असतो त्यामुळं खुप बर वाटते आरती,पूजन व भोजन आटोपून थंडी मुळे शेकोटि पेटवून तेथेच शेकोटि जवळच झोपून गेलो.
नर्मदेहर ...( 8 )
प्रातःकाली 6:00ला नंदगाव सोडले , चहा मिळाला नव्हता त्यामुळं चुकल्या सारखे वाटत होतं , काकानी अबोला धरला होता ,..परिक्रमेत असतांना पहिले 15-20 दिवस प्रापंचिक विचार पाठ सोडतच नाहीत , प्रत्येक नात्याच पुनर्निरीक्षण होत असत हे होत असतांना असंख्य भावनांचा कल्लोळ होतो ...आणी आपण परिक्रमा करतोय ही आठवण झाल्यावर कुणाशीही बोलावंसं वाटत नाही. खूप कंटाळा येतो. सगळीकडे मुखवटे चढवलेले चेहेरे.
ह्यांची मानसिकता इतकी स्वस्त असते ना, की नको वाटतं....
ज्यांच्यासाठी तुम्ही कितीतरी वेळेला ऍडजस्टमेंट केलेली असते ते देखील एका "नकाराने" बदललेले बघितले आणि वाटलं, 'आपण एकटे असतो तेच बरं असतं.'
कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला माणसांचाच कंटाळा येऊ लागतो.
त्यांना सांभाळून घेताना तुमची प्रचंड दमछाक होते.
प्रत्येकाचे मूडस् संभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे वागणं ह्या सगळ्यात आपण पार दमून जातो, सतत दुसऱ्याच्या गरजांचा विचार करताना
"स्वतःला काय हवं आहे?"
मग अशा वेळी प्रश्न पडतो
"हे सगळं कशासाठी ?"
खूप विचार केला की ह्या प्रश्नाचं एक उत्तर असं मिळतं ते म्हणजे -
"आपण एकटेपणाला घाबरतो."
सुरक्षतेसाठी कळपात राहीलं पाहिजे ही एक चुकीची मानसिकता आपल्यात रुजलेली असते. लोकांनी शरीराने आपल्या सोबत असण्याला "सोबत" अस गोंडस नाव देतो...एक क्षण असा येतो जेव्हा हा माणसांचा गोतावळा नकोसा होतो.
प्रसंगी हितासाठी थोडीशी रागावणारी माणसं म्हणजे खरी-"सोबत"...!
ह्या सगळ्यांपासून लांब जाऊन बघावं. खूप मनःशांती मिळते. सगळे विचार करून ,अर्थ काढून थकल्यावर ...नर्मदा परिक्रमेत या निष्कर्षावर येतोच , ब्राम्हणगाव आलं होतं मी माझ्या तंद्रीतच चालत होतो पुढे भीसे नाना होते ...चहाच बघायच का? नानानी विचारले आम्ही थांबलो . नानानी एका घरा समोर ' नर्मदेहर' आवाज दिला एक मध्यमवयीन ग्रहस्थ समोर आले नानानी चहा मिळेल का ? विचारना केली ..बैठो . बसलो थोड्या गप्पा , चहा आला आम्ही आपापले ग्लास काढले , चहा घेऊन पुढं निघालो काठानेच जात होतो , 'बिश्णाथखेड' हे( विश्वनाथ खेडा )ओसाड गांव समोर आले ...एका गाडीवाल्यांनी सांगितले ..गावाचे पुनर्वसन झाले धरणाची उंची वाढवल्यामुळे इथे पाणी असणार ...पण पुढं महादेव मंदीर आहे तिथे बाबा असतात तुमची सोय होईल... निघालो एक दीड km वर मंदीर आले साधु बाबाना नर्मदेहर केलं , त्यानी आसन लगाओ असा आदेश दिला ,कपड़े घेवुन स्नानास घाटावर गेलो प्रशस्त घाट होता , पण गूढ शांतता होती , भारावल्या सारखे वातावरण होतं ,स्नान पुजन करून परत आश्रमात आलो 4-5 परिक्रमा वासी होते ... आज एकादशी है आज परीकम्मा नही करते , सबको आज यहीं रुकना होगा . आदेश ,ठीक आहे थांबुन घेतले , कपड़े धुण्याचा कार्यक्रम उरकूनघेतला.दुपारी फराळ झाल्या नंतर सवयी प्रमाणे बाबाजी कडे गेलो गप्पा मारताना त्यांना स्थान महात्म्य विचारले ..... त्यांची कळी खुलली ,मांडी घालुन त्यानी सुरवात केली.... यह शिवलिंग प्रलय के बाद स्थापित पहला शिवलिंग है ...आता काहीतरी विशेष ऐकायला मिळणार ,मी कान टवकारले आम्ही दोघंच एका झाड़ाचे पारावर बसलो होतो कोणी येवुन व्यत्यय आणू नये मनोमन प्रार्थना केली , कानदेवून ऐकत होतो.....कालचक्र अनुसार प्रलय का वक्त हो चुका था .महादेवको ये याद दिलाना आवश्यक था मगर शिवजी कही नही थे देवगण त्रिभुवन ढूँढ़ चुके शिवजी का कही पता न चला , सभी देव ब्रम्हाजीसे मिलने सत्यलोक गये , ब्रम्हाजी ने सब सुनलिया और सलाह दी ' नर्मदा शिवजी की कन्या है ' और बेटी की सुरक्षा,और मिलने हेतु दिनमे कही भी हो ...दिन ढलने बाद शिवजी ...अमरक्न्टक से रेवा सागर ..और रेवासागर से अमरकन्टक एक चक्कर काटते है ...वहीपर शिव मील सकते . उन्हे मिलकर प्रलय का याद देने का काम देवोने सप्तऋषीपर सौंपा गया , saptऋषी नर्मदा तट पर आये उन्हे पता था शिव आवाज लगानेसे रुकने वाले नही ...सप्तऋषी इस तट पर बैठे और उस तट पर पैर लगाए ...अब शिव पैर लांघकर नही जायेंगे...हुआ भी ऐसा शिवने रुककर पूछा सप्तऋषीयोने कारण बताया . यथावकाश प्रलय हुवा , प्रलयबाद सप्तऋषीने यहाँ प्रथम शिवलिंग स्थापित किया ....यथावकाश ...दुसरा महेश्वर ..तिसरा अन्नपूर्णा नदी किनारे बैतूल और चौथा काशी क्षेत्र मे स्थापित हुए ...उसके बाद आजतक लाखो ....... भारावल्या सारखा ऐकत होतो . आपण कोणत्या स्थानी आहोत याची जाणीव झाली होती..... सूर्यास्त होतहोता साधुजीचे दर्शन घेवुन तेथून उठलो .मंदिरात जावून शिवपिंडीसमोर लोटान्गन घातले ...पूजन आरती आटोपली मन शांत झालं होतं एकादशी मुळे रात्री केळी मिळाली , झोपताना नानान्ना हे सांगितले ....व भारावलेल्या अवस्थेत झोपी गेलो ..
नर्मदेहर ...( 9 ) ....
सकाळी स्नान,आरतीपुजन आटोपल्यानंतर 6:30 ला पुढील मार्गास रवाना झालो , बाबाजीनी एकादशी सोडुन जाण्याचा आग्रह केला पण आम्ही निघालो ,आश्रमातील साधु परिक्रमावासियांना थांबंयाचा खुप प्रयत्न करतात , त्यांना सेवाकेल्याचे समाधान मिळत ,पण आम्हाला रस्ता काटने महत्वाचे , रस्ता खुप कठीण व खडतर होताच पण सकाळीच थंडीचा चालण्यास बर वाटते ,कठीणरस्ता मला आवडत होता त्यामुळं ईतर विचार मनात नयेता संपुर्ण लक्ष रस्त्याकडे असत ,व ' नर्मदेहर ' शिवाय दुसरीकडे लक्षच जात नाही रस्त्याने बसत उठत ..नलवाई गांव पार केलं , होडीतून डेलनदी (देवनदी ) ओलांडली लोहारा येथे कपील आश्रम येथे पोचलो ...अगदी थकून गेलो होतो , प्रशस्त पार व सावलीत विसावलो ... आश्रमात भोजनप्रसादीची चौकशी केली , थोडा वेळ आहे म्हणुन सावलीत बसुन राहीलो 2:30 ला जेवण झाले लगेचच पुढे मार्गस्थ ....इन्द्रपुरी ,पीसोला, केसरपूरा मार्गे ....रेवाआश्रम ..मोहीपूरा येथे मुक्कामी थांबलो आजचारस्ता अतिशय कठीण चढ़उतार, ओढ़े , काटेकुटे भरपुर होते खुपच थकलो , आश्रमात स्वच्छ गार पाणी पील्यावर बर वाटलं ,हातपाय धुवून आरती पुजन आटोपल्यानंतर 7:30 ला भोजन करून झोपलो सोबतीला 12-13 परिक्रमा वासी होते चार त्यागी साधु होते ...रात्री9:00 च्या दरम्यान काकांच्या मुलाचा फ़ोन आला सर्वाना झोप लागलेली होती ,आवाजाने झोपमोड़ झाल्याने साधु खुपच चिडला होता काकांनी ऊत्तराला प्रत्युत्तर द्यायला सुरवात केली ...दोघं एकमेकांचे अंगावर धावले .....आवरता आवरता पुरेवाट.... रात्री आश्रमात जेवण 8:00 चे आत मिळते दिवसभर चालुन थकल्यामुळे व TV किंवा ईतर उद्योग नसल्यामुळे झोपन्याशिवाय पर्याय नसे, असो.... झोपलो एकदाचे..
नर्मदेहर 10 ..
पहाटे उठून स्नान आरतीपुजन आटोपून मार्गस्थ झालो , रेवा आश्रमास हात जोडले कोण कुठले साधु . ओळख न पाळख पण आत्मीयतेने रस्त्यावरुन बोलावुन नेतात जेऊ घालतात , मैयाचा आशीर्वाद तुमच्यावर राहील अशी सदिच्छा व्यक्त करतात ,रस्ता दाखवण्यास दुरपर्यंत येतात ...मैय्या किनारी सगळंच वेगळं... सूर्योदय होत होता परिक्रमा सुरुवात केल्यापासुन एक विशेष गोष्ट लक्षात आली होती .... इकडचे कोंबडे कु..कु..ची कु नाही करत ... त्यांच आरवण.... नर्मदे हर ... अस असत सुरवातीस मला हे माझ्या मनाचे खेळ वाटले पण आज मी भीसे नानांना तस म्हणताच ...अहो मी तुम्हाला परवापासुन म्हणाव अस वाटत होत पण तुम्ही हसाल म्हणून नाही म्हणालो. हे ऐकून हा एक परमेश्वरी चमत्कारच ... अस म्हणून नकळत हात जोडुन पुढं निघालो(असे काही परिक्रमा केलेल्या मंडळींना जाणवलं काय ? प्रतिक्रिया अपेक्षित) ......आदी अंती एक ब्रम्ह । मध्ये कोठुनी हा भ्रम ।। कैन्क काळाचा चुकला । जीव शोधी निज मुळा।। उफराटि होता द्रुष्टी । ब्रम्ही भासे नसती स्रुश्टी ॥ डोळ्या कावीळ जाहले ।अवघे पीतची भासले ॥ ज्ञानांजने द्रुष्टी आली ।भ्रांती समुळ नासीली ॥ ... विचारतंद्रीत चाललो होतो छोटा बडदा, आवली, दहीबेड़ा ,सैगाव ओलांडून नाखूनवाले बाबांच्या आश्रमात पोचलो भुक लागलीच होती हातपाय धुवून जेवायला बसलो वरण भात पीछा सोडत नव्हता , घरी ताटात भात येवू देत नसे येथे मुकाट्याने खात होतो नाना सुरवातीस हसायचे मी चिडायचो आता ते फक्त माझ्याकडे बघतात ... जेवण करून लगेच निघालो उटावद , पिपरि मार्गे पिपलौद येथे पोचलो सूर्यास्त होत होता ..दयाराम पटेल भेटले त्यांनी आग्रह करून घरी नेले चहा , जेवण परत चहा पाजून येथेच झोपा असा आग्रह केला निग्रहाने नाही म्हणून मंदिरात गेलो मंदीर छोटेसे असल्यामुळे भीसेनाना व काका कसेतरी मधे झोपले मी बाहेर उघड्यावर प्रचंड थंडीची मजा घेत झोपलो ...
नर्मदेहर ( 11 )
सकाळी 5:00ला उठून काड्या लाकडे जमा करून छान शेकोटी पेटवली , थंडी मुळे हातपाय बधिर झालेले होते . शेकोटी वर चांगले शेकून घेतले नंतर प्रातर्विधी आटोपले जवळच असलेल्या श्री नृसींह मंदिरात टाकी खाली स्नान उरकून दर्शन घेतले परत दयारामजी पटेलांच्या घरी जाऊन चहा घेवुन 7:00 ला पुढे रस्त्याला लागलो मैया किनाऱ्यापासून दुर पर्यंत इलेक्ट्रिक मोटारची पाईपलाईन ,त्यात केबल वायरचे जाळे ,लिकेज मधून वाहणारे पाण्याचा चिखल काही ठिकाणी केबल वायर कट असल्यास इलेक्ट्रिक शॉकची भीती होतीच ,शेतकर्याँचा डॉलर हरबऱ्याला पाणी देण्यात रस्त्याची दुर्दशा, जीवावर बेतण्याची शक्यता , या कडे दुर्लक्ष करीत ' नर्मदेहर ' गर्जना करीत वाट तुडवत होतो , पादत्राण चिखलामुळे जास्तच वजनदार त्यामुळं पायात गोळे चढत होते सर्व सामान सांभाळून काठीचा आधारघेत चालाव लागत होत कसरावद ,पार केलं राजघाट येथे धरणाचे पाण्याचा भराव वाढला अशी माहीती मिळाली मग राजघाट जाणे टाळले व बगुद मार्गे बडवनी येथे पोचलो , हे जिल्हयाचे ठिकाण उद्यापासुन शुळपाणी जंगलात प्रवेश होणार होता पाचसहा दिवस पार करण्यास लागणार होते ATM ला भेट दिली रस्त्यात किरकोळ खरेदी करून योगमाया मंदिरात पोचलो .... प्रशस्त मंदीर होते आसन लावल कपड़े धुतले ,भोजन आटोपून बसलो होतो अद्वैत गोळे,चेतन परांजपे व त्यांचे काका वआणखी4-5 परिक्रमावासी होते अचानक एक माताराम परिक्रमावासी रडत आत आल्या व मांडे कुठं आहेत अशी विचारणा करत होत्या मी गोंधळून गेलो , या अनोळखी भागात माझी चौकशी वत्या रडताहेत स्वतःस सांभाळून विचारपूस केली ..नाशिकचे श्री नीशीकान्त मुळे यांच्या पत्नी होत्या ,आमची फेसबुक ओळख फ़ोन वर बोलणे होत होते प्रत्यक्ष बघीतलेल नव्हत ,आमच्या नंतर दोन दिवसांनी निघाले होते.....त्यानी रडतच सांगितले बाहेर गाडीत श्री मुळे आहेत त्यांना आत आणा , आम्ही सर्वजण धावलो बाहेर गाड़ी उभी ,आम्ही सर्वांनी आधार देवुन त्यांना आत आणले, पाणी वगैरे पीले नंतर समजलं त्यांचे गुडघे लॉक झाले होते ,चालण्याचया आवेशात दुर्लक्ष त्याची मोठी कीमत चुकवावी लागणार? ...मुळे वहिनी फक्त रडत होत्या परिक्रमा अर्धवट सोडावयाचे त्यांना प्रचंड दुःख होत होते , आम्ही सर्वांनी समजूत घातली व त्यांना परत घरी नाशिकला जाण्यास राजी केलं .....आम्ही सर्वजण सुन्न झालो होतो मैया किनारी काहीही घडू शकत पहिली प्रचिती आली होती परिक्रमा पूर्ण होणेसाठी शरीरदुर्लक्षित करून चालणार नव्हत....दिवसभर विश्राम करून थोडे बरेवाटले रात्री परत आराम ....उद्या पासुन शुळपाणी जंगल ....परीक्षा होती पहिलीच ...परिक्रमेत प्रवेश करण्याची .....
नर्मदेहर ..( 12 )
स्नान , आरती पुजन आटोपल्यानंतर 6:30 ला ' नर्मदेहर ' केलं पुजारीजी बाहेर आले त्यांना पुढील मार्ग विचारला त्यांनी शूलपाणी जंगलातील तीन मार्ग समोर ठेवले , जो तुम्हाला योग्य वाटेल तो निवडावा असे सांगितले (1)ला.. 120 km विस्तार आहे, जंगलमार्ग अतिबिकट असुन सरदार सरोवरचे पाणी भरल्या मुळे पुन्हापुन्हा लांब चक्कर मारावे लागतील, कठीण चढ़ उतार झाले आहेत ,त्यात चिखल असल्यमुळे वेगळाच प्रॉब्लेम होऊ शकेल नर्मदा स्नान करने अवघडच (2) रा ...जंगल मार्ग जंगलात छोटे छोटे गावे , लहान शाळात निवास , क्वचित दुकान काही ठिकाणी सदावर्त मिळू शकत , सुरक्षीत आहे(परंतु हमी नाही) .....(3)रा .... सड़क मार्ग थोडा लांब पडतो पण 100% सुरक्षित ....विचार करून क्र. दोन चा मधला मार्ग स्वीकारला व नर्मदेहर केलं... आठ की.मी. वर बावनगजा पर्यंत जातांना चढ़ उतार मुळे थकून गेलो बावन गज उंचीची भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती म्हणून बावनगजा हे नांव .... झाड़ाखाली बसलो होतो तिथे आदिवासी शाळा , ....पोषणआहार व्यवस्था बघनारी वयस्कर आदिवासी मैयाने आम्हांस पाहिले ...घाई घाई ने येवुन चलो जल्दी खा लौ ...दस बजे स्कूल मे बच्चे आने के बाद फुरसत नही होती अस म्हणून बळजबरीने सकाळी साडेनवु वाजता ..... वरण भात .. ताट गच्च भरून ...खायलाच लावला .... धन्य धन्य म्हणत तेथून निघालो परत दोन डोंगर चढून उतरलो .... सायं. 5:30 ला पाटी या गावी पोचलो ....देशपांडे काकाची अवस्था कठीण झाली होती दिवसभरात चहा मिळाला नव्हता , कोठे , मंदीर मठ आश्रमाची चौकशी करत होतो .... भाषा समजत नव्हतीच ... ईशारो ईशारो मे ... डोक लावत होतो अखेर माँ नर्मदा परिक्रमावासी ट्रस्ट पाटी यांचा मो.नं.9893243441 मिळाला व आमची राहान्याचि सोय झाली ... पाणी कमीच होते ... मी मूळचा मराठवाड्या तील असल्यामुळे noप्रॉब्लेम ... नानाची मात्र जरा कुचंबणा झालीच ... आज नेमके संजय, सुनील, मनोज या तिन्ही भावांचे फ़ोन येवुन गेले ....मी सौ.ला फ़ोन केला ...आईची चौकशी झाली होती त्यामुळे जरा बर् वाटत होत...
नर्मदेहर ( 13 ) ..
सकाळी 6:00 प्रयाण केलं ,पाण्याच्या कमतरते मुळे आज कसतरी मुखप्रक्शालण आटोपून पुढील प्रवास सुरू केला थंडी छानच होती क्वचित शेतं दिसत, बाकी ओसाड टेकड्या , जंगल व वैराण भाग होता सकाळची वेळ असल्याने झपझप चालत होतो ...काका मागेपुढे रहात ...दुपार पर्यंत कसेतरी चालत दुपारनंतर त्यांचा वेग कमी व्हायचा , पण ते मान्य करत नसत , मी अजुन ....... ... आता असोदा नावाचे छोट गाव ओलांडल होत तुम्ही चला पुढं मी थांबुन येतो , अस म्हणून मागे थांबले होते , नाना व मी निघालो एकजण समोरून डोक्यावर मोठी टोपली घेऊन येत होता , काय आहे अस विचारलं तो काय म्हणाला समजलंच नाही ... टोपली उघडून बघितले थोड्याच मेथीच्या जुड्या व मुळे होते जास्त वीचार न करता दोन जुड्या व दोन मुळे घेतले , कीती पैसे विचारलं ...काहीच नाही समजलं , खीशातुन पैसे काढले दहा दहाच्या नोटा होत्या त्याचे समोर ओंजळीत धरल्या त्याने तीन नोटा काढल्या , भाजी मुळे शबनम मधे टाकले व पुढं मार्गस्थ ... मिळाली संधी तर छान जेवण बनवाव असा विचार करत होतो ... डोंगर संपत नव्हते एक चढुन उतरलो की दुसरा हजर.... दुपारचा एक वाजुन गेला होता आज चालता चालता मानसपुजा व ...मानस स्नान उरकल ...(नाईलाजच होता विचीत्र प्रदेश होता ) एका मोठ्या टेकडीवर झोपडी दिसली .... त्या दिशेनं निघालो ....झोपडीचे बाजुस3-4 मो. सा. उभ्या होत्या आम्ही आत शिरलो ...काही मानस सावरून बसले काही उठून गेले .... छोटा पाठीमागचे भागात आम्ही होतो बसायचे परवानगी घेतली व मांडी घालून खालच्या पौत्यावर दोघं बसलो ...अंदाज आला होता ते जंगलातील .... दारूचे दुकान होते... नानाच्या चेहऱ्यावर ? चिन्ह मी खुणेनच शांत इशारा केला , सावकाश शबनम मधून मेथी व मुळे काढून कागदावर ठेवले व करा सुरू ...... नाना पहातच होते , मी बकरी सारखा तुटून पडलो होतो ... माझ पाहुन नानाही सुरू झाले .... झोपडितिल मंडळी पहातच होते ...आदिवासी आमच्याकडे ...... आदिवासी बघितल्या सारखच बघत होते .... ...आतून एक तरुण मुलगी बाहेर आली तीने नमस्कार करून दोघांना दोन बिस्किट पुडे दिले ...ते सर्व सम्पव्ल्यावर पाणी पिऊन मोठा ढेकर दिला ...उठलो सर्वानी आम्हास हात जोडून नमस्कार केला ...पुढे निघालो अजराड गावी एका दुकानातून जाड सेव मिळाली ती घेतली व पुढे.... परत दोन तीन डोंगर उतरून चढून ... बोकराटा गांवात , तिथे राममंदिर होते .. छान परिसर होता स्नान पुजन केलं खिचड़ी भोजन करून निद्रादेविचे स्वाधीन झालो .....आमच्या व्यतिरिक्त ईतर काही आहे सर्व विसरून गेलो ....
नर्मदेहर ( 14 ) .. ..
बोकराटा मधे सकाळी स्नान,पुजन आटोपून सकाळी6:00 ला प्रयाण करते झालो ,रस्त्यात एका दुकानदाराने चहा,बिस्किटपुडा दिला .... पुढं निघालो एक छोटी नदी लागली ती ओलांडण्याचे नादात बराच वेळ घालवला , पुन्हा डोंगर समोर उभेच ..ओलांडून आंबापाडा गावात पोचलो , जेवण नाही एका घरात दुकान होत फुटाने गूळ विकत घेतले ,जाड सेव मिळाली पण खुप जुनी असल्याचा स्वाद ...घेतली ..परत डोंगरात शिरलो उतर चढ़ करत होतो मनात ' नर्मदेहर ' दुसरा विचार येणे नाही, आपण कोण याचेही स्मरण नाही ....फक्त चालत रहाणे .... एक झाड बघुन बसलो ..कुठुनसा एक आदिवासी मुलगा समोर आला त्याला बोलावलं मोड्क्या तोड्क्या भाषेतच त्याची विचारपूस केली , गाव कुठे विचारले ...त्याला सांगता आल नाही ...थोडी सेव,फुटाने त्याला दिले ... पाणी पिऊन पुढं रवाना ...डोंगर संपत नव्हते अवघ्या परिसरात नाना व मी दोघंच होतो बराच वेळ चालत होतो .. साडेचार पाच चे सुमारास एक घर दिसले ...समोर गाय व वासरु होते .... नर्मदेहर आवाज दिला जख्ख म्हातारी आदिवासी माताराम आतुनच कोण म्हणून विचारणा ...आम्ही समोर गेलो ..चाय मिलेगी ? मी विचारल बैठो ... त्या बैठो म्हणण्यात वेगळीच जरब होती ... बसलो ..चहा आला , आमचे ग्लास काढले चहा घेतला , खर तर उठायचि ईच्छा नव्हतीच पण घरात दोन वयस्कर आजीबाइ ,दोन तीन मध्यम वयीन स्रीया एक मुलगी व लहानमुले आम्हास थांबुद्या कस म्हणणार? उठलो नर्मदेहर करून रस्त्यास लागलो समोरून एक जीप आली ड्रायव्हरने आम्हास पाहुन थांबवली ... बाबाजी ..चाय लिया ..? हो म्हणत मान हलवली ... अब कहाँ जाओगे , अँधेरा हो जायेगा अब ... रुकना है तो रुको ... आंधळा मागतो एक .... परत त्याच घरी .. आम्ही बाहेर छपरातच आसन लावल पाठीमागे पाणी होत हात पाय धुवुन आरती पुजन आटोपल् .... थोड्या वेळात आतून एक एक करत 5-6 स्रीया बाहेर येवुन आम्हास पाहुन गेल्या ...थोडे अंतर ठेवुन मुले आमच्याकडे पहात होती ज्याने आम्हास आत आणले तो घरात गुप्त झालेला होता ... बराच वेळ आम्ही आमचेच पाय कुरवाळत बसलो ... आतून घरमालकीन बाई आल्या आम्हास फ़ोन आहे काय अस विचारल मी फ़ोन काढला त्यांनी नं. सांगितला ... बराच वेळ ती बाई बोलत होती ... जमानत ,पोलीस , सोनार ..यावरून अंदाज आला .. आदिवासी भिल्ल कुटुंब होते ... काही तरी भानगडी मुळे पो. स्टे. वर असावेत ... बोलणे संपायच्या आधी त्या बाईने माझ्याशी बोला म्हणुन फ़ोन माझ्या हाती दिला .... मी नर्मदेहर म्हणताच पलीकडुन .... हां हां ..खाना बिना खा कर तुम आराम करो ,हमे टाईम लगेगा ... ठीक है म्हणून ठेवला.... काही वेळात खाना खाओ आदेश ... आम्ही आमची ताट काढले ... गच्च ताटभर भात व उडिदाचे वरण .... दिवसभर काहीच नव्हत त्याच उट्ट काढल गेल .... जेवण करून तिथंच छपरात दोघं आडवे झालो ...नाना लगेच झोपले मी टक्क जागा .... रात्री 12:30 , 1:00 च्या सुमारास दोन तीन मो.सा. आल्या सात आठ जण असावेत ...मी तोंडावर पांघरूण घेतले ...ते आल्यावर फ़ोन सुरू 15- 20 मिनिटात आणखी तीन मो.सा. बरीच मंडळी जमली ...... ..बहुतेक आत पिण्याचा कार्यक्रम ...अचानक त्यांच्यातच .. हानामारी सुरू ...एवढ सुरू असुन नाना गाढ झोपेत ....मी जीव मुठीत धरून ....थांबले अखेर ...मो.सा. जाण्याचा आवाज ...? रात्रीचे दोन वाजुन गेलेले होते त्या थंडीतही घाम फुटला होता .... आता शांतता होती पण झोप पळाली .... तीन साडेतीनला झोपेच्या आधीन झालो ..
नर्मदेहर ..( 15 )
सकाळी 6:00ला जाग आली .सुंदर वातावरण होत सर्व कुटुंब आपापले कामास लागले होते , आम्हीही प्रातर्विधी आटोपून आलो , घरमालक प्रसन्नचित्ताने आमच्याकडे पहात होता , रात्रीच्या घटनेचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता.... गाईच्या ताज्या दुधाचा गरम गरम ग्लास भर चहा हातात आला , मन प्रसन्न झाले ,डोंगराआडून सूर्यदेव बाहेर यायच ठरवत होते ... किरण रूपी दूत आधीच पोचले होते, छान थंडी होती ..आम्ही गप्पा मारत चहा संपवून नर्मदेहर केले ग्रहस्थ आम्हांस रस्ता दाखविण्यास दुर पर्यंत आला होता , त्यांचा निरोप घेवुन पुढं निघालो . 4-5 km वर ' बायगोरा ' गाव लागले . लागोपाठ तीन चार जणांनी घरी नेऊन चहा पाजला. दोन बिस्किटपुडे खाऊन पुढे रवाना ... बदरीयागड , बहीरपुर ओलांडून पुढं निघालो रस्त्यात विहिरीवर मोटार चालु होती छान स्नान , आरती, पूजन आटोपून ...सुलतानपूर गांवात पोचलो ....आम्ही आता महाराष्ट्रात होतो डोंगर संपले होते .... सुलतानपूर येथे दुपारी दोन चे दरम्यान आश्रम चौकशी करत होतो .....एक ग्रहस्थ आग्रह करून घरी घेवुन गेले .... छान खानदेशी पध्दतीची सान्डग्याचि भाजी, लोणचं मस्त डिश भरून दही ... पोटभर जेवलो ...पुढे रस्ता छान आहे असे समजले ..नर्मदेहर करून लगेच निघालो . दीड दोन तासांनी शेतातून आवाज आला ,...महाराज ..चहा घेवुन जा ...घेतला..पुढे निघालो छोटी छोटी दोन गावे ओलांडली अंधार होता होता ब्रम्हपुरी येथे पोचलो ...राधाकॄष्ण मंदिरात पोचलो , काही वेळानं देशपांडे काकाही आले दोन दिवस ते एकटेच होते ... हातपाय धुवुन आरती पूजन आटोपल्यानंतर भोजन झाले ....रोजची डायरी लिहुन निद्रिस्थ झालो ...
... नर्मदेहर ... ( 16 )
ब्राम्हणपुरी मधे प्रातर्विधी आटोपायला बराच वेळ लागणार होता जवळपास 20-22 परिक्रमा वासी होते , नळ एकच होता ,पहाटे 4:00 ला उठून वाट पहात होतो 6 माताराम होत्या त्यांच आवरे पर्यंत बाहेर शेकोटि पेटवून बसलो ...अखेर नंबर लागला घाईने आटोपून आरती पुजन झाले अंधारातच निघालो डांबरी रस्ता होता , उन्हाच लवकर चालणे जरूरी होत ...लोनखेडा ,मलोनी ओलांडून शहादा जवळ आले होते , रस्त्यास लागूनच भव्य जागेत बांधकाम होत आहे , ...केरळमधे श्रीपद्मनाभस्वामी (काही दिवसांपूर्वी सापडलेल्या प्रचंड खजिन्यामुळे चर्चेत आलेले) मंदिर ट्रस्ट कडून भारतात दूसरे पद्मनाभस्वामी मंदिर बांधण्यात येत आहे . तेथे गेलो , दर्शन घेतले तेथील स्वामींनी चहा बिस्किट दिले ,पुढंनिघालो... शहादा, पिंगाना, भादे , काथरदा मार्गे ' दक्षिण काशी ...''प्रकाशा'' पोहचायला अंधार पडला होता , संपूर्ण डांबरी रोडने चाललो होतो ते अतिशय त्रासदायक व कंटाळवाण् होत ...खुपच त्रासून गेलो होतो ... धुळ्याहून माझा भाचा प्रसाद कुलकर्णी भेटावयास प्रकाशा येथे येतो असा फ़ोन आला होता .. आम्ही पोचलो दगडूजी महाराज मठात आसन लावलं मोठा परिसर , 30-40 जण थांबलेले होते. आरती पुजन चालू असतानाच प्रसाद सर्व कुटुंबासह तेथे आला आरती आटोपून एकमेकांची चौकशी झाली प्रसादचे वडील आमचे मेव्हणे ... प्रकाशराव ,मी ,भीसे , काका गप्पा गोष्टी , सर्वांचा परिचय झाला प्रसाद्चा मित्रही बरोबर होता , आम्हास दुपारी जेवण मिळाले नव्हते भुक लागलीच होती स्नेहलने डबे काढले सर्वजण जेवायला बसलो बरोबर 15 दिवसानंतर घरचे जेवण ... माझे जेवणाच ताट काल परवा कुठंतरी विसरलो . पेपरडिश डब्यांची झाकण उपयोगी पडले, अतिशय सुंदर जेवण , सर्व चाटून पुसून साफ केलं .. काही गप्पा ,सिध्देशबरोबर खेळणे ,गप्पा सगळ चालू असताना फ़ोन वाजला ... परिक्रमा वासी मित्रांचा फ़ोन होता 4-5 जण होते ,एक माताराम सोबत होत्या ..थोड्या वेळातच पोचतो , मठात जेवणाच सांगून ठेवा थोडा उशीर होऊ शकतो ...अस आमचं बोलणे झाले , तसा निरोप मी मठाचे तेथील कर्मचारी यांना दिला , प्रकाशराव व कंपनी परत धुळ्यास जाणार होते ,स्नेहलने धुळ्याहून दोन चटन्या , मीठ काही औषधि असा मोठा गठ्ठा दिला होता , कशात ठेवायचा याचा मी विचार करत होतो ... रात्रीचे 8:30 प्रसाद व कुटुंबीय तेथुन रवाना झाले आम्ही आत आलो सर्व मठ सामसुम होता , सर्व परिक्रमा वासी लाईट बंद करून ..... झोपलेले होते आम्ही आमचे अंथरुन ,शाल काढून झोपायची तयारी करत होतो ... व आमचे परिक्रमा वासी मित्र व त्यांचे सोबतचे मंडळी आत आले .... नर्मदेहर व्हाट्सअप ग्रुप वर आमचा परिचय होता प्रत्यक्ष एकमेकास ओळखत नव्हतो ...परिचय वगैरे झाला त्यांना आमच्या बाजूने जागा करून दिली .चार महाराज व एक माताराम होत्या ...त्यांना भुका लागल्या होत्या , मठाच्या कर्मचारी यांना मी कल्पना दिली होती त्यास उठविले ... त्याने स्वयंपाकग्रहाची चाबी दिली व जेवुन घ्यावे असे सांगितले ,आत एका मोठ्या पातेल्यात खिचड़ी झाकून ठेवली होती .... आणी त्या परिक्रमावासी माताराम यांचा पारा चढला ..... त्यांनी अद्वातद्वा मोठमोठ्याने बोलायला सुरवात केली आम्ही गप्प झालो , मठाचे व्यवस्थापक यांनाही बोलावलं ...एक उच्च विद्याविभूषित परिक्रमा वासी ज्यांची ही तीसरी परिक्रमा होती ती महाराष्ट्रीयन माताराम जेवणाचे कारणाने व्यवस्थापकांशि मोठ मोठ्याने भांडत होत्या .... लाज वाटली . तीसरी परिक्रमा करणाऱ्या सु शिक्षित महिलेने इतक्या अरेरावीने वागावे? ....दोन केलेल्या परिक्रमा फुकट गेल्या अस मनात म्हणुन मी झोपायला गेलो ...त्यांचे बराच वेळ बडबड पुराण चालु होते .... मैय्या सद्बुद्धि देवो ........
नर्मदेहर ..( 17 )
दक्षिणकाशी क्षेत्र प्रकाशा ... प्रातःकाली उठुन नित्य कर्म आटोपून चहा घेतांना , कालच्या चालण्यामुळे सर्वच खुप थकून गेलो होतो. आज प्रकाशामधेच विश्रांती घ्यावी असे ठरले. थोडे आरामात काशीविश्वेश्वराचे ,पुष्पदंतेश्वराचे दर्शनास गेलो , ... पुष्पदंत हे गंधर्व राज ..काही अपराधाचे प्रायश्चित घेण्यासाठी या ठिकाणी तपश्चर्या करण्यास आले , शिवाचे महीमा वर्णनाचे सामर्थ्य प्रत्यक्ष वेदांमध्येही नाही असे म्हटले जाते. निष्काम भक्ती , मोक्षप्राप्ती , संसारीक प्राप्ती साठी शिवउपासना करतात, सर्वश्रेष्ठ निष्काम भक्ती मानली जाते .... याच ठिकाणी पुष्पदन्ताने ..शीवमहीम्न या 43 श्लोक असलेल्या स्तोत्राची रचना केली . शंकराला प्रसन्न करण्यास सगळ्यात प्रभावी , अमोघ स्तोत्र अशी या स्तौत्राची ख्याती आहे. कोणतीच माया मानवी मनास या स्तौत्राचे पाठामुळे भ्रमीत करू शकत नाही, जसजसे पाठ कराल तसतशी याचे शक्तीची जाण होते. शिवसे ऊपर कोई देव नही ..महीम्न से ऊपर कोई स्तोत्र नही . अस म्हटल जातं . अश्या ख्यातीप्राप्त स्थळाचे ठिकाणी दर्शनाचा योग आला . दोन्ही ठिकाणचे दर्शन घेवुन परत आश्रमात आलो दुपारचे भोजन विश्रांती घेतली माझी चप्पल दुरुस्त करून घेतली .... सायंकाळी जवळच असलेल्या अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात दर्शन घेवुन अंधार होताहोता परत आलो , आरती पुजन आटोपून फलाहार घेवुन निद्रीस्थ झालो .
नर्मदेहर .. ( 18 )
सकाळी लवकर प्रातर्विधी आटोपल्यानंतर 6:00 ला दक्षिण काशीला नर्मदेहर केले .. सनावद मार्गे निघालो डांबरी रस्ता असला की मला कंटाळवाण् वाटतं , जी गम्मत मैया किनाऱ्यावरून ,डोंगराळ भागातून ,ग्रामीण रस्त्यानं जाण्यात असते ती औरच ...इथं आपण रमत गमत चालुच शकत नाही , स्वतःला वाचवत चालावे लागते व तेच मला कंटाळवाने ... एक खान्डसरि साखर कारखाना लागला , त्यांनी अडवले ..जवळच छोटसं मंदीर तेथे थांबलो आधी चहा .. तासाभरानं जेवण .... चाललंय काय ? ईच्छा नसताना सकाळी 11:00 ला जेवण त्यासाठी अडीच तास घालवावे लागले . उन्हे वाढल्यावर चालणे जड़ जातं ... गप राहीलो परिणामी अंतर कमी चालणे ... एव्हाना बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागल्या होत्या , आपण ठरवल म्हणजे होणारच ... ते इथं होत नाही ... एका गावाची चौकशी करून निघायचे आधी विचारणा केली तर 10km आहे अशी माहिती मिळते प्रत्यक्षचालताना चार तास चालुनही ते गाव अजुन दोन km दुर असतं .... भोजनं आटोपून पुढं निघालो अमलाड गावी नीलकंठ मंदिरात विश्रांतीस थांबलो अर्धा तास विश्राम पुढे रवाना .. रस्त्यात एकजण आडवा.... बाबाजी चला इकडं .... गेलो ...आजचा दिवस इथंच थांबा .... जाधव बंधु तिघेजण .. आजोबांनी परिक्रमा वासियांची सेवा करण्याचे व्रत घेतले वडिलांनी ते रुजवल हे तिघं तोच वसा पुढे चालवत आहेत ... काका पुढे गेले होते त्यांनाही आणायला गाडी पाठवली पण सापडले नाही . आम्ही दोघं त्यांचे पाहुणचाराचे तावडीत सापडलो ... अजुन तीन चार तास चालणे झाले असतं .. आम्हास हॉल मधे आसन लावण्यास सांगून एकजण परत रस्त्यांवर ...आणखी येणाऱ्या परिक्रमा वासियांना घरी आणणे साठी .... विचार करत बसलो ... आम्ही शहरवासी अचानक एक पाहूणां आला तर ... सगळ्या घराचे शेडयुल् बिघडत .... आणी हे लोकांना धरून आणतात व चांगला पाहुणचार करतात .तिघांचीहि मुले शेती , व्यापार करतात .... मैया किनारी सगळंच मस्त होत ...सायंकाळी आरती पुजन करून ..लवकरच झोपलो.
नर्मदेहर .. ( 19 )
प्रातःकाली स्नान पुजन आटोपून 6:00 ला नर्मदेहर करून मार्गस्थ झालो तळोदा मार्गे असरावद येथे जावुन चहा घेतला , रस्ता कंटाळवानांच होता उजवा पाय दुखायला लागला होता ... पुढं निघालो वाण्याविहीर जवळ गेल्या नंतर समजले आत दीड दोन km गेल्यावर जेवण मिळेल ... पुढे पर्वतावर अश्वथामा यांची गुंफा आहे ..व परत येथे येवुनच रोडने पुढे जावे लागेल .... आम्ही बिस्किटावरच भागवायचे ठरवुन सरळ पुढे निघालो सायंकाळी 6:30 चे आसपास अक्कलकुवा येथे पोचलो गावात प्रवेश करताच उजव्या बाजूनं आवाज ..... बाबाजी ... बालाजी हॉटेल मधून मोठ्याने आवाज आले प्रचंड थकलेलो होतो ... बसावं अस वाटतंच होत ... थंड पाणी देवुन स्वागत .. चहा .... बाहेर अंधार पडत होता .. आम्हास मुक्काम सोय बघायची होती , रुक जायीये बाबाजी ... माता मंदिर मे व्यवस्था है आप चिंता न करो ...अब खाना खाकर जाओ ....मंदीर मे मै ही खाना लाता , लगेच जेवायला ताट वाढून जेवण हजर ...जेवुन घेतल . त्यांनीच कालीमाता मंदिराचा रस्ता दाखवला . काली मंदिरात जाऊन दर्शन घेवुन आसन लावलं देशपांडे काका होते , आणखी चार परिक्रमा वासी होते ....थोडी विचारपूस ..पुढच्या रस्त्यांची चौकशी , रोज होतहोती ... दररोज मुक्कामी वेगवेगळे सह प्रवासी ... थोडे आलेले अनुभव सांगत ... मराठी माणसं नर्मदा सेवेत मोठ्या प्रमाणात व ठीकठिकाणी आहेत . अतिशय प्रेमानं वागतात , घरी असल्यासारखे वाटतं ...रात्री झोपायच्या आधी मैयाची आरती पुजन केलं व नवु वाजता झोपी गेलो ...
...नर्मदेहर ...( 20 )
कालीमाता मंदिरात पहाटे उठून प्रातीर्वीधी ,स्नान पुजन होत नाही तोच बालाजी हॉटेल वाले श्री वैष्णव हे चहा घेवुन आले थंडीची वेळ , मस्त गरम चहा , मंदिराचे प्रसन्न वातावरण सर्वच आनंददाई होत ... पण कोणत्याच स्थळ , व्यक्ती , भोजन , यासोबत जास्त लोभ न करणे परिक्रमा वासीयान्चा नियमच आहे ..... व नियम पालन करन मला खुप आवडतं , नर्मदेहर ..करून निघालो सकाळी सकाळी चालण्याचा आता सराव झाला , पाठीवर सॅक नसेल तर ... चालता येत नाही, हातात काठी नसली तर ठेच लागते की काय : अस वाटतं , हातात कमंडलू नसला तर चूकल्या चूकल्या सारखं वाटतं ... सात आठ km गेलो . अचानक गाडी समोर येवुन उभी राहिली .. धुळ्याचा भाचा प्रसाद कुलकर्णी हा गरुडेश्वरला दर्शनास जात होता ...रस्त्याने आम्हास शोधतच होता ... थोडा वेळ त्याच्याशी बोलुन पुढे निघालो रामदेवआश्रम लागला ...दहा साडेदहा झाले असावेत पाणी पिऊन कमंडलू भरून घेतले , चहा घेऊन निघालो . पटेल यांचा जेवण करूनच जा .. हा आग्रह मोठ्या निग्रहाने परतवून ...नर्मदेहर केलं ....बाबाजी आपको भोजन करनाही होगा ..आप चलो आगे ...दो घंटे बाद भोजन लेकर आता हूँ ... त्यांचा निरोप घेवुन पुढे ..... सड्केने चालन्यामुळे आता पाय चांगलाच दुखत होता . भीती वाटायला लागली होती. तसाच पाय ओढत निघालो... रात्री , सकाळी प्रचंड थंडी .. चालताना उन्हाचात्रास घामाघूम होऊन जायचं .. पण चालतच होतो . बराच वेळ चालत होतो . मुक्कामी भेटलेले साधु सांगत संसारी व्यक्तीकी परिक्रमा सफल नही होती ... मी वीचारायचो ...क्यूं ? त्यांच उत्तर असायच " साधु तपे हुये रहते " इसलिए ईश्वर के शिवाय कही और मन भटकता नही . मी बऱ्याच साधुंची दिनचरया बारकाईने बघत होतो , आणी हे खर् आहे , सकाळी थंडीत गार पाण्याने आंघोळ करने कीती कष्टदायक आहे ते आम्ही अनुभवत होतो , उन्हात आम्हाला घामाने जीव घाबरा व्हायचा ... साधु मात्र हसत सहन करतात .... आयुष्यभर ...वेगवेगळे विचार ...पायाबरोबर चालतात ...आणी समोर परत गाड़ी येवुन उभी .... आता परत कोण? आणी आश्चर्याने आख्खा हात तोंडात जायचा.... .. रामदेव आश्रमातील पटेल आमचा तीघांचा डबा घेवुन आले होते ... " बाबाजी आपको भोजन करनाही पड़ेगा " सकाळचे त्यांचे शब्द आठवत होते. कोणती दुनियां होती ही , ... समोरून येणारास , काय पीड़ा आहे अस मनात म्हणून .... बाजूचे घराचे सूक्ष्म निरीक्षण करण्याचा आव आणुन त्याच्याकडे लक्षच नाही , असा आव आणणारी दुनियां कुठं .... आणी कुठं हे मैय्यावर भरभरून प्रेम करणारे ... खरच नतमस्तक झालो त्या ग्रहस्थासमोर ... आजुबाजुला झाड नव्हते ... रस्त्यात उन्हातच जेवण ऊरकल त्यांचे आभार मानले व पुढचा रस्ता धरला..... मैया काळजी घेतेच. 5:30 च्या सुमारास सागबारा येथे पोचलो शिवमंदिरात आसन लावलं 20-22 परिक्रमा वासी होते आरती पुजन आटोपल् खिचडी प्रसाद घेवुन बसलो, प्रसादचा फ़ोन ...मामा कुठे आहात ... अर्धातासात हजर झाला ... माझ्यासाठी जेवणाच ताट , डिश , वाटी , ग्लास घेऊन आला होता . माझ ताट विसरलो होतो हे त्याने लक्षात ठेवले ..... मन भरून येणे ...म्हणजे काय ..? अनुभवत होतो .....नर्मदेहर ...
नर्मदेहर ( 21 )
प्रातःकाली स्नान पुजन आटोपून 6:00 वाजता नर्मदेहर करून पुढे मार्गस्थ झालो , सकाळी आठ साडेआठ पर्यंत छान थंडी वाजते नंतर स्वेटर काढावे लागते ...अकरा नंतर घामाच्या धारा सुरू होत , मागच्या दोन तीन दिवसात उन्हाचा प्रभाव जरा जास्तच. माझा पाय आता जास्तच दुखायला लागला सड़क मार्ग तशात आता घाट चढ़ उतार खुपच ... मेकलसूता धाम नर्मदाकुटी येथे दुपारी तीन चे आसपास पोचलो ... बाबाजीन्नी जेवण करावाच लागेल अस म्हणून ताट काढा... आदेश दीला हातपाय धुवुन जेवण केलं थोडे बसलो ....अचानक तळपाय बघितले ..चामडे निघाले होते ... दोन्ही पायाचे तळवे फोड़ येवुन , फुटून बरेही झाले होते , आतुन नव चामडे आलेल होत .... एवढ होऊन मला कोणत्याच वेदना नाहीत ... मैय्याचीच क्रुपा.. उठलो पुढील रस्ता धरला दोन घाट ओलांडून डेडियापाडा येथे पोचलो ... संत जलाराम बाबा आश्रम प्रशस्त होता वर थोड्या उंचीवर परिक्रमावासिन्साठी हॉल होता ख़ाली मंदिर, जेवणबनवण्यास भंडारग्रूह व महंत 1008 सुरेंद्रमहाराज यांची निवास व्यवस्था ... 15-16 ईतर परिक्रमा वासी त्यांचेशी चर्चा परीचय झाला बरेच सहप्रवासी परत भेटतात , सर्वांचा विषय ..... रस्ता कसा होता, भोजन व्यवस्था ठीक होती का यापुरता असायचा ...आरती पुजन आटोपून वाट पहात बसलो ... जेवण तयार झाल्यानंतर प्रत्येक आश्रमात बोलवायची छान पध्दत असते ..घंटा वाजवण्यात येते ...शाळेत असायची तशी ... भोजन घंटा झाली की सगळे लगबगीने आपआपले ताट ,पाण्याचा कमंडलू घेवुन ...चांगली जागा मिळवणं ....आज जेवणात ज्वारीची भाकरी होती ....4-5 दिवसापुर्वी भीसे नाना म्हणाले होते ' ज्वारीची भाकरी मिळायला हवी ' अस म्हणतात मैय्या किनारी कोणतीच ईच्छा अपूर्ण रहात नाही . आता आमची ... ओळख होऊ लागली होती .. ... मी भीसे नानांना म्हणायचो .. " मी मैयाच लाडक लेकरू आहे " अस का म्हणायचो ? आज सांगता नाही येत . जेवण आटोपून अंथरुनातच ...
... नर्मदेहर ( 22 )
प्रातःकाल सकाळी 7 :00 वाजता उठलो , रात्री जेवणाच्या वेळी सुरेंद्र महाराजांनी उद्या एकादशी आहे , कोणीही परिक्रमावासी उद्या येथुन जाणार नाहीत असा आदेशच दीला होता , माझा पायही खुपच दुखत असल्यामुळे आनंदाने आदेश स्वीकारला नित्यकर्म आटोपल्यानंतर आश्रमात फेरफटका मारला , मुख्य रस्त्यावर असल्यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात भाविक, वाटसरूंना , निवारा व भोजन व्यवस्था यात्राकंपन्यांना थांबन्यास सोईचे असल्यामुळे राबता खुप होता , सर्व व्यवस्था चोख होती पाठीमागे जंगल व डोंगर आहेत वनविभागाच कार्यक्षेत्र .... वयौमानानुसार प्रतिवर्षी काही झाड़ी काढली जातात नवीन झाडांना जागा करून दिली जाते अशी तोडलेली झाडे , अवैध वृक्षतोड , जप्त केलेली मोठमोठी झाडांची लाकडे व्यवस्थीत ठेवलेली , वर येवुन कपड़े धुण्याचे महत्वाचे काम ऊरकले . बरेच साधु होते त्यागी , महात्मा , सगळे परिक्रमावासी थंडीने कुडकुडत हॉल मधे व एक त्यागीजी रात्रीचे अकरा पर्यंत हवन करत होते नंतर थाळीत एकदा मिळेल तेच व तेवढेच ग्रहण करणार ... पहाटे चारला उठलो त्यागीजी सप्तशतीचे पठण करत होते .. फक्त लंगोटी लावलेली , एवढ्या थंडीत ..... मनातयेईल तीथे चातुरमास करत या ठिकाणी सोळा दिवस झाले होते , सकाळी सूर्योदयास ते वर डोंगरावर एका पुरातन जीर्ण झालेल्या गणपती मंदिरात ध्यानस्थ होत . सुर्यास्तास खाली येत . तपस्वी ....ते नर्मदापुराण वाचन करून आलेले होते .प्रत्येक स्थान कोणत्या प्रसंगांनी प्रसिद्ध झाले, त्याचे ऐतिहासीक महत्व काय ई. सप्रमाण माहिती .... प्रत्यक्ष नर्मदामैय्याचा भाऊ श्रीगजाननाने येथे तपश्चर्या केलेले ते ठिकाण ... 12:30 चे दरम्यान ..... सित्ताराम ... फरालीकी ... अशी गर्जना ...आपापले ताट कमंडलू ...फराळ साबूदाणा बटाटा खिचडी व खीर , खीर बहुतेक दूधिया व राताळू मिश्रीत अतिशय स्वादिष्ट खीर होती , फराळ नंतर थोडा आराम सायंकाळी गांवात चक्कर टाकली ATM दर्शन ,लक्ष्मीदर्शन , नानांनी केळी घेतली परत आश्रमात आलो , काही वेळ गप्पा मारून होतय तोच .... चाय ... क्की सीत्ताराम ...आपापले ग्लास ..भरगच्च चहा ... अंगात स्वेटर ,कानटोपी ... परत सत्संग जालना ,भोकरदन ची मंडळी होती त्यांचेशी थोडा वेळ बोलून आटोपल्यानंतर आरती पुजन करून परत गप्पा .. पायाला तेल लावून चोळला दोन्ही पायाची तळव्यान्ची दुर्दशा , वेदना अजिबात नाहीत . मैयाचे आभारच.... माझ्याकडुन परिक्रमा करवून घ्यायचीच होती ... बीपी , शुगर , कोलेस्ट्राल , काय म्हणत असतील पता नाही .... विचार करत केंव्हा तरी डोळे मिटले गेले ....
नर्मदेहर ( 23 )
सकाळी सर्व आटोपून 6:00 ला नर्मदेहर केलं , खाली आश्रमात चहा घेतला व मार्गस्थ झालो . सड़क रस्त्याने जात होतो ,कडाक्याची थंडी होती पण चालण्याचे नादात जाणवत नव्हती दोन तासात दोन मोठे घाट पार केले , एका दगडावर बसुन विश्रांती घेतली , (आतापर्यंत पाठीवरील बरेच ओझे कमी झाले होते , अनावश्यक सामान कोठेतरी आश्रमात ठेवुन द्यायचे एखाद्या गरजू परिक्रमा वासीयाला उपयोग व्हायचा ,) परत रस्त्यास लागलो. 10 चे सुमारास घाटीया नावाचे गांवात रामजी देवजीभाई शहा यांनी थाम्बवले फराळ करून पुढं जा .... आतापर्यंत अस अनुभवल होत ..जर कुणी चहाला बोलावलं आणी नको म्हणून पुढे गेलो तर ..... दिवसभर चहा मिळालाच नाही. (अगदी तोंडाने मागुन सुध्दा ) त्यामुळे नकार द्यायचा नाही . पण त्यामुळे वेळ खुप जायचा , पाय दुखत असल्यामुळे बसावं वाटत होत . त्यांचे कडे आज एकादशी होती ...परिक्रमेत आतापर्यंत दोनही वेळ ( व पुढे कीती तरी वेळा लागोपाठ दोन दिवस एकादशी करावी लागलीच) एक दीड तासानंतर बटाट्यांची साबूदाणा घातलेली खिचडी व मही(ताक) मिळाले . नर्मदा तीरी काही भाषा फक्त परिक्रमा वासियासाठी वापरतात (उदा. लंका = मिरची , रामरस = मीठ , मही = ताक , डोलडाल = शौच्यास जाणे व ईतर अनेक नवीन शब्द फक्त परिक्रमा वासीच समजु शकतात .) खिचडीप्रसादी घेवुन पुढं मार्गस्थ झालो देशपांडेकाका विनाकारण एका परिक्रमा वासी बरोबर एका अभंगाचा अर्थ मी सांगतो तेच बरोबर आहे , अस म्हणत निरर्थक वाद घालत होते , त्याच पर्यवसान एकमेकांच्या अकले पर्यंत पोचले .... आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघुन गेलो , हे आता रोजचच झाल होत , नाना व मी लक्षच देत नव्हतो ... रस्ता सुनसान , डांबरीसड़क उन्हामुळे घाट चढ़ उतर त्रासदायकच होतं पाय दुखायचा थांबत नव्हता , पुरती दमछाक झाली होती एका गाडीवाल्याकडे चौकशी केली तीन km वर कबीर आश्रम आहे असे त्याने सांगितले ..पाय ओढत पुढं निघालो ... एखाद तासात कबीर आश्रम मधे , आश्रमाचे चालक दोन अडीच महिन्यापूर्वी अल्प आजाराने स्वर्गवासी झाले होते , आता पूर्वी प्रमाणे परिक्रमावासीयांची सेवा होत नव्हती . आम्ही आत गेलो ... नर्मदेहर .. आवाज दिला एक मध्यमवयिन माताराम समोर आल्या त्या त्रासदायक नजरेने बघत बसा म्हणाल्या , मुक्काम करा पण जेवणाची सोय होणार नाही त्यांनी स्पष्टच सांगुन टाकले .... मला पाया मुळे थांबणे भाग होतं काहीच न बोलता मी चटाईवर आडवा झालो व क्षणात झोपी गेलो ... दहा पंधरा मिनिटात काका हजर झाले ...आमच्यावर लाखोल्यान्चा भडिमार .... अतिशय त्रासून गेलो होतो त्यात काकांनी नको तो शब्द वापरला ... एका तीरीमीरीत उठलो नानांना चला म्हणुन सॅक चढवली काठी कमंडलू उचलून चालायला लागलो सलग नऊ की.मी. चाललो खुटाम्बा गाव लागले हनुमान मंदीर होतं आत जावुन आसन लावलं भोकरदन वाले मंडळी आधीच पोचले होते , अर्धातास ग्लानी आल्यासारखा झोपलो ...नंतर उठून हातपाय धुवून आरतीपूजन केलं ... भोकरदन वाले मंडळींनी गांवात जावून दुकानातून पीठ तांदूळ आणले , तीन मातारामनी स्वयंपाक केला भोजन करून थोडे बोललो ... काही पोळ्या शिल्लक राहिल्या होत्या एका माताराम यांनी तीन पोळ्या कागदात गुंडाळून माझे शबनम मधे ठेवल्या .... राहु देत जंगल रस्ता ... नसल्या असल्यास कामी येतात .. मैया काळजी घेत होती ... झोपी गेलो.
नर्मदेहर ( 24 )
सकाळी उठून अंधारात प्रातर्विधी आटोपून समोरच्या हॅण्डपंपावर स्नान , आरती पूजन आटोपून 6:15 ला मार्गस्थ झालो . पाय सुजला होता त्याकडे लक्षच दिले नाही , घाटात दोन ठिकाणी बसुन आराम दिला पुढे मोठा घाट चढून उतरण्यास दुपारचा दीड वाजला होता एक आदिवासी झोपडी मधे बसायला परवानगी घेतली . रात्री भोकरदनच्या माताराम यांनी तीन पोळ्या बांधुन दिल्या होत्या त्या काढल्या , धुळ्याच्या प्रसादने भरपूर चटनी दिली होती , चटणी व गुळाचा खड़ा दोघांनी जेवण आटोपल् लगेच पुढील रस्त्यास लागलो .परत डोंगर परत घाट रस्ता संपता संपत नव्हता चारचे सुमारास रस्त्यांचे कडेला रिकामी झोपडी होती तिथे थोडे बसलो ..... उठुन परत चालु लागलो तीन चार km गेल्यावर नानांच्या लक्षात आलं .... मोबाईल झोपडीतच राहीला होता .. परत जाऊन घेऊन या, मी इथेच थांबतो ... नको म्हणाले जाऊ द्या ... गेला तर गेला ... निघालो , बराच वेळ चालत होतो अखेर अंधार होता होता राजपीपला गाव आले मोठ गाव ..जिल्ह्याचे ठिकाण चौकशी करता हरसीध्दी माता मंदिरात परिक्रमा वासियान्ची व्यवस्था होते अस समजले ... पुढं परत चार km चालावे लागले . रात्रीचे आठ वाजले.मंदिरात हातपाय धुवून आरतीपुजन केलं लगेचच जेवण मिळाले .नंतर दर्शन करून तिथंच बाकावर बसुन राहीलो ... समोरच्या झाडाचे पारावर .... नर्मदेहर .. असा आवाज देणारे 20-25 कोंबडे निर्भीडपणे वावरत होते ...गंमत बघत बसलो ... खुप वेळानंतर झौपन्यास गेलो ...
नर्मदेहर .. ( 25 )
सकाळी उठुन प्रातर्विधी , स्नान , आरती पुजन आटोपायला बराच वेळ झाला .. हरसीध्दी मातेच्या आरतीचा लाभ झाला , शाळेची मुलांची ट्रीप आलेली होती जवळपास तीनशे मूल मुली होत्या .. त्यामधे आमचा नंबर येणे .... कसतरी उरकून घेतले .नानांना दुसरा मोबाईल घ्यायचा होता. त्यामुळे दुकाने उघडेपर्यंत आम्हांला वेळच होता ... 11:00 -11:30 ला बाहेर पडलो मोबाईल घेण्यात बराच वेळ गेला . परंतु सीमकार्ड मिळाले नाही , आधारकार्ड असुनही लोकलची ओळख द्यावी लागेल अन आम्हास कोण ओळख देणार , तसेच पुढं निघालो घेतलेल्या मोबाईलचा उपयोग शून्य ... राजपीपलाच्या एका चौकात ... " भूत मामाच " मंदीर दिसले .. त्यांच बाहेरून दर्शन घेवुन पुढील रस्त्यास लागलो ... बराच वेळ चालत होतो एका झाड़ाखाली विश्रांती घेऊन परत पुढं चालु लागलो . रस्त्याकडेला हॉटेल होतं चहा साठी आवाज बाबाजी ... चाय पी लौ ... थांबलो ..चहा नंतर पुढं निघन्यास पाऊल टाकले अन टपरी मागुन आवाज ... बाबाजी ..दर्शन लेना है ...इधर आवो ... व्वा आवाज खणखणीत होता मग समोर का येत नाही ... घुटमळलो ..टपरी वाले म्हणाले ..अपंग अंध है ..पाठीमागे गेलो 45-50 चे वय दोन्ही पाय गुडघ्यापर्यंतच डोळे अंध ...चौकशी केली कंपनी कामगार कामावर असताना मशीन ब्लास्ट झाले अपघातात पाय व डोळे ..गेले होते मीच दर्शन घेतले तर रडायलाच लागला , मला पाप लागले अस म्हणाला ... समजूत घातली , मला सेवा घडू द्या .. काय सेवा करणार ... भजन गातो म्हणे . नाशिक जवळच कंपनीत होता मराठी छान होतं .बाजूलाच हार्मोनियम ...ओढून सुरू ..... अपकारी आला द्वारी ऊभा ठेला । दुःखे पिडियेला शान्तवी जो ॥ तोची साधु भला नको टीळे माळा । देवाला कंटाळा सोंगाचा ह्या ॥
अभय अचल मन ते निर्मळ । जैसे गंगाजळ वंद्य लोकी ॥ स्वप्नी परनींदा नसे नीच धंदा । परोपरी बंदा जीवे भावे ॥ .... जिद्द होती त्या ग्रहस्थात परत मनोमनी नमस्कार केला टपरीवरून परत चहा आला ... पुढं निघालो ... पाय आता बरा होता सूज कमी होती व वेदनाही कमी होत्या . हनुमान मंदीर वाटेतच होते ..झुन्डी हनुमान ... थांबलो हातपाय धुवुन आरती पुजन आटोपून बसलो . पुजारीजीना दोन दिवसापुर्वी मंदीर झाडताना एक सिमकार्ड सापडले होते ते नानान्ना दीले . काही वेळानंतर यात्राकंपनीची बस थांबली त्यांनी स्वयंपाक करून आम्हांस आधी जेवु घातले ...घडलेल्या घटनांचा विचार करत शेकत बसलो ... तीथेच झोप लागून गेली.
नर्मदेहर ( 26 )
पहाटे उठलो .... आणी ... आम्ही तीघेच परिक्रमावासी मंदिरात होतो , पुजारीजी व मंदिरातील माताराम तेथे नव्हते ... स्नान आरती पुजन आटोपून उजाडन्याची वाट पहात होतो . थोडसं उजाडल्यावर लक्षात आलं मंदीर रोडवर असल तरी जंगलातच होतं ...पुजारीजी एका मो. सा . वर आले हातांत चहाचा थर्मास गरम गरम चहा, शेकोटी ... व्वा आनंद आला. नर्मदेहर करून पुढे निघालो .. कच्चा पक्का रस्ता तुडवत ... शुळपाणी ... नवीन उंचावर बांधण्यात आलेले मंदीर ..छान परिसर , का कुणास ठावूक पण तो परिसर फौजी जवानांच्या देखरेखीखाली होता , पुजारीजींसी बोलायचा प्रयत्न केला ते फारसे उत्सुक दिसले नाहीत ... तुरळक दर्शनार्थी येत होते , ख़ाली दोन तीन यात्राकंपनीच्या बस थांबल्या होत्या त्यांचे स्वयंपाक जुळवा जुळव चाललेली होती .... जुन्या शुळपाणी मंदिराविषयी खुप ऐकलेल होतं ... पण धरणाच्या पाण्याख़ाली गेल्यामुळे आम्हास दर्शनयोग नव्हता , थोडा वेळ बाकावर बसुन राहीलो . डोम्बीवलीचे परिक्रमा वासी भेटले त्यांचेशी गप्पा मारताना त्यांनी जुन्या मंदिराविषयी बरंच सांगितले ... एकंदरीत .. जुन्या मंदिराचा बराच पैसा पुजारीजिंना मिळाला होता , शासनाने नवीन मंदीर बांधून दिले होते ...पण .....असो. दर्शन घेवुन पुढे निघालो . हरीधाम आश्रमात पोचलो . प्रशस्त आश्रम , खुप मोठी गोशाला 40-45 गायीं असतील , 25 -30 परिक्रमा वासी थांबलेले होते , आम्हीही आसन लावलं काही उदासीन संप्रदायी साधु होते त्यांचे बरोबर बोलत बसलो, नंतर उठुन नाना व मी मैय्याचे दर्शनास गेलो 8 -10 दिवसांपासून मैयाचे दुर अंतरावरून चालत होतो ... विस्तीर्ण पात्र होते खडक मोठमोठे होते ...पण ....पाणी कमी होते , मन खट्टु झाले . थोडा वेळ बसुन परत आश्रमात आलो ... आश्रमात लगबग सुरू होती रोज जवळपास 300 लोकांच जेवण तयार होत असतं , आश्रमात आदिवासी मुलांची शिक्षण , जेवण , राहणं सर्व होतं , वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी आलेले होते , शिक्षणाबरोबरच मुलांना वेदांचे शिक्षण होते .... एक ज्ञानवंत पुढील पिढी समोर होती , त्यांचे दैनंदिन कार्यक्रम होते पण आम्हांस ते नवीन होतं , त्यांच्या तालबध्द व उच्च स्वरातील स्पष्ट मंत्रोच्चारा मुळे वातावरण भारलेले होते ... एक तास आम्ही हल्के पिसासारखे होऊन त्या अदभुत मंत्रोच्चारावर तरंगत होतो ... ॐ शांती..शांती शांती ... एकदम स्तब्धता .... सर्व मुले बाहेर आले व बालसूलभ गोंगाट ... खूपच छान वाटत होतं , खुप मुलांची चौकशी केली , नंतर आरती पुजन भोजन आटोपून थोडा सत्संग .... पाय पुर्ण बरा झाला होता नंतर झोपीगेलो ...
नर्मदेहर ( 27 )
प्रातःकाली उठून स्नान आरती आटोपली चहा घेऊन मार्गस्थ झालो , मैयाचे किनाऱ्याने जात होतो , हिरवागार मखमली गालीचा खुप आनंददायक प्रवास होता तो. वसंतपुरा ओलांडून पुढे निघालो ,पंचमुखी हनुमानजीचे दर्शन घेवुन पुढं , आज मैया किनाऱ्याजवळच् खुप जुने व इतिहास असलेले मंदिरे होती माहीती घेत व दर्शन करीत जात होतो , गुजरातचा हा सुपीक ,सधन भाग मोठमोठ्या केळीच्या बागामधून रस्ते होते , एखाद्या बागेत पाणी दिलेले असेल तर हाल होत होते घसरण व चिखल स्वतःला सांभाळत चालणे ...कसरतच होती वरुणेश्वर ,इंद्रेश्वर , व्यासेश्वर , आनंदेश्वर असे महादेवांचे अनेक मंदीरे सर्वांचे आपापले वेगळा इतिहास व वैशिठ्य होते , प्रत्येक बांधकाम 200-250 वर्षपूर्वीचे ... ज्या गावात प्रवेश करू त्या गावात 10-12 बिस्किटपुडे मिळायचे .... नाही म्हणायचे नाही ,पण ठेवायची कुठं ...मग गावाबाहेर पडताना गरीब मुलांना वाटुन द्यायची चॉकलेटची पिशवी बरोबर असायची , गावात शिरलो की लहान लहान मुले ... नर्मदेहर ..नर्मदेहर अस ओरडत यायचे त्यांना चॉकलेट द्यायचे , नर्मदा परीक्रमेत बहुतेक सर्वच परिक्रमावासी हे करतात ... त्यामुळं मुलांमध्ये परिक्रमावासी खुप प्रीय आहेत ...आनंद घेत निघालो होतो . योगानंद आश्रमात थांबलो भोजन करून लगेच पुढं निघालो आकाश भरून आलेले होते पावसाची शक्यता वाटत होती , बराच वेळ चालत होतो सायंकाळी 5:30 चे सुमारास मांगरोल तपोवन आश्रम पूर्नानन्द सरस्वती ( खिडकीवाले बाबा) यांचे आश्रमात मुक्कामी पोचलो ...... याच आश्रमात फेब्रु.2017 मधे मला मैयाचे पहिल्यांदा दर्शन झाले होते व परीक्रमेची प्रेरणा मिळाली होती , आसन लावुन आधी घाटावर जाऊन मैयाच दर्शन घेतले , बसुन राहीलो ... घाटाचे बाजूलाच दगड गोटे जमा करून मोठी टेकडी बनवून त्यावर छोटी झोपडी बनवली होती ... तेथे विक्षिप्त साधु होता पूर्वी मी आलो तेंव्हा माझे मित्र श्री सालुंके यांनी त्या साधु विषयी सांगितले होते तो कीती विक्षिप्त आहे हे माहीती असल्यामुळे त्याची भीतीच वाटली अंधार होताहोता परत वर आश्रमात आलो , श्री पोटे , भोपळे हे जालना,भोकरदन वाले आलेले होते त्यांचेशी थोडे बोलुन आरती पुजन आवरले काही वेळात जेवणाची घंटी वाजली जेवण करून निद्रिस्थ झालो .
नर्मदेहर( 28 )
तपोवन आश्रमात सर्व दैनंदिन कार्यक्रम आटोपून 6:30 ला नर्मदेहर करून मार्गस्थ झालो , वातावरण बिघडलं होत आकाशात ढग दाटून आलेले होते. कोणत्याही क्षणी पाऊस सुरू होऊन रस्त्यातच गाठेल असा अंदाज होता , माघारी परत जाता येत नाही व पुढे 13 km वर सीताराम आश्रम , कपड्यासहित भिजलो तर पुढील प्रवासात ओल्या कपड्याचे ओझे ... थोडी काळजी होतीच , जे व्हायचे ते होईल ..निघालो पुढं पायाला चाकं लावल्यासारखे झपाट्याने निघालो . थंड गार वारा सुरू झाला ... रस्ता सुनसान विचारपूस करायची तर कुणीच दिसत नव्हत ... 9 km अंतर कापलेवर जेसलपुर गाव आले चौकशी करता पुढे काही अंतरावर आश्रम असल्याच समजले ...गावात एका घरातुन चहा मिळाला ... थंडी मुळे गारठुन गेलो होतो , बरे वाटले . लगेच पुढं निघालो ... 4-5 km गेल्यावर पावसाला सुरवात झाली पण जोर कमी होता ... काही वेळातच आश्रमात पोचलो .. समोर पत्र्याचे शेड मधे कपड़े वाळायाला टाकले , माताराम यांनी चहा दीला . पावसाचा जोर वाढला होता . आश्रमात सीताराम महाराज , त्यांच्या पत्नी ( माताजी ) व एक दत्तक कन्या तिघंच होते . थोड्याच वेळात जेवणाची तयारी जेवण करून गप्पा , आम्हास पत्र्याचे शेडजवळच छोटी खोली होती , बाहेर शेड मधे जागा होती तेथे धूनी होती त्यात लाकडे टाकून शेकत बसलो ... महाराज व माताजी मुम्बईचे होते 30 वर्षापासुन नर्मदातटावर सेवा करतात . मराठी छान बोलत होते .त्यांनी तीन आदिवासी मुली दत्तक घेवुन त्यांना पदवीधर करून त्यांचे लग्न करून दिले , आता सगळ्या आपापले संसारात आनंदात आहेत . बोलणे चालु असतानाच महाराज त्यांचे खोलीतुन आले ... अरबी समुद्रात ओखा वादळ सुरू झाले असुन पुढील चार पाच दिवस पावसाळी वातावरण रहाणार अशी बातमी दिली ... आमचे मात्र धाबं दणाणलं ... आम्ही समुद्रापासुन सहा_ सात दिवसाचे अंतरावर होतो .... बाहेर धो धो पावसाचा आवाज येत होता ... पत्राचे शेड वर होणाऱ्या आवाजाने त्याची तीव्रता जास्तच वाटत होती .... दिवसभर ..स्वेटर टोपी , शेकोटि .. डोलडालसाठी (शौच्यास) व लघुशंके साठी दुर जंगलाकडे जावे लागायचे तेच जास्ती त्रास दायक होतं रात्री पर्यंत आणखी तीन भिजून चिंब झालेले परिक्रमा वासी आले होते .. रात्रीची आरती पूजन आटोपून खिचडीप्रसादी भोजन आटोपून पावसाचे संगीत ऐकत कधीतरी झोप लागली ...
नर्मदेहर ( 29 )
रात्रभर मध्यम पाऊस चालूच होता थंडी छानच होती , प्रातर्विधी साठी मैया कडे निघालो बराच उतार उतरून जातांना घसरण झालेली होती , काट्यांकुट्याचाच रस्ता ..... आम्ही मैयाची लेकर तिच्याच विश्वासावर बागडत होतो .... ख़ाली उतरलो चिखल होताच एका दगडावर कपड़े ठेऊन स्नान उरकूनघेतले पाणी गरम होतं ... आश्रमात आलो पाऊस थांबला होता चहा घेऊन नर्मदेहर केलं महाराज बाहेर आले ..जरा रागातच बोलले ... परिकम्मा पुरी करना चाहते हो ? हो म्हणालो ... ये बारिश ... पता है ये नर्मदा तट है... तुम्हारा आँगन नही . यहाँ पल मे कुछ भी हो सकता .... फीजुल का दम मत दिखाओ ...आज यहीं पर रुकना ... सॅक जागेवर ठेवून दीली . माताराम बाहेर आल्या .. थोडा .... बालभोग(नाश्ता) कर लो और रामेश्वर , कुम्भेश्वर , शनी पनोती इनके दर्शन कर आओ ...जबतक भोजन बनेगा , आपल्या हाती होतच काय ? नाश्ता केला , माताजीन्नी रामेश्वर, कुंभेश्वरचा रस्ता सांगीतला . आधी रामेश्वर , रावणवध केल्यामुळे प्रभुंना ब्रम्हहत्त्या पातक लागले . गुरु वशिष्ठ यांनी नर्मदातीरावर तप करा , पातकातून मुक्ती मिळेल ... श्री रामांनी येथे तप केलं ... अतीशय पुरातन मंदीर एक म्हातारा साधु 22 वर्षापासुन एकटाच येथे रहातोय ... दर्शन घेतले , साधुबाबांना नमस्कार केला ..त्यांनी पेरू रूपी प्रसाद दिला व पुढे कुंभेश्वरला जाण्याचा मार्ग दाखवला , घाट उतरून किनाऱ्याजवळच्या रस्त्याने निघालो 2- 3 km वर कुंभेश्वरला ... शनीदेव यांना क्रोध कमी करने वर उपाय ...येथे तप करावे अस सांगण्यात आले त्यानुसार शनीदेवांनी येथे तप केलं (सपत्नीक) दोन पत्नी सह ... पनौती हे त्यांच्या पत्नीच नांव , छोटी पनौती व मोठी पनौती ...त्यांचही मंदीर इथं आहे. सोमण म्हणून महाराष्ट्रीय कुटुंब येथील व्यवस्था बघतात . परिक्रमावासी महाराष्ट्रीयन 4माताराम व 2 महाराज असा 6 जणांचा ग्रुप भेटला नागपूर ,मुंबई व पुणे वेगवेगळ्या ठिकाणचे सर्वजण होते , त्यांचेशी थोडे बोलुन आम्ही आमच्या आश्रमाकडे निघालो . आश्रमात जेवण करून विश्राम दुपारनंतर पावसाला सुरवात, दोन अडीच तास छान हजेरी लावुन पाऊस थांबला होता . परत बाहेर पडलो गावात गेलो .एका मंदिराजवळ बसलो , लोक आमची व आम्ही गावाची विचारपूस .... रामायणात या गावाचा उल्लेख आहे .. एक ग्रामवासी सांगत होता , या गावाचे नांव ... शतजोतीशपुर .. असा तुळशीरामायणात आहे ... सांगताना त्याचा चेहरा ..अभिमानाने फुलल्याचे जाणवलं . थोड्या वेळानंतर परत आश्रमात ... हातपाय धुवुन आरती पुजन आटोपल .. लहानभाऊ संजयचा फ़ोन आला , का कुणास ठाऊक पण त्याच्याशी बोलल्यानंतर घरी जाऊन आल्या सारखे वाटते. लवकरच भोजन आटोपून ...8:00 ला अंथरुनावर .....
नर्मदेहर ( 30 )
सकाळी उठुन प्रातर्विधी स्नान आरती आटोपली , माताजिंनि चहा दीला, चहा घेतांना महाराज यांनी सांगितले ...पुढील 10-11 दिवस समुद्री वादळामुळे समुद्र पार करता येणार नाही, समुद्र शांत होई पर्यंत होड्या समुद्रात जाणार नाहीत .... आमच्या बरेच पुढे मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसींगजी पायी परिक्रमेत आहेत , त्यांनी काल समुद्र ओलांडला त्यांना सोडण्यास गेलेल्या 3 होड्या समुद्रात बेपत्ता झाल्या आहेत , त्यामुळे होड्या बंद रहाणार ... महाराज TV वरील , फ़ोन वरील बातम्या आम्हांस पुरवत होते ... आणखी 2-4 दिवस येथेच राहुन जा असा आग्रह करत होते... आमचे तीथे दोन मुक्काम झाले होते ... परिक्रमेच्या नियमानुसार अजुन एक मुक्काम करू शकत होतो ...पण अचानक मला निघायची ईच्छा झाली ... महाराज व माताजी यांची क्षमा मागितली व नर्मदेहर करून सॅक, कमंडलू काठी उचलुन चालु लागलो ... .. ढग होतेच पण भीतीदायक नव्हते ...8 -9 km एका फाट्यावर चहा घेतला ... नीलकंठधाम ,हनुमंतेश्वर हे ठिकाने बाजूला5-6 km वर होते ... तिकडे न जाता ...रुंडगांव कडे जाणाऱ्या रस्त्यास लागलो , रस्ता अवघडच होता जंगल भाग .. भूल भुलैया झाल्यासारखे जंगलातच फिरत होतो ..एका गुराख्यांस विचारले .. त्याने गावाकडे जायचे रस्त्यास आणुन सोडले ... गावात पुढील रस्ता विचारून आश्रमाकडे जाऊ लागलो आश्रमाचे अंतर 4 - 5 km असेल .... पण भयानक घनदाट जंगलातुन वाट होती पोहचेपर्यंत जिवात जीव नव्हता . कसे तरी आश्रमात पोचलो ... आश्रम अतिशय दुर्गम ठिकाणी होता . वेगवेगळ्या सहा सात झोपड्या होत्या , त्यामधेच परिक्रमावासियान्ची व्यवस्था होती जवळपास 20 -22 परिक्रमावासी होते काही चातुर्मास करणारे साधु होते . नारायणदासजी महाराज तेथील व्यवस्था बघत होते . पोचल्याबरोबर कोठून निघालात अशी चौकशी झाली . वरण भाताने गच्च भरलेली ताट समोर आली चार वाजत होते , जेवणवेळ नव्हतीच पण तेवढे सम्पवावेच लागले त्या आश्रमा व्यतिरिक्त ईतर कुठं मनुष्य वस्ती नव्हती , खुप उंचावर होतो खुप खोल मैया वहात होती ... दुसऱ्या बाजूने कर्झन नदी आलेली ..त्या संगमावर आम्ही होतो ... बाजूला एका ओसाड गावाचे भग्न अवशेष होते ... 1968 मधे नर्मदामैयाच्या महापूरात ते गांव पुर्णपणे नामशेष झाले होते , नारायणदासजी माहीती सांगत होते . बराच वेळ ते आक्राळविक्राळ मैयाच सौंदर्य बघत बसलो होतो , सूर्यदेव ख़ाली झाडीत निघून गेले संध्याछाया गडद होत होत्या ...आम्ही आश्रमाकडे निघालो . सायंपुजन आटोपून ईतर परिक्रमावासियान्बरौबर वादळ व पुढील प्रवास बाबत चर्चा... समुद्राजवळ विमलेश्वर येथे जवळपास 4000 चे जास्त परिक्रमावासी थांबलेले होते . पाठीमागील परिक्रमावासीयांनी आहेत तिथेच थांबावे ... प्रशासनाने सूचना दिल्या होत्या .. आश्रमात उंदीर बरेच होते .. बराच वेळ झोप लागलीच नाही
नर्मदेहर ( 31 )
प्रातःकाली उठून प्रातर्विधी ,स्नान , आरती पुजन आटोपून निघायचे म्हणताच नारायण दासजी महाराज यांनी अडवले , आज जाना नही एकच हट्ट . आमचे सामान ठेवायलाच लावलं , आम्हांसही घाई नव्हती .पुढे समुद्राजवळ जाऊन तरी काय करणार , 8 -10 दिवस होड्या बंदच राहाणाऱ असल्यामुळे तेथे जाऊन अडकून पडण्यात अर्थ नव्हता , माझे ग्रुप वरील काही मित्र तेथे तीन दिवसांपासून थांबले होते . त्यांना फ़ोन करून चौकशी केली तर ...वीमलेश्वर येथे 500 परिक्रमावासियांचि व्यवस्था रोज होते ,मागील 3-4 दिवसात चार हजारचे आसपास लोक येथे आहेत त्यामुळे खूपच गैरसोय होत आहे , पाणी जेवण राहण्यास जागा सर्व कमी पडत आहे ... तुम्ही सध्या आहात तेथेच थांबुन जावे ... असा स्पष्ट सल्ला मिळाला ... नारायणदासजी महाराज यांचे ऐकून ठीक आहे ... रुक जाते है म्हणताच त्यांना आनंद झाला , ईतर काही परिक्रमावासी जाण्यास निघाले ... नारायणदासजी रडायलाच लागले .. ... पण ते थांबले नाहीच . आम्ही तेथे फिरणे व निसर्ग सौंदर्य बघण्यात वेळ घालवला ... हे दुर्गम भागातील ठिकाण कुणाचेच लक्ष नाही. नारायणदास महाराज हे डेडियापाडा येथील श्री 1008 सुरेंद्रमहाराज यांचे शिष्य , सुरेंद्र महाराज यांनी ही जागा पाहून यांना आश्रम करुन दिला .. सर्व साहित्य सुरेंद्रमहाराजच पुरवठा करतात , इथे नितांत सुंदरता , शांतता , .. जुन्या रूंडगावाचे अवशेष दर्शनीय आहेत .. लक्ष्मीनारायण मंदिराचे अवशेष पहाताना ..त्या भिंतीची रुंदी पाहून थक्कच झालो 10 फुट रूंद .. 50 वर्षा पूर्वी गांव वाहून गेले पण इतिहासाच्या खुणा तेंव्हाच्या वैभवाच्या साक्षी होत्या दुपारी भोजन करून विश्रांती घेतली ... परत भ्रमंती केली ... पण आश्रमापासुन दुर जाण्यास ... का कुणास ठाऊक भीती वाटत होती ... सायंकाळी आरतीपूजन आटोपून भोजन व नंतर विश्राम .... नारायणदासजी महाराज अगदी लहान मुलांनसारखेच वागतात .. त्यांनी रात्री रामायण वाचले पण .... नंतर झोपी गेलो ...
नर्मदेहर ( 32 )
सुंदर सकाळी निघायचे ठरवले बालभोग घेऊन जा ,नारायणदासजी यांचा आग्रह ...थोड्याच वेळात गोड भजे( गुलगुले ) तयार झाले पोटभर खाऊन 8:30 ला नर्मदे हर केलं ... खाली कर्झन नदीचे पात्रातून जायचं होत , अवघड दरडी होत्या मातीचे ढिगारे पाय ठेवल्याबरोबर ढासळत होते सावध राहुन पाय ठेवत होतो , थोडे लक्ष भरकटले तर 10-12 फुट काट्यात पडायचे , हळु हळु खाली बसत झाडांचा आधार घेत उतरलो . कर्झन नदीचे संगमावर मैयामधे रुद्र कुंड आहे ... स्नान पुजन करायच होत , नारायणदासजींनी रुद्रकुंड... नावाप्रमाणेच आहे अस सांगितले होते ...सुरक्षीत जागा बघुन स्नान आटोपून आरती पुजन केलं . मैयाचे काठाने पुढं निघालो ..काठावर वाट बिकट होती अनेक काटेरी झाड़ी ,मोठे गवत , खडक ओलांडत दोन वेळा वर चढून परत ख़ाली उतरून मैया काठी झाड़ाखाली विसावा घेऊन पुढं ... गांव नव्हतच ..जुने मंदीर खुप होते त्या भोवती जंगल झाड़ी मंदिरात जायचं कठीण होत.. श्वापदं असण्याची भीती होती ... बरंच चालल्या नंतर अखेर वर जाण्यास रस्ता मिळाला ... काही अंतर गेल्यावर एक आश्रम दिसला ...किर्र जंगलात इतका सुंदरआश्रम ....खुप मोठा परिसर ... नीरव शांतता मोठ मोठ्या झाडात लपलेला , " स्वर्ग आश्रम " सर्व काही सुविधायुक्त परदेशी साधकांना अभ्यास , संशोधन , ध्यान , तप , निवास ...सर्व जर्मन , ऑस्ट्रेलियन विवीध देशातील , बहुतेकांचे हातात पुस्तक किंवा कॅमरा कोणीही एकमेकांशी बोलत नव्हते आम्ही आत जावून पाणी घेतले , थोडं बसलो ... नर्मदेहर ... करून पुढे निघालो मागुन तेथील स्वयंपाकी आवाज देत आला .... बाबाजी भोजन करलो ... ये साधक बात नही करते , भोजनसमय सब यहा आते ... बाकी समय मैय्या किनारे या अपनी कुटी ... कुछ पुराने मंदीर मे अपनी अपनी भक्तीमे तल्लीन रहते ...आपभी भोजन पां लो .... भोजन केलं पुढे मार्गस्थ झालो वरखेड गांव ... एक ग्रहस्थ बाहेरगांवी निघालेला ... एका मुलाला आवाज दिला ... आम्हांला त्याच्या घरी पाठवले ... हे बस मधे बसले .. आम्ही घरी .. मुलाने आतुन चटाई आणुन बसवले ..चहा बिस्किट घेऊन पुढं कोटेश्वर महादेव मंदिरात मुक्कामी ... मंदिरात पोचल्यावर प्रथेप्रमाणे हजेरी .. शिक्का ... आणखीही परिक्रमा वासी होते ... आरतीपुजन आटोपून भोजनप्रसादी .. थोडा सत्संग , दोन जण पंढरपूर जवळचे ,त्यांचेशी थोडे बोलुन ... नीद्राधीन झालो ...
नर्मदेहर ( 33 )
प्रातःकाली सर्व आटोपल , टाकीवर स्नान , आरती पुजन ...वातावरण आता साफ झाले होते ..पण थंडी ..कडाक्याचीच होती व्यवस्थीत शांततेत आंघोळ नव्हतीच कसातरी नंबर लागल्यावर पाणी ओतायच ,सगळं अंग भिजले अस वाटले की ... आटोपायच . त्यामुळे पाय उलायला लागले होते , भेगा पडुन रक्तही यायच ... परिक्रमेत अश्वथामा भेटतो व तेल मागतो अस म्हणतात ..त्याला तेल दिले ... तर श्रीकृष्णाचा अनादर करने , तेल न दिले तर अश्वथामा यांचा अनादर करून ..खोटे बोलणे ... त्यापेक्षा तेल जवळ ठेवणच नको अस ठरवुन तेल घेतले नव्हते ... त्यामुळे पाय कितीही दुखले तरी तेल लावुन चोळू म्हणायचे नाही .. व भेगा पडल्या तरी लावायला तेल नाही ... पाय , हात एकंदरीत सर्व शरीरच कडक होतय अस जाणवत होतं . समुद्र अजुन सहा दिवसाचे अंतरावर होता पण तेथील गर्दी मुळे रमत गमत चालु होतं 8-9 km वर कांदरोज नावाचे ठिकाण ... कार्तिकेश्वर महादेव मंदीर ... परिसर मोठा ,छोटे मंदीर ... थंडी मुळे चहाची ईच्छा होती ..आत गेलो संपुर्ण आश्रम रिकामा चिटपाखरु सुध्दा नाही थोडे बसलो पाणी पीलो ... परत उठुन चालु लागलो दोन तीन तास चालत होतो राजपूर गांव ... एका घरातुन आवाज ... महाराजजी...रुक जाइए .. चाय लोगे..? व्वा .. मैय्या , सलग चार घरातुन चहासाठी आवाज ... चहाचा कंटाळा नाहीच .. सर्वांचा चहा घेवुन पुढं .. रस्ता ..नव्हताच .कधी किनाऱ्याजवळुन, कधी दुर टेकडीवरुन ,चिखलातुन तर कधी दगडागोट्यामधून .. ओरछा ( वराछा ) गांवी पोचलो , जेवण मिळाले ..मैया सर्व काळजी घेते ... परत पुढं ... रस्ता अक्षरशः रडावंस वाटत होत ..सैन्डल तुटली होती , दोरीने बांधून ओढत होतो .. सायंकाळी 6:30 चे सुमारास "आशा " नावाचे गांवात दगडूमहाराज आश्रमात पोचलो ... सुंदर ,भव्य ...प्रसन्न असा आश्रम कपालेश्वर, कोटिश्वर महादेव मंदीर ...या आश्रमात व्रध्द व निराधार यांची विनामूल्य रहाणे भोजन ई. व्यवस्था आहे .अनेक महाराष्ट्रीयन आहेत .. नित्यपूजन आरती आटोपून खिचडीप्रसादी भोजन करून ....विश्रांती..
नर्मदेहर ( 34 )
प्रातर्विधी आरती पुजन आटोपून अंधारातच .. नर्मदेहर .. केलं 2 km वर पंचमुखी हनुमान मंदिरात , मंदीर सुनसान होत , बाजूला आश्रम होता ... झाड़ी बरीच होती व वानरराज खुप व मोठे होते आम्ही पौचताच 7-8 झाडावरुन आमच्या स्वागताला ख़ाली ... सगळे मंदिराचे प्रत्येक पायरीवर एक असे.... त्यांची भक्कम शरीर यष्टी , काळे मुख , हसल्यावर दिसणारे लांब लांब सुळे , धडकी भरवत होते , मोठ्याने नर्मदेहर करूनही आश्रमातुन काहीच प्रतिसाद नाही ... धाडस करून मंदिरात निघालो हल्ला केला तर बचाव कसा करायचा ? ... पायातील सँडल काढले .. सॅक पाठीस व काठी ..हातातच .. पायरी चढलो तसे दोघे चार पायावर उभे ... शेपटी ..उंच .. .. नर्मदेहर ... मोठ्याने ओरडलो ... ते शांतच दूसरी पायरी चढलो .. पाठीमागून साधुमहाराज ओरडले ..तसे सर्व वानरसेना झाडावर ... साधु बाबा ब्रश करत होते ...हनुमंत दर्शन करून बाहेर आलो चहा घेण्याची ईच्छा होती ... पण यहा पर चाय बनतीही नही ...अस म्हणुन बाबानी .... वाटान्याच्या अक्शदा ... थोडे बोलत उभेच उभे होतो ...(रोज मुक्कामाच्या ठिकानाहून निघतांना त्या दिवसांत लागणारे ठिकाणे बघुन घेत असु) गीरनारी गुंफा कडे जाण्यास रस्ता विचारला .... कोई जाता नही ..सिर्फ पूछते ... और तुम्हारे महाराष्ट्र वाले .... सब ..नौटंकी वाले ... एक भी ... ढंगसे परीक्कमा नही करता ... नही जा पाओगे तुम गीरनारी ... त्या आक्रमणाने आश्चर्यचकीत ... क्या हुवा महराज..? बाबाजी आणखी गरम.. बोला ना ..रास्ता खतरनाक है नही जा पाओगे... चहा तर नव्हताच ... आता नीघनेच बरे ...पुढे . बराच वेळ चालत होतो काही सड़क ,काही खराब , थोडा किनारा ...चहा मिळालाच नाही ... दुपारी दीड दोन चे सुमारास ...इन्द्रेश्वरमहादेव मंदिरात ... कुंभेश्वरला भेटलेला सहा जणांचा ग्रुप बसलेला होता ... थोडे बेलाचे पिकलेली फळे खाल्ली , येथे .. शेन्दूराचे झाड पहाण्यास मिळाले , मी पहिल्यांदाच पहात होतो...फुलें पांढरा काळसर ..हातावर घेऊन कुस्करले की शेंदूर तयार... कसला तरी भंडारा कार्यक्रम होता महाराज स्वतः लक्ष ठेवुन होते तरुण मंडळी झटत होती ...भोजन आटोपल् बाबाजीना नमस्कार केला ... स्थान महात्म्य विचारले .... इंद्राने व्रक्त्रासूर राक्षसाचा विश्वासघाताने वध केला ..व्रक्त्रासुराने मारताना इंद्रास शाप दिला ...सर्वांगावर कोड फुटेल ... आणी झाले तसेच ..इन्द्र तोंड लपवत राहातात ..गुरु ब्रहस्पति ,ब्रम्हा ,विष्णु , महेश .. सर्वांनी असमर्थतादाखवली , नारदांनी नर्मदा तटावर तप करण्यास सांगितले ... शाप मुक्त... पुढं मार्गस्थ झालो वेळूगांव ओलांडल भावपुरा येथे..विजयकॄष्ण कुटीर या आश्रमात पोचलो , काही वेळानंतर त्या सहा जणांचे ग्रुप मधील ... काका काकू येवुन पोचले ..आरती पुजन नंतर भोजन ... व निद्रादेवीच्या कुशीत ....
नर्मदेहर ( 35 )
सकाळी प्रातर्विधी , आरती पुजन करून 7:00 वाजता नर्मदेहर करून मार्गस्थ झालो जबलपुरचे ( आता पुण्यात ) काका काकू आज बरोबर होते . भावपुरा येथुन निघताच खराब रस्ता सुरू झाला , टेकड्या उतर चढ़ ,निसरडा रस्ता , झाड़ी ओलान्डत सरसाड येथे गुप्त गोदावरी येथे पोचलो दर्शन व थोडी विश्रांती घेवुन पुढे .. काका व काकू 75 व 71 वर्ष वयाचे होते चालताना त्रास होत होता पण त्यांची जिद्द कमालीची होती ... मागे पुढे चालत शाश्वत मारुती धाम येथे पोचलो .. दर्शन घेवुन थोडे बसलो ... 30 -35 परिक्रमा वासी होते काही साधु होते , भोजन आटोपून पुढे शुक्रेश्वरमहादेव दर्शन घेतले .. नाना व मी बरेच पुढे गेलो होतो एक लहान नदी ओलान्डायचि होती उतार होता ठिसुळ डगरी होत्या कसतरी उतरलो नदीच पाणी वेगवान होत 20 -22 फुटाचे झाडाचे लाकडावरुन पलीकडे जायचे होते , तोल सांभाळत जायचे होते .. जीव मुठीत .. कसे तरी पलीकडे पोचलो डगर चढ़ने खतरनाकच होत . पाठिवरिल ओझे सांभाळत कसतरी वर गेलो ... घामाघुम झालो .. आणी मनात आले ... .. काका काकू कस चढतिल ? इथे त्यांच कस होईल .... ते येई पर्यंत थांबु . अर्धा पाऊण तासाने ते आले . पलीकडुन त्यांचे नर्मदेहर ऐकू आले .. त्यांना उतरून येणे अवघड होते परत उतरून पलीकडे गेलो दोन चकरा मारून आधी त्यांच सामान आणुन ठेवले . नंतर आधी काका त्यांची काठी त्यांच्या डाव्या हातात आधारासाठी माझ्या काठिचे एक टोक माझ्या हाती दुसर् काकाच्या .... अश्यारितीने लाकडाचेवरून आलो पुढे नाना वर घेऊन गेले .. आता काकू ... त्यांना लाकडाचेवरून जाणे जमेचना माझ्या दोन्ही हाती दोन काठी ... मी पुढे काकून्चे दोन्हीहात माझ्या दोन्ही खांद्यावर ... आम्ही लाकडावर .... तो 20 -22 फुटाचा प्रवास लवकर संपत नव्हता ... दोघेही नर्मदेहर जप करत होतो .. पलीकडे पोचलो आता डगर चढायला ... काकुन्ना तोल सावरण् जमत नव्हते छातीवर..खड़ा चढ़ होता त्यांना आधारासाठी मी त्यांचे मागे होतो .. असहायतेने काकू रडु लागल्या ... तिसरा माणूस उभे रहायला जागा नव्हतीच , काका वर उभे तेथुन सूचना चालु होत्या ... त्या कामाच्या नव्हत्याच ...10 मिनीट तसेच थांबलो .... नानांना समोर बोलावले काकुच्या हातातील काठीचे एक टोक नानाच्या हाती दिले व काकून्चे पाय उचलत योग्य ठिकाणी ठेवत एक एक टप्पा ओलांडला ..वर अर्धातास विश्राम केला व पुढे निघालो .... आज त्यांचे मदतीसाठीच मैयाने आमची नियुक्ती केली असावी ... पाच वाजेच्या सुमारास भालोद येथे पोचलो ... एक मुखी दत्तात्रेय प्रभु .... दर्शन घेतले तेथील प्रतापे महाराज ( महाराष्ट्रीयन ) यांचे दर्शन घेतले , त्यांचेशी चहा घेत बोलत बसलो ... दत्त मूर्तीची सुरस हकिगत त्यांनी सांगीतली ... ऐकताऐकता तूरीच्या शेंगा निवड्ल्या ...रात्रीच्या जेवणात आमटी साठी ....काकांच्या ग्रुप मधील चौघं आधीच पोचले होते , त्यांच्यात काही तरी कलह चालु होता ...त्या तीन माताराम व ईतर काहीनी भोजन बनवले 15-16 परिक्रमावासी होतो ... आरतीपुजन वभोजन झाले ...प्रतापे महाराजांनी सत्संग केला , ते पुर्वी महाराष्ट्रटाईम्स चे वार्ताहार होते ... खुप अनुभवसंपन्न व्यक्तीमत्व रात्री 12:30 पर्यंत बोलत बसलो होतो . नंतर झोपलो ...
नर्मदेहर ( 36 )
सकाळी प्रातर्विधी , स्नान पुजन आटोपले चहा घेवुन मैया कडे गेलो बरेच लोक होते ... आणी .... मैय्या ...मैय्या ... एकच गलका .60-70 फुट अंतरावर किनाऱ्यावर एक मोठी मगर .... सर्वजण बघायला धावलो . 10-12 फुट लांबीची ... मस्त उन्हात पहुडलेली होती .. गर्दी वाढत होती व तीने नदीकडे प्रयाण केलं , आम्ही होतो तिथुन दर्शन घेतले . परिक्रमाकरत असताना मगर दर्शन व्हावेच अस बरेच जण सांगतात . ऐटीत ती नदीत शिरली व काही वेळात अद्रुश्य झाली ... आम्ही मंदिरात परत आलो , प्रतापे महाराज दत्त प्रभुंची पूजा करत होते . 15-20 मिनिटात आटोपल्यानंतर आम्ही बोलत उभेच होतो ... अचानक एक मोर मंदिरात प्रवेश करत होता .... तो टेन्भेस्वामीन्चे मूर्ती समोर ... प्रतापे महाराज त्याला शेंगादाने खाऊ घालत होते .. सगळे ते द्रुश्य बघायला ...गर्दी झाली ...मोर निघुन गेला ... आम्ही महाराजाना जाण्याची परवानगी मागितली .... एकादशी आहे ..आज परिक्रमा करायची नसते ..महाराज . .... जातो म्हणून त्यांची क्षमा मागितली व नर्मदेहर करून मार्गस्थ झालो 9:30 का कुणास ठाऊक पण आज ... काहीच मिळणार नाही असे वाटले . मी आज लिंबू पाणी वरच राहणार असे नानांना सांगितले ...गावाबाहेर निघताना नानांच्यासाठी गूळ शेंगादाने व माझ्या साठी दोन लिंबू व साखर घेतले ...आजचा रस्ता शेतातूनच होता . कमंडलू मधे लिंबू पिळून साखर टाकून दीली व पुढे ... दोन तीन ठिकाणी बसुन साधारण 5:30 ला जगदीश मढी या प्रसिद्ध ठिकाणी पोचलो ... जगदीशबापुंचे दर्शन घेतले .. ख़ाली घाट उतरून मैया कडे गेलो ... मैयाची आरती व पुजन केलं ... इथे पण मगर मैयाच दर्शन झाले ...अंधार पडु लागला तसे वर आश्रमात आलो , मंदिरात रामधुन चालू होती , नमस्कार करून परिक्रमावासीयानसाठी असलेल्या हॉल मधे आलो .. 30-40 जण होते , बरेच जण आधी भेटलेले होते . मी फक्त गांव वीचारायचो ... नांव कधीच कोणास विचारलं नाही . बोलत बसलो खुप नवीन अनुभव ऐकायला मिळाले . काही वेळात जेवणाची घंटी ... मी लीम्बु पाण्यावर होतो , जगदीश बापुंना सांगितले ... एकादशी कल है .. उठो ...भोजन पा लौ ... आदेश उठून जेवायला गेलो . जेवणानंतर परत गप्पा डोन्बिवलिचे तिघं व एक सांगलीचे महाराज होते .. त्यांचे अनुभव सांगत होते , त्यांना खुपच त्रास झाला होता , जखमा होत्या ... प्रसादने बरेच औषध दिलेले होते ... जखमेच्या गोळ्या त्यांना देवुन टाकल्या बॅन्डेज बांधून दिले .... व विश्रांती.
नर्मदेहर ( 37 )
अंधारात उठून प्रातर्विधी , मैय्यामधे स्नान ... आरतीपुजन .... आज मुक्कामी अंकलेश्वर येथे जाण्याचे ठरले ...... आज एकादशी ..या आश्रमात ..फराळ साबूदाणा खिचडी , घडेल तो कार्यक्रम . आपण काहीच नाही करू शकत ... फराळ झाला बाबाजिंनी 50रु. प्रत्येकी दक्षिणा दीली . ती घेऊन नर्मदेहर केलं . ... सकाळचे 8:30 वाजले होते . कच्चे रस्ते पार करत 10-11 km गुमानदेव येथे आलो येथुन अंकलेश्वर साठी सरळ हायवे होता , सरळ हायवेने निघालो .. उन , डांबरीरस्ता , समुद्री हवामान , प्रचंड घाम ..त्रास होत होता रस्त्यांचे कडेला एका झुडुपाखाली थोडी जागा होती तेथे बसलो ... मला झोप लागली ... केंव्हातरी नानांनी मला हलवल ... मी पुढे चालतो अस म्हणाले .. मी ग्लानीतच होतो .... त्यांना हो म्हणालो .... नाना पुढे निघुन गेले ... एखाद तासाने मी उठलो ... कमंडलूतील पाणी गरम होते तेच थोडे पिऊन ... पुढे ...बराच वेळ चालत होतो तुरळक गाड्या ... बहुतेक तेल वाहू टैन्करच ओसाड भाग व तेलकंपन्यांच साम्राज्य ... खुप वेळ चालत होतो ... रस्त्यात एका मंदिरात पाणी पिऊन बरोबर भरून घेतले ... नंतर सूर्यास्त होई पर्यंत चालत होतो , नानांचा फ़ोन आला ..कुठे आहात ... मी गावाचे नांव सांगितले ... नाना दुसर्याच रस्त्याने निघाले होते ..त्यांनी हायवे सोडला होता . ते झरकुंड नावाच्या गावात अंकलेश्वरच्या अलीकडे 4-5 km होते व मी ..डढाल नावाच्या गांवात .... ते जाम वैतागून बोलत होते . पण मी काय करू शकत होतो ... ?
उद्या अंकलेश्वर मधे भेटू अस सांगितले . डढाल गावात हनुमान मंदिरात आलो , वडाचे पारावर आसन लावलं , आणखी 4-5 जण होते विचारपूस झाली . हातपाय धुवून आरती पुजन केलं .. बाबाजीनी ठिक्कर व भाजी , हिरव्या मिरचीचा ठेचा बनवला होता वर मोठा गुळाचा खड़ा दीला . जेवण करून फ़ोन वर पुढील माहीती घेतली ... समुद्रापासून दोन दिवसाचे टप्प्यावर होतो. अजून गर्दी भरपूर आहे आलात तरी चालेल .... ग्रुपवरील गणेशजी पुराणीक यांचा निरोप मिळाला ... थोड्या गप्पा मारून पारावर आडवा झालो.... केंव्हा तरी झोप लागून गेली ....
नर्मदेहर ( 38 )
सकाळी लवकरच उठलो स्नान आरती पुजन आटोपून नर्मदेहर केलं बाहेर रस्त्यावर अजुन दुकाने उघडली नव्हती त्यामुळे चहा नाही , तसाच निघालो 8:00 चे सुमारास एका टपरीवर चहा घेतला ... भीसेनानांचा फ़ोन ... कुठपर्यंत...? त्यांच्याशी बोलुन पुढे चालु लागलो 9:30 चे आसपास अंकलेश्वर मधे रामकुन्डवर क्षिप्रागणेश मंदीर .. नाना येवुन पोचले होते परिक्रमावासीन्ची भरपुर गर्दी होती 70-75 नक्कीच .... अस्वच्छता व त्यातच समुदाचा गंध , दर्शन घेतले , मंदीर धुण्याचे काम चालु होते बराच वेळ वाट बघीतल्यावर जेवणाची घंटी ... वरणभात भोजन करून लगेचच पुढे रवाना ... साधारण 5:00 ला बलबलाकुंड येथे पोचलो ... मंदिराच्या समोर एका शेड मधे 20-22 जणांनी आसन लावलं होत . मी मंदिराच्या ओट्यावर आसन लावलं .. एक मराठी महाराज आम्हास बलबला कुंड बघुन येवू ... जवळच आहे अस म्हणाले .. मंदिरापासुन जवळच होते ... बलबला कुंड ..एक बराच मोठा हौदच आत पाण्यात तीन चार ठिकाणी ... बुडबुडे येत होते ... दर्शन घेतले , परत मंदिरात आलो , बहुतेक जण थकलेली व म्हातारी मंडळी जास्तच होते . समुद्र पार करण्याचे ,कुतुहल , भीती , उत्सुकता बोलण्यातून जानवत होतं .. जबलपुरचे काकां काकू नव्हते पण त्यांचेग्रुप मधील ईतर चौघं होते ... सर्वांशी थोडे बोलुन पुजन आरती आटोपली ... खिचडी प्रसादी भोजन करून निद्राधीन ....
नर्मदेहर.( 39 )
प्रातःकाली उठून सर्व आटोपल्यानंतर चहा घेवुन नर्मदेहर केलं ...आज बलबला कुंड ते हनुमान टेकडी 15 km चे अंतर सकाळी थोडे उशीरा 8-00 ला निघालो आम्ही दोघांनी दोन बिस्किटपुडे खाऊन नाश्ता केला , अंतर कमी असल्यामुळे थोडे बिनधास्तच .... सर्वत्र रिकामी शेती, खारे पाणी,साधारण 11-00 चे सुमारास एकास हनुमानटेकडीच अंतर विचारले ....बस ..दो की.मी. है जी! .पुढे चालु लागलो ..साधारण 2-3 तास चालत होतो ....चार पाच जणांना अंतर विचारले ....बस ...दो की.मी है ...जी . ठरलेलं उत्तर मिळाल ....4-00 च्या सुमारास एक तरुण मो.सा. उभी करून उभा होता त्याला विचारलं ......बस ...अध्दा कीमी. है जी अस म्हणुन तो मोबाईल मधे शिरला ... पुढं चालु लागलो तब्बल ...अडीच तास चालल्या नंतर .....हनुमानटेकडी आली .......अंतर चाललो 24 किमी .....फसव अंतर .. हनुमान टेकडी ..आश्रमात पोचलो जवळपास 60-70 जण आधीच पोचले होते .. पाण्याच दुर्भिक्षच होतं .. आश्रमाचे नियम फारच कडक... आश्रमात सर्वत्र खड़ी टाकलेली ... लघुशंका , डोलडाल साठी रस्त्यापलीकडील झुडुपांच्या मागे जाणे , हातपाय धुण्यास विरुध्द बाजूला तलावावर जाणे , थंडीचा खडिवरुन चालणे ...तेथील साधु ... अगर कोई बीच्मे लघुशंका करते दिखाई दिया .... तो मै गुलेरी से ...मारता .कही भी लगो परवाह नही... हातपाय धुवून आलो आरती पुजन खिचडी प्रासाद भोजन आटोपून ...शांत झोपलो ...
नर्मदेहर ( 40 )
सकाळीच उठुन प्रातर्विधी आटोपल्यानंतर 7:00 ला नर्मदेहर करून मार्गस्थ झालो , रस्ता पूर्ण सुनसान होता अधूनमधून एखादा तेल टेन्कर भरधाव वेगात निघुन जायचा तेवढाच शांतता भंग .. आम्ही दोघंच चालतोय रस्त्याने 11:00 चे सुमारास एक हॉटेल ... शेड .. थांबलो , बाजूने मोठा पाट वहात होता थोड्या पायऱ्या होत्या , चहा घेतला व आंघोळ उरकून घेतली व पुढे मार्गस्थ झालो . दोन तीन km गेल्यानंतर विमलेश्वर मंदिर दिसू लागले .. गर्दी बरीच होती , शेड गच्च भरलेले होते . महादेवमंदिर व नर्मदा मंदीर समोर सुध्दा जागा नव्हतीच . ओट्याचे बाजुस उन्हातच आसन लावलं ... खुप ओळखीचे चेहरे दिसत होते बऱ्याच जनांशी बोललो, प्रवास कसा झाला याची चौकशी झाली ..... 40 जणांचा ग्रुप करावा लागतो म्हणजे एक होडी चे प्रवासी , आम्ही एका ग्रुप मधे नांव दिले व ....... वाट पहाणं येवढच आपल्या हातात ..दुपारी जेवणाची पंगत झाली वरण भात ... मी जेवण घेतले नाही . बिस्किटपुडा ... चार वाजता समुद्राकडे चक्कर टाकुन आलो , दोनkm अंतर होतं .... कीती वेळ थांबावे लागेल काहीच अंदाज नव्हता , बाजूलाच छोट्या टपरीवर चहा घेतला.... जवळपास 300-400 लोक थांबलेहोते त्यांचे धावपळ , उगीचच गोंधळ बघत बसलो , काही वेळानं MP चे काही परिक्रमावासी आले ओळखीचेच होते , डोंगर उतरतांना बरोबर होतो , बराच वेळ बोलत होतो त्यांनी स्वयंपाक साहित्य बरोबर आणले होते ... माझेही जेवण बनवले होते ... तीन ठिक्कर व भाजी माझ्यासाठी ठेवले , पाण्याची टाकी सारखी रिकामी होतं होती , दर तासाने मोटार चालु करावी लागत होती एकजण त्याच कामात होता , हातपाय धुवुन आरती पुजन आटोपल् काही वेळात पंगत बसली दालभात ... मी ठिक्कर व भाजी जेवण ऊरकले , रात्री खुप वेळ भजनाचा कार्यक्रम सुरु होता महिला भजनी मंडळ खुपछान भजन सादर करीत होते . मंदिराच्या समोर वाळूत पथारी टाकली होती , जवळपास70-80 लोक आरामात पहुडलेली होती . शेडपेक्षा बाहेर छान होतं केंव्हा तरी छान झोप लागली ...
नर्मदेहर ( 41 )
सकाळी सहा लाउठुन बसलो ... प्रचंड गर्दी ..पाण्याच्या टाकी भोवती ..रात्री परत परिक्रमा वासीन्ची गर्दी वाढली होती ..... बसुन राहीलो बराच वेळानंतर प्रवेश मिळाला ..बाहेर टपरीवर चहा घेतला ..परत गप्पा मारत बसून राहीलो .9-00 च्या दरम्यान उठलो .. नाना व मी गावात गेलो वीमलेश्वर गावाची पाण्याची विहिरीवर स्नान आटोपल्यानंतर परत एका घरातुन चहा मिळाला ... पुढे आल्यावर एकास सहज जेवण बनवून द्याल काय ? विचारले होय म्हणाला 12- 12:30 ला या ... तोपर्यंत परत
ओळखीचे सगळे एकत्र बसले प्रत्येकाला आलेले वेग वेगळे अनुभव ऐकत बसलो ... त्या शिवाय काहीच नव्हत अजुन आमची होडीचे बुकींग नव्हते सर्व अनिश्चितच होते .. दुपारी वरणभाताची पंगत जेवायला बसली होती ... आम्ही गावात गेलो आमचे भोजन तयार होतं भाजी पोळी चटणीच जेवण छान होतं ... नानांनी पैसे दीले ... परत मंदिराच्या समोर ... सर्वच बेचैन होते होड्या आज निघणार का .. आपला नंबर लागणार काय , .. चालु वर्षी होड्यांचे कंत्राट त्या ग्रामपंचायतने घेतले होते व मिळणारे उत्पन्न गावाचे विकासात लावणार .... पण यात्राकंपनी वाल्यांनी त्यांना .... व्यवस्थीत शिकवले असाव .. यात्राकं. वाल्यांना VIP ट्रिटमेंट होती ...त्यावरून बरच काही लक्षात येत होतं ...3:30 चे सुमारास बूकींग झाले 4 होड्या पायी परिक्रमा वाले व 3 होड्या बस परिक्रमावाले ... प्रत्येक होडीतून 40 जण एकूण 7 होड्यातुन 280 लोक जाणार . ... अहो पण आज सोमवती अमावस्या आहे ... कोणीतरी मराठी बांधव बोललाच .... ओ... तुम्ही आज अमावश्येच ईथेच थांबा , आणी आम्हाला अपशकुन नका करू . आम्ही आपल काय ? सगळा गोंधळच .. अखेर आमचाही नंबर लागला होता ..... सर्व होड्या रात्री 2:30 ला नीघतील असे सांगून तो ग्रहस्थ ...अंतर्धान पावला , आम्ही परत गप्पात शिरलो .... सुर्यास्तास आरती पुजन आटोपून बॅग पॅक करून ठेवली .. समुद्र पुजनचे साहित्य वर शबनम मधे ठेवले . रात्री परत वरणभात मी जेवण घेतलेच नाही परत बिस्किटपुडा ... गोंधळ खुप होता , आमची परत गप्पाची मैफल जमली होती . 9:30 ला भजन सुरू झाले त्यामुळे झोपणे अशक्यच होतं .. 11:30 -12:00 ला चलो निकलते है ..सुरू झाल .. आम्ही रात्री एकला निघालो ..सर्वत्र अंधार दोन तीन छोटा टोर्च व मोबाईल बॅटरी हाच उजेड .. समुद्रावर बसुन होतो अडीच नंतर धावपळ सुरू ...भरती येत होती ... 40 चा ग्रुप शक्यतो एकत्र रहायचा प्रयत्न करत होता .... धावपळ MP चे एक परिक्रमावासी होडीकडे जातांना छातीइतक्या गाळात गेला त्यांची पत्नी मोठमोठ्याने रडत मदत मागत होती ... आम्ही आमच्या होडीतून पहात होतो ,अखेर दोन तीन होडीवाल्यांनी ओढुन काढला व तसाच एका होडीत कोन्बला ... सर्व होड्या निघाल्या समुद्र शांत नव्हताच होडी हेलकावे खात होती ... जसजशी होडी हेलकावे खाई तसा सित्ताराम सित्ताराम जयघोष वाढे व होडी स्थिर झाली की अवांतर गप्पा सुरू ... थोडे हलले तरी होडी हेलकावे खाई .. जीव मुठीत कसा धरतात ते समजलं ... सर्वत्र अंधार ... ईतर होड्या अंधारात दिसत नव्हत्या ... 3 तासानन्तर पलीकडे लाईटचे दर्शन झाले बहुतेक मंडळी ओरडुन थकल्यामुळे व भिजल्यामुळे शांत होते .. किनाऱ्यावर पोहचायची वाट पहात होतो .
नर्मदेहर ( 42 )
पलीकडे तीरावर लाईट दिसत होते होडीवाल्यांकडे समुद्र पूजनाचे साहित्य व नारळ दिले पुढे पोहचायला एक तास लागला ... पाण्यात 50 -55 फुट आत होडी थांबली . उतरण्याची घाई , गुड्घ्याचे वर पाणी ,चिखल , सर्वाचे पाय अवघडुन गेलेले चार तास एक आसनी बसुन जाम झालेले ... दोघं तीघे उतरतांना पाण्यात पडुन सामानासहित भिजले . काही गाळातून चालताना घसरून पडले ..... पूर्वेला सूर्योदय होत होता सर्वांचे चेहरे आनंदीत होते ... सर्वांचा एक अवघड टप्पा नीर्वीघ्न पार पडला होता ...मी होडीतून सर्वात शेवटी उतरलो शांततेत चिखल तुडवीत निघालो .. मिठीतलाई भरगच्च भरली होती ...आश्रमाचे महाराज व्यस्त होते 7-8 यात्राकंपनीच्या गाड्या थांबलेल्या असल्या मुळे .... पायी परिक्रमा वासीयांकडे लक्ष देण्यास त्यांना फुरसत नव्हतीच . वेळ घालवत थांबलो नाही , बाहेर येवुन परिक्रमा मार्ग चौकशी केली व पुढील रस्त्यास लागलो. जागेश्वर महादेव मंदिर येथे थांबलो . प्रातर्विधी स्नान, आरतीपुजन आटोपून पुढे चालु लागलो . हरीका धाम आश्रमाचे आधी एक छोटस घर होतं तेथे थांबवले प्रत्येकी एक मग भरून सातुचे पीठ व साखर मिळाली ती घेतली थोडे पुढे जाऊन रस्त्यातच थांबुन त्यात थोडे पाणी मिसळून सातुचेपीठ संपवून टाकले .... अतीशय स्वादिष्ट व पौष्टिक .. त्रुप्त होऊन पुढं ... उजव्या हाताला समुद्र व वेड्या बाभळीच् जंगल त्यातून डांबरी रोड व तेल कंपनीचे तेल डेपो रटाळ रस्ता तुडवून थकलो होतो ...बसावं म्हटले तर बसायला जागा नाही ...रस्त्यांवर शुकशुकाट उन प्रखर , समुद्र जवळच त्यामुळे ऊन्हाचि तीव्रता जास्तच .... दिवसभर चालतच होतो सायंकाळी सिंगनाथ महादेव ...सुवागांव येथे थांबलो ... मागील 48 तासापासून झोप नव्हतीच त्यामुळे ... एकंदरीत ठीकच होतं ... आश्रमात मुबलक पाणी होतं सगळेच कपड़े धुवुन टाकले आरती पुजन झाले कढी भात भोजन प्रसादी आटोपून सर्वांना फ़ोन केले .... व अक्षरशः .. .... झोपी गेलो .
नर्मदेहर ( 43 )
प्रातकाली उठुन प्रातर्विधी आरतीपुजन , चहा आटोपून 7:00 ला नर्मदेहर करून मार्गस्थ झालो 10:00 चे सुमारास कलादरा गांवी पोचलो कपालेश्वराचे दर्शन घेतले सदावर्त देत होते ... पण चालन्याची वेळ होती , दोन तास स्वयंपाक करण्यास व नंतर ऊन तापल्यावर चालण्यास त्रास याचा विचार करून .... समोर दुकानातून बिस्किटपुडे व खारीचा पुडा विकत घेतला पुढं ... बराच वेळ सड़क तुडवल्या नंतर रस्त्यास कडेला छोटस दोन माणसं बसुन प्रवेश करतील व आत छोटासा फोटो वीरदेव महाराज यांचा आत दर्शन घेऊन बिस्कीट व खारी संपवले , मंदिराचे पाठीमागे कीरळ हे काटेरी झाड व त्याला लाल लाल फळं लागलेली ... त्यांचाही मनसोक्त समाचार घेतला , भीसेनानांसाठी हे नवीनच होतं ... पुढे निघालो बराचवेळ .... केसरोल गावात चहा ..चौकशी करता भारभुतेश्वर महादेव मंदिराची माहीती मिळाली .....सुंदर ठिकाण , पुरातन इतिहास , प्रशस्त मंदिर बाजूला घाट , मैय्या , प्रशस्त विस्तार समुद्राचा भागच ... संपुर्ण गांव कोळी समाज , मासेमारी हाच व्यवसाय , मंदीरव्यवस्थापन , परिक्रमावासीयान्चे साठी हॉल , भोजन व्यवस्था सर्व ..देखण होतं सायंपुजन आरती आटोपून भोजन झाले व नंतर नीद्राधीन झालो ...
नर्मदेहर ( 44 )
प्रातःकाली अंधारात उठलो , थंडी छान होती प्रातर्विधी स्नानपुजन आटोपून श्रीभारभुतेश्वराचे दर्शन घेतले व पुढे मार्गस्थ झालो .टिम्बी , कूकरवाडा हे गावं ओलान्डत पुढे ... वेरवाडा गांवात चहा घेतला थोडे बसुन विश्रांती .. परत पुढे .. दूपारी त्रिगुणातीत ध्यान आश्रम येथे भोजन झाले ... परत पुढे चालु लागलो .. .. भरूच .. जिल्ह्याचे ठिकाण मोठ शहर मला चप्पल दुरुस्त करून घ्यायची होती , भीसे नानांना ATM ला जायचे होते ...मुख्य रस्त्यापासुन दोघंही दोन बाजूंना गेलो व ..... चुकामुक् झालीच .. चालत राहीलो .. भरूच शहर संपले ..भेट झाली नाही ... झाडेश्वर येथे मुक्कामी जाण्याचा विचार करून चौकशी करत होतो ... झाडेश्वरला सोय नाही अस समजले ... नानांचा फ़ोन आला कुठे आहात , सांगितले ... पुढे चालतोय असही सांगितले ... ते मागेच कुठेतरी होते .. कुठे ते सांगता येत नव्हते ... मी झाडेश्वर हून पुढे जातोय अस सांगितले ..अंधार पडत होता पुढे मुक्कामव्यवस्था कुठे होईल काहीच अंदाज नव्हता .. मागे जाता येत नव्हतं ... फ़ोन वर फ़ोन चालु होते .. कुठे आहेत नेमके ठिकाण त्यांना सांगता येत नव्हते ... ते मागे की पुढे ..हे समजत नव्हतं ..थांबून कस रहाणार ? चौकशी केली नीलकंठ महादेव येथे जाण्यास निघालो .. नानांचा परत फ़ोन ... आता चिडून बोलत होते , मी नीलकंठला पौचतौय अस सांगितले ... तर चांगलेच चिडले .... तुम्हाला बरोबर ठेवायचे तर ठेवा ... माझ मी बघुन घेईल , मी शांतच राहीलो . पुढे चालत राहीलो . बराच वेळानंतर नीलकंठ महादेव येथे पोचलो . मनातून मी ही चिडलोच होतो त्यामुळे हातपाय धुवुन आरती पुजन आटोपून घेतले ... नीलकंठ प्रशस्त परिसर , मोठ संस्थान भरपूर साधन सामुग्री .... पण 100 % व्यवसायिक , परिक्रमा वासीयांस तीन चार मोठ मोठे हॉल , प्रवास्यांसाठी स्वतंत्र रूम भरपूर होत्या . परंतु पायी परिक्रमावासी उपेक्षितच ... सर्व लक्ष उत्पन्नावर होते ... 60 ते70 जण एकाच हॉल मधे कोम्बलेले होते .. मी बाहेरच झोपायच ठरवले ... झाड़ाख़ाली आसन लावलं होतं ... बराच वेळाने नाना आले , माझ्याजवळच आसन लावलं ... मी काही झालय अस दाखवल नाही ... एक खुल्ताबाद भद्रामारोती येथील शैक्षणिक सहल मुलांची बस . आयोजक ओळखीचा निघाला .. त्यांनी जेवणासाठी घेवुन गेले आम्ही दोघे जेवण करून त्यांचेशी बोलत होतो एकजण क्यारीबैगमधे 5-6 पोळ्या , ठेचा गुंडाळून घेवुन आला .... उद्याची सोय झाली .. नंतर झाड़ाखाली झोपलो ...
नर्मदेहर ( 45 )
सकाळी सर्व आटोपून , नीलकंठेश्वराचे दर्शन करून ..नर्मदेहर केलं 7:30 ला निघालो 9-10 km गेल्यानंतर शुक्लतीर्थ (शुक्लेश्वर) येथे थोडे थांबुन श्रीराम प्रभुंचे दर्शन घेतले . पुढे निघालो ..लहाना भाऊ संजयचा फ़ोन ... एकमेकांच्या चौकश्या , ख्याली खुशाली समजली. दत्तमढी ओलांडून एका झाड़ाख़ाली बसुन काल रात्री सहल वाल्यांनी दिलेल्या पोळ्या व ठेचा काढला , जवळ प्रसादने दिलेली चटणी होतीच , छान जेवण करून लगेच पुढे निघालो . नीकोरा गावं ओलांडल ...पुढे अंगारेश्वर गावं ... मंगलनाथ महादेव असा बोर्ड वाचुन ...निघालो तिकडं , प्रचंड मोठ पिंपळाचं झाड .. सुबक घरासारखाच मंदीर दर्शन घेऊन थंडगार पाणी पिऊन .. पुजारीजिंना स्थान महात्म्य विचारले ... ... " अंगारक ऋषींना मंगळ ग्रहाचा त्रास झाला , म्हणुन त्यांनी या ठिकाणी शंकराची तपश्चर्या करून मंगळ दोष निवारण करून घेतला ... पुढे चालु लागलो ... धर्मशाला पुरातन इतिहास असलेले ठिकाण .. धर्मेश्वर महादेव दर्शन घेतले ...चालत रहाणे .. परिक्रमा सुरुवात होऊन दीड महीना झाला होता ... मैयाचे कडेवर आम्ही अवखळ पणे बागडत होतो . मैया तटावरील वातावरण व जनजीवन ओळखीचे झाले होते , दररोज नवं ठिकाण व नवीन माणसं , आसक्ती नष्ट होतीय ....पण मन शांत नव्हत .. काय हवं ते अजुन निश्चीत कळत नव्हत , मैयाकडे मी का आकर्षला गेलो , परिक्रमा करण्याचा निश्चय करतांना जे ठरवले होते त्याच काय .... मला सगळे अनुभव एकट्याने घ्यायचे होते . 7 - 8 महिन्यापुर्वी मला मैया बाबत काहीच माहीती नाही , कधीच बघितलंही नव्हते ... आणी अस घडुन आले की मी परिक्रमा करतोय .... ... निर्णय झाला होता , मैया सोबत रहायचा .. . मी स्वतःला मैयाच लाडकं लेकरु म्हणवून घेतोय ... मग मैया व माझ्या मधे कुणीही नकोय ... पुढे एकट्याने रहायचे निर्णय झाला होता ... नानांना कस सांगायच ? ... सालस माणूस .. बघु .. जसजसा विचार करत होतो तसतसे मन हल्के होत गेले ... मला काय हवं ... तो उपाय सापडला होता ... एका गावात चहा मिळाला ... पुढे बराच वेळ चालत होतो ..सड़क , काटेकुट्यातून , वाळू , ओढ़े ..पार करत सीयाराम आश्रम झणेर इथं पोचलो ... विश्वानंद सरस्वती स्वामीन्चा ( बंगलोरवाले स्वामी) फ़ोन आला ते गरुडेश्वर ला होते , त्यांची तब्येत ठीक नव्हती ... येई पर्यंत थांबा , विश्रांती होईल ...ते फक्त हसले .. .. हातपाय धुवुन सायंपुजन आरती आटोपून परिक्रमा वासिंसोबत थोड्या गप्पा .. भोजनप्रसादी .... व ...विश्रांती ..
नर्मदेहर ( 46 )
प्रातःकाली उठुन आश्रमाचे बाहेर जाऊन शेकोटी पेटवली व हातपाय गरम करून घेतले ... प्रातर्विधी , आरती पुजन आटोपून 7:30 ला नर्मदेहर करून पुढे मार्गस्थ झालो .. वराहभगवान मंदिरात दर्शन ... सोमज गावं ओलांडून पुढे .. ओझ नावाचे गावं .. उंचावर रामेश्वर महादेव मन्दिर ..या ठिकानास ..अवधपुरी , प्राचीन अयोध्या .. असेही नांव आहे ...मुद्दाम थांबुन गावात चौकशी केली ... पण व्यवस्थीत माहीती कुणालाच नव्हती ... प्रत्येक अधिकजेष्ठ महिन्यात ( 12 वर्षांनी ) येथे मोठी यात्रा असते( आता अधिक जेष्ठ चालु आहे ) तेंव्हा नर्मदा मैया मधुन देवांच्या मूर्ती सापडतात असेही सांगितले .... एका आश्रमात चहा घेतला ... जेवणासाठी उशीर होता त्यामुळे पुढे निघालो ... दिवसभर काहीच मिळाले नाही ...चालतच होतो .... चालन्याचही आता काहीच वाटत नाही .कितीही चाललो तरी काहीच वेगळं वाटत नाही . श्री रंग अवधूत महाराज म्हणत .... ज्याचे मन निर्मळ आहे , त्याला तीर्थाटन करण्याची आवश्यकता नाही ... आणी तीर्थाटन करून ही मनाचा मळ टळत नाही . अशा तीर्थयात्रेत काहीच अर्थ नाही ... अनेक उलट सुलट विचार मनात चालत होते ...आज रंग अवधूत स्वामीन्चे दर्शनाचा योग आला आहे ... दत्त बावनीचे रचीयेता ,ज्या स्थळी दत्त बावनी त्यांना स्फुरली ते स्थान ... 4:30 - 5:00 चे सुमारास आम्ही पोचलो ..नारेश्वर ...श्री रंगअवधूत स्वामीन्चे दर्शन घेतले ... पुस्तकालयात काही वेळ घालवला ... आरतीपुजन , भोजन आटोपून रात्री भजनी मंडळी सोबत हॉल मधे भजनाचा आनंद घेतला 12:30 नंतर ...विश्रांती ...
नर्मदेहर ( 47 )
प्रातःकाली अंधारात उठुन प्रातर्विधी , मैय्यावर जाऊन स्नान आरती पुजन आटोपून पुढे मार्गस्थ झालो . मैयाचे काठावरुन चालत होतो , थंड बोचरे वारे वहात होते , नाना व मी दोघे तोल सांभाळून चाललो होतो मोठे खडक ,डगरी चढत उतरत एकएक गावं मागे टाकत प्रवास चालु होता . प्रत्येक द्रूश्य नजरेत साठवून घ्यायचे . मनात .. नर्मदेहर .. नर्मदेहर .. पाऊलवाट सुरू झाली होती चढ़उतार ,काटेरी झुडपे लगट करत होते .. एका झाड़ाख़ाली बसलो , आज नानांना पाण्यात बुडवून बिस्किट खायचा सल्ला दिला , व तो प्रकार त्यांना खुपच आवडला , परिक्रमेत बिस्किट खाऊन खुप वैतागून गेले होते , पण पाण्यात बुडवून खुप छान लागते असे पुन्हा पुन्हा म्हणत होते . पुढे निघालो .. आता दगड गोटे , वाळवंट तुडवत होतो ..उन वाढत होते आश्रम ,गावं काहीच दिसत नव्हते . दमछाक झाली होती एका शेताजवळ झोपडी... नर्मदेहर .. आवाज दिला , आजीबाइ बाहेर आल्या .. चाय मिलेगी ... ? बगैर दुध वाली चलेगी ..... नाहीतरी आम्हास दुधाचा चहा क्वचित मिळायचा ...चहा घेवुन परत पुढे ... दीड दोन तास चालल्या नंतर आश्रम ... पोळी भाजी जेवण आटोपून परत पुढे .. एरन्डी नदी ओलांडून पुढे थोडे थांबुन विश्रांती घेऊन निघालो ... दोन परिक्रमावासी भेटले त्यांचे सोबत बोलत पुढे ..MP मधील होते ,त्यांची तीसरी परिक्रमा होती सायंकाळ होता होता शिणोर येथे पोचलो ... थकून चूर झालो होतो .गावात प्रवेश करताच बाजारपेठ होती आधी एका टपरीवर सर्वांनी चहा घेतला चौकशी करून गणपती मंदिराकडे निघालो ... रीध्दी सीध्दी सहीत गणेशाच सुंदर व पुरातन मंदीर होते दर्शन घेऊन आसन लावलं .. महाराजांनी नारायणेश्वर महादेव दर्शन घेऊन या असे सांगितले ...दर्शन घेऊन आलो ... अतिशय सुंदर मंदीर बघितल्याच समाधान झाले . आरती पुजन आटोपून गप्पा मारत बसलो , स्वामींनी गावात जेवणाची सोय केली होती .. ते डबे घेऊन आले ,जेवणं आटोपून शांत झोपी गेलो.
नर्मदेहर ( 48 )
प्रातःकाली उठुन स्वामीजीन्चा निरोप घेवुन घाट उतरून मैया कडे , स्नान आरती पुजन आटोपून मैयाचे काठाने पुढे निघालो . मैयाचे काठावरुन चालणे नेहमीच आनंददायक , आपण किनाऱ्याने चालतोय उजव्या हाताने मैया ... डाव्या बाजूला उंचच उंच डगरी एखाद गावं आले की छोटा मोठा घाट , मंदीरे ,गावांत जाण्यास गाडीवाट , आपआपल्या कामास जाणारे शेतकरी ,मासेमार , स्नानास आलेले भाविक , उंच उंच वडाची पिंपळाची झाडे ..मोठं मोहक द्रूश्य ... कन्जेठा गावात चहा पिण्याचे मनात आले घाट चढून वर गेलो .. राधाकॄष्ण मंदिरात दर्शन घेतले , मंदिरात व्यवस्था नव्हती , रस्त्यात एकास हॉटेल आहे का असे विचारले .. हॉटेल नव्हतेच ... चलो हमारे घर ...बहुदा शेतावर निघालेले होते . आमच्यासाठी चहाची व्यवस्था करून अर्धा तास घालवून आमचा निरोप घेतला , आम्हीही आमच्या रस्त्यास लागलो .. अन्बीकेश्वराच दर्शन घेवुन पुढे ... वाळवंट तुडवत चालु लागलो , अनुसया मातेच मंदीर .. याच ठिकाणी अनुसयामातेस दत्तप्रभुंची प्राप्ती झाली मोठंप्रसिद्ध व पवित्र क्षेत्र दर्शन घेतले पुजारीजीन्नी अर्ध नारळ प्रसाद दिले ..भोजनतयारी चालु होती तोपर्यंत विश्राम ... छान मंदीर पांडवकालीन , मूळमंदीर दगडी आहे आता प्रचंड बांधकाम झाले परिक्रमा वासियांसाठी मोठा हॉल ... भोजन करून लगेचच निघालो बरकाल ,मोलेथा ओलांडून म्रुत्युंजय आश्रमात पोचलो ..चहा घेवुन पुढे. सायंकाळ होता होता बदरीकाआश्रम येथे पोचलो . प्रशस्त परिसरात मोठा आश्रम , घाट बांधलेला मैया वहातेय द्वादशजोतीर्लीन्गाचे सुंदर मंदीर होत , परिक्रमाहॉल वेगळाच होता व एका बाजूस होता ...आसन लावलं बाहेर हॅण्डपंपावर हातपाय धुवुन आरतीपुजन केलं ...40-45 परिक्रमावासी होते जबलपुरचे काका काकू होते , बरेचजण ओळखीचे होते , फक्त तोंडओळख .... ओळख वाढवून मायापाश गुंतागुंत जास्त वाढवायचीच नाही .. परीक्रमेत अडचणच होती ... गप्पा खुशाली , तब्येत इ. चौकशी झाली . खिचडीप्रसाद भोजन करून .....नीद्राधीन झालो.
नर्मदेहर ( 49 )
प्रातःकाली उठुन घाटावर जाऊन बसलो , आश्रमातील साधु घाटावर स्नानास आलेले होते , मला साधुंच्या नित्यकर्म बाबत अतिशय आकर्षण आहे . जनसमुहाचा त्यांना कंटाळा , त्यामुळे ते परिक्रमावासियांचा राग करतात . त्यांच्या मते संसारी मनुष्य परिक्रमा नियम बाबत ढिलाई करतात , त्यातल्या त्यात महाराष्ट्रीयन लोकांनी परिक्रमा महत्वच कमी करून टाकले , महाराष्ट्रीयन ...मैयाला जाणुन न घेता फक्त पळत सुटतात ... थोड्या फार प्रमाणात हे खर आहेच ... साधून्चे स्नान आटोपले आणी आम्ही स्नान केलं .प्रचंड थंडीत मैयाचे पाणी गरम होतं .. सूर्योदय होत होता तीथेच बसुन आरती पूजा केली घाट चढुन वर आलो चहा तयारच होता , दोन वेळा घेतला ... नर्मदेहर करून मार्गस्थ झालो . मैयाचे काठावरुन जात होतो उंच डगरी चढ़ उतार पार करत , दमछाक झाली होती एक नदी ओलांडून जावे लागले ...जरा अवघडच होते ..मैयाने सुखरूप पलीकडे पोचवल. 12:30 -1:00 ला कुबेर भन्डारी येथे पोचलो .. मोठे संस्थान कार्यालय वर दुसऱ्या मजल्यावर ...वर जाऊन कार्यालयातच सॅक कमंडलू काठी ठेवली गर्दी खुपचहोती ( महाराष्ट्रीय जास्तच होते) दर्शन घेतले . भोजन प्रसाद घेवुन वर आलो ... वर संस्थानच्या एका कर्मचाऱ्याने घुबड पकडले होते ... पहिल्यांदाच इतक्या जवळून घुबड बघितलं ... नर्मदेहर करून मार्गस्थ झालो ... मैया किनारे बराच वेळ चालत होतो . एका आश्रमात चहा झाला , एका झाड़ा खाली बसुन ... परत चालु लागलो सायंकाळ होत होती .. तिलकवाडा आले हुश्श करून श्वास सोडला ...पण 4 km आणखी पुढे जावे लागले ..मणीनागेश्वर ... प्रसिध्द क्षेत्र ..छान आश्रम आसन लावलं हातपाय धुवुन आरतीपूजा आटोपली ... आणखी 4-5 जण होते स्वयंपाक करायचा होता .... एका MP वासीयाने पोळ्या व मी भाजी बनवली ...सर्वजण भोजनं आटोपून थक्ल्यामुळे लगेचच झोपलो.
नर्मदेहर ( 50 )
अतीशय सुंदर सकाळ , थोडे उशीरा आवरायचं ठरवलं रमत गमतच ...घरून निघाल्या पासुन पहिल्यांदा आंघोळीसाठी गरमपाणी ..वाट्टेल तितके घ्या आज अर्धातास आंघोळीस लागला यथेच्छ साबण वापरला . आरती पुजन आटोपून मणी नागेश्वर दर्शन घेतले .. आश्रमाचे स्वामीजी बाहेरगांवी गेले होते ते 8:30 ला आले त्यांचे दर्शन घेतले बालभोग घेतला , त्यांनी मणी नागेश्वराची कथा सांगीतली ... कश्यप ऋषींच्या .. दोन पत्नी..वीनीता व कदु यांच्यामधे सूर्यदेवाचा घोड़ा ..ऊच्चैस्रवा ..याचा रंग काळा की पांढरा याबाबत पैज बद्दल ची ती स्कंद पुराणातील कथा ऐकुन नर्मदेहर करून पुढे निघालो , आज एक डगर उतरतांना भीसे नाना पड़ता पड़ता वाचले ...वासणा गावात चहा घेऊन थोडा वेळ थांबुन पुढे ..वाळवंट तुडवत पुढे .... सान्जरोली गावांत हनुमान मंदिरात थांबलो .. तेथील साधुंबरोबर बोलत बसलो ते जरा नाराजच होते, नाराजीचे कारण .... महाराष्ट्रीयन परिक्रमावासी इथे न थांबता पुढे गरुडेश्वरला निघुन जातात . त्यांचेबरोबर बऱ्याच गप्पा मारून नाराजी दुर केली ... त्यांनी चहा केला तो घेवुन पुढे ... साधु संत आपापले परीने परिक्रमावासियान्ची सेवा करण्यात आनंद मानतात . बराच वेळ चालल्यानंतर गरुडेश्वर येथे पोचलो .. वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांची तपोभूमी ...गेल्याबरोबर दर्शन घेतले , टेंबे स्वामींचा जीवनपट फोटो रूपी बघत बसलो ...... काही वेळानं उठुन वर आलो हॉलमधे बरेच परिक्रमावासी होते त्यांचे बरोबर बोलत बसलो सुर्यास्तास आरती पूजन केलं , इथे मैयावर धरण होत आहे .... मैयाच पाणी एका बाजूने काढले गेले ...वाळू तस्कर इकडेही सक्रीय असल्याचे जाणवते . रात्री खिचडी प्रसाद भोजन करून विश्रांती घेतली ..
नर्मदेहर ( 51 )
प्रातःकाली उठुन मैया वर स्नान आरती पुजन करून वर मंदिरात आलो .वासुदेवानंद सरस्वतीन्च्या(टेंबेस्वामी) समाधीवर डोकं टेकवुन दर्शन घेतले . काही वेळ शांत बसुन होतो . दत्त प्रभुंचे दर्शन झाले , भारावून गेलो होतो बराच वेळ मंतरलेल्या अवस्थेत होतो ... आम्ही दत्ताचे नौकर । त्याची खातसो भाकर ॥ कोण काय आम्हा देई । कपाळीचे काय नेई ॥ तुम्ही ऐका हो श्रीमंत । नका होऊं मदोन्मत्त ॥ धन जाईल जाईल । काळ जीवीत खाईल ॥ वाचे वदा दत्त दत्त । भावे सेवा साधु संत ॥ रंग प्राण येता कंठी । तोची तारीतील क्षिती ॥ श्रीरंग अवधुतांचे बोल आठवत होते ....तिथं बालभोग इडली व चटणी घेतला . चहा घेऊन बाहेर येवुन पिण्याचे पाणी भरून घेतले येथे संगमनेरकर साबळे नावाचे ग्रहस्थांची भेट झाली त्यांचेशी थोडे बोलणे , बळजबरीने चहा घेऊन पुढील मार्गी रवाना ... थंडी मुळे चालणे सुखकर होते . रस्ते सुनसान व झाडितुन होते आम्ही चालत होतो , यांत्रिकपणे पाय पडत होते ... माध्याह्नीची वेळ झाली होती आश्रम गावं दिसत नव्हतं ... आज भीसे नाना भुकेंन कासावीस झाले होते , माझ्या जवळ शेंगदाणे व गूळ होता एक बिस्किटपुडा होता त्यातच उरकून घेतले . रस्ता अवघड नव्हता पण सुनसान व भीतीदायक होता ... आम्ही दोघेच चालत होतो ... कुणीच भेटत नव्हत , सकाळी 8:30 ला निघालो होतो दुपारचे अडीच वाजुन गेले होते आम्ही सलग चालतोय ... एका झाडाखाली बसुन थोडी हवा खाल्ली व पाणी पिऊन परत आपल्या रस्त्यास लागलो .निबिड जंगल सुरू झाले होते कोणते गावं येईल ते ही माहीती नाही .. रस्त्यात बोरीचे झाडे दिसत होते चालता चालता मिळतील तेवढी बोरे घ्यायची खात खात पुढे जात होतो .. 5:00 चे सुमारास छोटसं गावं दिसल चौकशी करता जवळच छोटी अंबाजी हे मंदिर बाबत समजले ... दोन तीन km गेल्यानंतर मंदीर आत जाऊन नर्मदेहर केलं ... बाबाजी बाहेर डोकावुन गेले ... मंदिराचे प्रांगनात बसुन राहीलो ... अर्धातासांनी बाबाजी आले ... कितने मूर्ती हो ..? हम दो ही है ..उत्तर दिले ठीक है ..ऊपर आसन लगाओ ... सदावर्त मिलेगा ..बनाकर खाना पड़ेगा .. ठीक है .. आसन लावलं . हातपाय धुवुन आरती पुजन आटोपल . आणखी दोन परिक्रमा वासी आले होते ...त्यांनाही स्वयंपाक येत नव्हता .. . आपणच सेवा करू अस ठरवले .. कारण सर्वाना भुका लागल्या होत्या ... आत जावून चौघान्ना पुरेल येवढ गव्हाचे पीठ व भाजीस बटाटे घेतले व चुल पेटावी म्हणुन मनधरणी करत होतो .. आणखी तीन जण आले हे महाराष्ट्रीयन होते ... त्यानी बाहेर फुले विक्रेत्याकडे कोणी भोजन बनवुन देईल काय ...चौकशी केली होती व ...आमचा भोजन तयार करण्याचे उत्साहावर .... सदावर्त बाबाजी कडे परत दिले , रागावले ... हम तुम्हारे नौकर है ... गप बसुन ऐकून घेतले प्रत्येकी 40 रु. देवुन जेवणं केलं... परत बाबाजी कडे ...मुझे स्थान महात्म सुनाओ ... बाबाजी हसले ..बैठो ...कहांसे आये .. कब परीक्कमा उठाई ... सगळी उत्तरं दीली ...नंतर यहाँ का कोई इतिहास नही ... ये अंबाजी 51 शक्तीपीठ मे नही मगर इस इलाकेमे देवीपर श्रध्दा बहुत है... और प्रसिध्द खुब है .... थंडी जास्तच होती माझ्याकडे पांघरूण कमी मग शेकोटीचा सहारा तिथेच झोपी गेलो
नर्मदेहर ( 52 )
प्रातःकाली उठुन गुहेच्या जवळच नळ चालु होता , मस्त थंडगार पाणी, स्नानपूजनादी नित्यकर्म आटोपून अंबामातेच दर्शन घेतले चहा घेतला व नर्मदेहर केलं 6:30 ला. आता हा उत्तर तटावरील शूलपाणी जंगलाचा भाग , पुन्हा डोंगर , झाड़ी सुरू .. नर्मदेहर ,नर्मदेहर ... मैयाच स्मरण पदोपदी सुरू होत , रस्ता आपोआप मागे जातोय .. 12:00 चे सुमारास बोरीयाद नावाचे गावं .. मोठं गाव होत . जंगलातील असुनही मोठी बाजारपेठ दिसत होती आम्हांस भुका लागल्या होत्या ... एका दुकानदारास आश्रम , मंदीर बाबत विचारले .. त्या॑नी रस्ता दाखवला .. प्रदीपभाई माहेश्वरी यांचेघराचा ..आपकी व्यवस्था हो जायेगी .. मंदीर मे व्यवस्था नही.... एक बच्चा सोबत पाठवला . प्रदीपभाईचे घर व दुकान एकत्रच ... दुकान जीलेबीचे दोघंही पतीपत्नी एकच काम सगळे हॉटेलवाले व आजुबाजुच्या गावातील लोक तेथुन जिलेबी नेत .. भाइंनी तिथंच चटाई टाकली ... व दोन कागदावर अर्धा किलोचे आसपास (प्रत्येकी) जिलेबी व तोंडी लावायला एक एक बूंदीचा लाडू .. व्वा .मस्त मेजवानीच ... भुक लागलेली होती ...... ... पण चौथी जिलेबी खायची ईच्छा होईना .. कसातरी लाडू संपवुन पाणी प्यालो ... त्यांची क्षमा मागुन उरलेली कागदात बांधुन घेतली परत पुढे निघालो ... आता मैयाचे सानिध्यात रहाण्याची खुप सवय झाली . कोणते गाव येईल याची चिंता नाही , जाऊ तिथं काही ना काही व्यवस्था होतेच . नर्मदासंस्कृती खुप वेगळी.. परिक्रमावासीयांच्या साठी प्रत्येकाला काही तरी करावंसं वाटते व ज्याच्या त्याच्या क्षमतेचे नुसार ते सहभाग नोंदवतात . म्हणुन पुर्वीपेक्षा आता परिक्रमा सोपी होत आहे ... फक्त चालणे ..एवढच आपण करायचे ..चालता चालता जिलेबी संपत होती ..पाणी पीत होतो . छोटा उदयपूर जिल्हयात प्रवेश करत होतो उद्यापरवा गुजरात संपवुन मध्यप्रदेश सुरू होईल ..व्याघ्रेश्वरमहादेव मंदीर .. वगाच नावाचे गावांत बाबाजीनी आवाज दिला .. वर गेलो .. आज यहीं रुक जाओ .. नही बाबाजी चाय पियेंगे .. अभी सूर्यास्त होने मे बहुत देर है . चाय तो देता हूँ .. तुम आसन लगाव आज रुकना पड़ेगा ...ऐकावे लागलेच . .. आसन लावलं , कपड़े धुतले .. एक मोठ काम झाले ... आरती पूजन आटोपून भात भाजी भोजन केलं व विश्राम ....
नर्मदेहर ( 53 )
प्रातःकाली अंधारात उठलो स्नान , आरती पुजन आटोपून उशीरा 8:15 ला निघालो थंडी खुपच होती महादेव मंदिरातील ती सकाळ . चहाची खुप आवश्यकता होती मंदिरात सकाळी झाल्यावर परत नाही ... समोर छोटेसे गांव .. महाराजजी ..चाय पीओगे ... ? नर्मदेहर ... त्याच गावात आणखी दोन वेळा चहा मिळाला .. मैया .. पुढे निघालो दमछाक ...होत होती दुपारी दीडच्या आसपास ..जेठाराम आदिवासी आश्रम शाळा ईथे ..नर्मदेहर ... मोठा आश्रम ..पाच सहा कुटुंब पाठीमागे रहातात . दोन माताराम लगेचच जेवण वाढन्यास सुरवात करतात ... मस्त मक्याची भाकरी व चवळीची उसळ गरम गरम स्वादिष्ट जेवण आटोपून लगेच पुढे निघालो काही मार्ग कच्ची ,पक्की सड़क ... चालताना एखाद्यास पुढील मार्ग विचारला तर त्या॑नी सांगितलेला बरोबर असेलच अस नाही .. किंवा तो इतका कठीण असेल की ...कुठुन या रस्त्यानं आलो ... सड़केंन गेलो असतो तर बर झाल असतं .. दोन ओसाड डोंगर चढ़ उतार झाले .. डोंगर पोखरनारी सर्व यंत्रसामग्री जागोजाग दिसत होती , ठरावीक अंतरावर बोअर द्वारे दगडांचे नमुने घेणं ... काहींचे म्हणणं या भागात तेल साठे असायची शक्यता ... जे असेल ते असो ... येत्या 10 -12 वर्षात मैया किनाऱ्याजवळ खुप बदल घडतील अस वाटते .. बराच वेळ चालत होतो ..आणखी दोन छोटी गावं परत दोन कप चहा झाला चहाचे निमीत्तने पायाला विश्रांती ... बराच वेळ चालत होतो .... नर्मदा परिक्रमा आश्रम , बाबाजींकडे नांव नोंदवून .. हातपाय धुवुन आरती पुजन आटोपल्यानंतर 7-8 परिक्रमावासी होते त्यांचेशी गप्पा ,भोजन , परत थोडे विचारपूस व विश्रांती ...
नर्मदेहर ( 54 )
नर्मदा परिक्रमा आश्रम , सुंदर आश्रम ... सकाळी लवकरच आवरले , नर्मदेहर .. करून आश्रमाचा निरोप घेतला 4-5 km एका गावात चहा साठी आवाज ...चहा घेवुन पुढे निघालो ...थंडी मस्तच होती चालणे होत होते .. गावांत हॉटेल होते , दोन समोसे बांधुन घेतले ... पुढे जाऊन एका हनुमानजी मंदिरात बसुन बालभोग .. पुढे जंगल तुडवित ..कडीपानी मागे टाकले वखतगड मोठ गांव , गावात , सदावर्त होतं ... स्वयंपाक करण्यात दीड तास सहजच जातो भीसेनानांना हॉटेलमधे काहीतरी खाऊन घ्या ....म्हणालो मी मंदिरात बसलो नानांचा नाश्ता झाल्याबरोबरच निघालो.. आता मध्यप्रदेशमधे प्रवेश केला होता डोंगर , टेकड्या ओलान्डत एक आदिवासी समाजाचे गांवातून जात होतो ..एका घरात मुलाचे जावळ काढणेचा कार्यक्रम .. ( तिकडं बाबरी म्हणतात )भोजन तो करना पड़ेगा ..दुपारी चार वाजता भात ,भाजी व बूंदी ... जेवणकरून पुढे .. काजलमाता मंदीर उमरी ..सायंकाळचे सहा वाजता पोचलो , देवी मातेला नमस्कार केला ..आणखी एक परिक्रमावासी तरुण साधुहोते.... बाबाजी बरोबर बोलुन त्या॑नी दाखवलेल्या जागेवर आसन लावलं ..बाबाजी विचारायला आले ... यहा खिचड़ीप्रसादी भोजन बनेगा जिन्हे नही चलेगा वो अपना भोजन खुद बनाए ... आम्ही तिघांनी एकमताने ..खिचडी चलेगी सांगुन टाकले ... आश्रमाचे बाहेर गौशाळां बघायला गेलो ...तेवढ्यात एक गाड़ी आश्रमात येवून थांबली ... 12 - 13 परिक्रमावासीयांच सामान त्यातच होतं. त्यांचे जेवणाची व्यवस्था ही गाडी पुढे येवून करत असे .... सुरवातीस साधु त्यांना थांबु देत नव्हते ... नंतर झाले ... साधूंनी आम्हांस आवाज दिला... औ ..परीक्कमावासी ...इधर आव ... चलो ..बीस लोगोका खाना बनेगा इतना आटा लगाव .. आम्ही तिघांनी एकमेकाकडे पाहिले तरुण साधु ..मुझे तो कुछ नही आता ..नानांना ..येतच नाही ... मी खुप थकलो म्हणून खिचडीस तयार झालो होतो पण आमच्यासाठी खिचडी बनवनारे साधुंची भूमिका बदलल्यावर मला चीड आलीच ... मुझे सिर्फ खाना आता है ...मी पण सांगितले ...ये मैयाकिनारा है तुम्हारा घर नही ..सीखना पड़ेगा ...चलो उठो .. आटा बनाव ..मै नही बनाउंगा मुझे आता नही ... और सीखना भी नही ..मी स्पष्ट सांगुन टाकले ..बाबाजी चिडले .. भुका मरेगा ...मैया के भरोसे आयाहूँ मैया मुझे कष्ट नही होने देगी.. मैया तुम्हे दंड करेगी ... मै प्रसाद समझकर दंड भी स्वीकार करूंगा ..मगर खाना नही बनाउंगा ..अस म्हणुन उठुन रूम मधे जाऊन आरती पुजन करून बसलो थोड्या वेळानं त्या गाडीचा ड्रायव्हर व आणखी एक जण जेवणास घेऊन गेले .. मैया उपाशी नाही राहु देत.. भोजन आटोपून ...विश्राम...
नर्मदेहर ( 55 )
सकाळी लवकरच उठुन स्नानादी नित्यकर्म आटोपून आरती पुजन झाले , बाबाजिंनी चहा चे ...नर्मदेहर ..केलं चहा घेतला व नवीन दिवस सुरू झाला ,प्रत्येक दिवस वेगळाच . पात्रं वेगळी ,प्रसंग वेगळा ....7:30ला आश्रमा बाहेर निघालो चढ़ उतार व अवघड रस्ता होता उमर्ठा , अठ्ठा ही गांव ओलांडून पुढे चालत होतो .. .. एका झाडाला एक पाटी लटकलेली .... परिक्कम्मावासियों को भोजन आणी झाडीत बाण दाखवलेला ... दुपारचे 12 : 00 वाजत होते ... चलो .. जेवणासाठी इतका अवघड रस्ता पार करावा लागेल हे दोन km गेल्यानंतर समजले खतरनाक पाऊलवाट खदानीमधुन गेलेली ... आमच्या पाठीवर ओझे हात ... रिकामे नाहीत ... छातीवर खड़ा चढ़ ... भिंतच .. कसातरी वर चढलो , नानांच् कठीणच पण त्यांच्या हीमतीला दाद द्याविच लागेल ... वर आल्यावर हायसे वाटलं . आणखी एक कड़ा चढून गेल्यावर 5 6 घरं दिसले एका मोठ्या झाड़ाखाली एक मंदीर .. बांधकाम अपूर्णच होते .. पारावर सॅक टेकवली . एक माताराम व दोन लहान मुले . आम्हांस बसायला सांगुन त्या भोजन तयार करावयास गेल्या . अर्धा तासाने जेवण करून पुढे निघालो .. आता टेकडी टेकडीने चालत होतो परत पुढे डोंगर ... टेमला गांव मागे टाकले .. एक डोंगर उतरलो नदी वहात होती झाडही होत... अर्धा तास विश्रांती घेतली ... पुढे निघालो ..6 km साकडि गावात शाळा व्हरान्ड्यात पौर्णिमेच्या चंद्र प्रकाशात , आश्रमशाळेचे मुलींनी लगेच भाजी पोळी जेवण आणुन दिले ... आरती पुजन , भोजन आवरुन झोपी गेलो...
नर्मदेहर ( 56 )
पहाटे लवकरच उठलो आश्रम शाळेच्या मुलिंचा कीलबीलाट चालु होता ... हॅण्डपंपावर स्नान उरकले आरती पुजन केलं , मार्गस्थ झालो 3-4 km गेल्यावर आदिवासी पाडा होता ..बाबाजी ...नर्मदेहर ...चाय पीओगे ... घेतला ... परत पुढे जंगल वाटेने चालू लागलो ....सुकली नावाचे छोटसं गांव अचानक समोर आले ,गांव व झाड़ी असे आहेत की लक्षातच येत नाही गावांत प्रवेश करताच उजव्या बाजूला उंच ओट्यावर किराणा दुकान त्यांनी आवाज दिला .. बिस्किट पुडा व चहा दिला ... पुढे रस्ता कठीण आहे , जंगलात रस्ता चुकु नये म्हणून दगड व झाडांना चुना लाऊन पांढरा रंग दिलाय त्याच मार्गाने पुढे जाण्यास सांगितले त्याप्रमाणे चालु लागलो .. तेथील यात्रा काल होती ...एकजण आमच्या बरोबर बोलत होता ..आसपास के 20 -25 गांवमे जिसका शादी करना हे उस लड़का ..लड़की को माता के दर्शन के लिये लाना .. उसके नाम लिख देने के बाद शादी एक साल के अंदर होती है ... त्यांच ऐकुन पुढे निघालो ..कलघाट .नावाचे गांव 7-8 माताराम शेंगादाने भाजताना दिसल्या ... त्यांनी नर्मदेहर करून ओंजळभर भाजलेले शेंगदाणे दिले .. इतके कशासाठी भाजतात मी विचारले ...चिक्की का धंदा है हमारा ... दिन भर मे अध्दा कुन्टल चिक्की बनाते है .. शेंगादाने व गूळ चालता चालता संपवले ... बराच वेळ चालत होतो ..जंगली रस्ता संपला ... डांबरी सड़केने चालत होतो आजुबाजुला डोंगर .. एक मोठा पुल .. हाथीनी नदी ... पुलावरुन पलीकडे गेलो .. डाव्या बाजूला उंच टेकडीवर हनुमान मंदिर .. बाबाजीनी आवाज दिला ...गेलो छोटसं मंदिर .. पत्राचे शेड करायच काम चालु होत ..सॅक टेकवलि ... बाबाजीनी बट्टि व भाजी बनवली ...एकीकडे बोलणे चालु ..काही अंतरावर एक डोंगर दाखवला त्या डोंगरात पार्वती मातेची गुंफा आहे व गणपती बप्पांना हत्तीचे मस्तक बसवण्याची घटना येथेच झाली ...बाबाजी सांगत होते ... खुप मोठ कुंड ..पार्वतीकुंड नावाने ओळखले जाते , हरीतालीका पूजनाच्या दिवशी मोठी यात्रा असते .....मस्तक बाप्पाला बसविल्यावर हाथीका शरीर इस नदी किनारे पड़ा रहा इसलिए इसे ..हाथनी नदी कहते ... .. नयनरम्य परिसर , अवर्णनीय सुंदर डोंगर , मधुन हाथीनी नदीच प्रशस्त वाळवंट , आम्ही उंच टेकडीवर मंदिरात ...बाटी व भाजी भोजन करून पुढे ... कवडा येथे हनुमान मंदिरात पोचलो .. पुढे जवळपास गांव नाहीच ..14 km वर डही गांव जाण्यास अंधार होईल ..जंगलात रस्ता सापडणार नाही .. इथंच थांबायचं ठरले .... आश्रमाचे बाहेर पाण्याची टाकी होती , वेळ होता तर कपड़े धुवुन टाकले आरती पुजन केलं 7-8 MP चे परिक्रमावासी होते थोडे बनवले , थोडे आश्रमाचे भंडारी यांनी दिले सर्वांनी भोजन आटोपले व निवांत विश्रांती ....
नर्मदेहर ( 57 )
प्रातःकाली उठलो स्नानादी प्रातर्विधी आटोपल्यानंतर आरती पुजन .. थंडी खूपच होती चहा मिळाला , शेकोटी पेटलेली होती ..चहा संपेपर्यंत हातपाय गरम करून घेतले ... नर्मदेहर .. करून प्रयाण केलं .. 8:00 ... चढ़ उतार , उखडलेला ,दगड गोटे असलेला कठीण असा रस्ता होता , 13 km अंतर पार केलं 11:00 ला डही ह्या गावात पोचलो , एका व्रुध्द व्यक्तीने चाहा साठी आवाज दीला ... बसलो त्यांचे नांव त्यांनी स्वतःच नांव सांगुन परिचय दिला ...सोनुसिंह पवार ...त्या॑नी 2002 मधे परिक्रमा केली होती ... माझ्या बरोबर आठवणींना उजाळा देत होते ... त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान दिसत होता , परिक्रमा या विषयावर कोणताही परिक्रमा वासी ...सलग दोन दिवसही बोलु शकेल ... पण मला नीघणे भाग होते सोनुसिंहकाकाना नर्मदेहर करून पुढे चालु लागलो . ..2 km हनुमान मंदीर भोजन साठी थांबलो .. दहा पंधरा मिनिटात जेवण करून पुढचा रस्ता पकडुन चालु लागलो ..आज सकाळपासुन नाना पुढे आहेत .. मैयाचे किनाऱ्याने , चालताना आजुबाजुच जनजीवन निरीक्षण केलं तर गरीबी तर आहेच , तरीही परिक्रमावासी त्यांच्यासाठी काही तरी विशेष आहेत .परिक्रमावासीयान्साठी क्षमतेनुसार छोटी मोठी मदत करून काही पुण्ण्याच काम केल्याचे समाधान मिळवतात ,लहान लहान खेड्यात भोळे भाबडे , श्रध्दावान आहेत . मैयाचे किनारे श्रीमंतीने नसले तरी एका वेगळ्याच नर्मदासंस्कृती व परंपरेने सम्रुध्द असच आहे . ....पायाला गोळे चढतआहेत ... वाळवंट मोठ मस्तच होतं ...मैया किनारा प्रत्येकाला वेग वेगळे अनुभव देवुन चकीत करतो , परिक्रमेत चालताना ठरवलेल पुर्ण होने .. क्वचितच त्यामुळे चालत रहाणे ... तीन साडेतीन तासानंतर कुआँ धर्मराय ..हनुमान मंदीर आश्रम आसन लावलं नाना पोचले होते .. बाबाजी कडे नांव नोंदवून हातपाय धुवुन आरती पुजन झाले ... इथे पाण्याचा खुप कमी वापर करा अशा सूचना आधीच मिळाल्या होत्या . बाबाजी सुरवातीस अबोल वाटले पण सुरू झाल्यावर .... काहीवेळानं भोजनं झाले आणखी 4-5 जण होते .. जेवण आटोपून अंथरुन काढतच होतो ... बाबाजी आले होते .. विराजीये ... बाबाजीनी धर्मराय गावाची ऐतिहासीक पार्श्वभूमी , धर्मराजाने येथे तपश्चर्या केली ती कथा व ईतर ही आणखी कथा सांगितल्या .... झोप येते आहे ... बाबाजीच्या लक्षात आले ... अरे अरे ..आराम करो ..आराम करो म्हणत उठले ... बाकी सगळे केव्हाचे आराम करत होते ....जातांना बाबाजी लाईट बंद करून गेले ...लगेचच झोपी गेलो ..
नर्मदेहर ( 58 )
कुआँ धर्मराय .. सकाळी लवकरच जाग आली , ईतर परिक्रमावासी आवराआवर करत होते पाण्याचे दुर्भिक्ष असल्या मुळे ..आम्हीही आटोपून घेतले बाबाजीनी चहा दिला तो घेऊन नर्मदेहर केलं .. रस्त्यात एका विहिरीवर स्नान आरती पुजन आटोपल्यानंतर पुढे निघालो .. डेहेर ,पीपलीपुरा ही गांव ओलान्डली .. रस्त्याकडेला एका घरातुन नर्मदेहर आवाज आला ..आत गेलो ..भीसे नानांचेभोजन झाले होते . मी जेवणासाठी बसलो .. गरमगरम बाटी डाल , भोजन मिळाले ...लगेचच निघालो .... दोन तास चालत होतो दुर्गा मंदिरात थोडा बसुन आराम केला व पुढे मार्गस्थ झालो रस्ता कठीण व त्यातच चप्पल तुटली .. दोरीने बांधून तसाच पुढे ... 5-6 km गेल्यावर निसारपूर नावाचे मोठ गांव आले .. दुकान शोधून नवीन सँडल विकत घेतली , हॉटेल वर चहा घेवुन पुढे चालु लागलो . एकटाच चालत होतो त्यामुळे गती वाढली होती. रस्ता खराबच होता तरीही बरच चाललो होतो. नर्मदानगर मागे टाकले 5:30 - 6:00 चे आसपास चिखल्दा येथे पोचलो चौरस्ता होता चौकशी केली हरीहरेश्वर मंदीर दोन km. असल्याचे सांगितले ... तेवढ्यात एक ग्रहस्थ जवळ आले ... रुकना है ..? हां ... हमारे घर चलो.. परिक्रमेत आधी आश्रम नंतर मंदीर ... उपलब्ध नसेल तरच कुणाचे घरी जायचं ...प्रश्न पडला होता ... अनोळखी भाग , नसते भानगड मागे लागायला नको .. मै मंदीर जाता हूँ अस म्हणुन निघालो तो परत मागे आला ..मंदीर मे जानेके लिये अब वक्त नही ... हमारे यहा सिर्फ परिक्रमा वासी रूकते घरके लोग गांव मे रहते यहाँ आपही रहोगे .. ईतर दोन तीन लोक यहीं रहे जाओ म्हणत होते अखेर थांबावे लागले ..मोठ्या परिसरात घर होत वरच्या मजल्यावर एक खोली ..सर्व भोजन सामग्री , गॅस , स्वयंपाककरायला भांडी सर्व होत ..आधी हातपाय धुवुन आरती पुजन केलं ..खाली गायीं व म्हशी साठी वेगळी गोशाला होती दूध काढणारा पोरगा आलेला होता त्याने मोठा तांब्या भरून म्हशीचे दूध दिले .. पोळ्या केल्या चटनी होतीच छान जेवण करून बाहेर डोकावलं ....खाली सर्व सामसुम.. सर्वजण निघुन गेले होते दार बंद करून झोपी गेलो ...
नर्मदेहर ( 59 )
प्रातःकाली उठलो स्नानादी नित्यकर्म , आरती पुजन आटोपून खाली आलो , गायींचे धार काढणे चालु होते ... देवराम नावाचे तरुणांने ग्लास भरून गायीच धारोष्ण दुध दिलं .... नर्मदेहर करून मार्गस्थ झालो गावाबाहेर येताच मैया किनारा सुरू झाला .. जुनी मंदिरांची अवस्था खराबच .. पण त्या मंदिरात हज़ारों वर्षांचा इतिहास दडलेला . आता भग्न अवस्थेत असलेल पुरातन बांधकाम त्या काळातील ऐश्वर्य संपन्नता लक्षात आणुन देत होतं . उजव्या बाजूने मैया वहात आहे बाजूने विस्तीर्ण काटेरी झाडांच जंगल , बोधवड नावाचे गावातुन जायचे होते ... मलवाडा नंतर बोधवड येईल अस सांगितले होते .. तीन साडेतीन तास झाले तरी गांव दिसत नव्हते ... विचारायला कुणीच नाही त्यामुळे चालणे हाच पर्याय होता . चालत राहीलो बराच वेळाने मासेमार मंडळी भेटले ... रस्ता चुकलात अस त्यांनी सांगितले ... अब गांगली आयेगा , वहासे खिसको... ठीक आहे .पुढे चालत होतो. एक डगर उतरायची होती , टाळून जायचं तर 3-4 km चा फेरा मारावा लागेल ... उतरताना जमले नाही तर ..हातपाय जखमी व्हायचे .. कोणी तरी येईल म्हणुन अर्धा तास वाट पाहिली .पण कुणाचाच पत्ता नाही बसुन कंटाळलो अखेर ऊतरायचा निर्णय घेतला . कमंडलू रिकामा करून शबनम मधे टाकले सॅक काढून हातात घेतली नर्मदेहर म्हणुन पाऊल टाकले ... काठीचा आधार घेत हळु हळु उतरत होतो 20-22 फुट खाली जायचे होत ... आणी पाय ठेवायला चार सहा बोटाची जागा ... जमेना ..परत वर जावे ..तर ते आणखी कठीण ... जेमतेम पाच सहा फुट उतरलो होतो .. खाली दगड गोटे ,काटे .. काहीही झाले तरी जखमी व्हायचे नाही हे ठरवलं .. आणी सरळ सॅक खाली फेकले .. खाली बसुन उतरू लागलो उघड्या पडलेल्या झाडाच्या मूळया धरत कसतरी ख़ाली आलो . परत मैया वर जाऊन पोटभर पाणी पिऊन कमंडलू भरून घेतला व ... पुनश्च ... नर्मदेहर ... दुपारचे अडीच तीन वाजता गांगली येथे पोचलो ...आश्रम नव्हता .. दुकानातून गूळ शेंगादाने घेतले व पुढचा रस्ता पकडला . कौठी गांव मागे टाकले सायंकाळच्या सुमारास अक्कलबारा ... पंचमुखी हनुमान मंदिरात . उंच टेकडीवर चढून गेलो छोटा आश्रम एकच खोली .. बाजूला रिकाम्या गोण्या वापरून बनवलेल शेड .. टेकडीच्या बाजूने मैया .. आजुबाजुला जंगल ... आरती पूजन आटोपून बाबाजी सोबत बोलु लागलो .. चौकशी झाली गप्पा मारता मारता खिचडीप्रसादी भोजन आटोपल बोलता बोलता बाबाजी बिघडले .. कारण समजलं नाहीच ... आत खोलीत जाऊन दार आतुन लावुन घेतले .... झाडाला एक बल्ब टांगलेला , मर्यादीत प्रकाश , बाबाजी आत व बाहेर मी एकटाच .. ती रात्र थरारकच होती ...सकाळ होण्याची वाट पहात झोपी गेलो ....
नर्मदेहर ( 60 )
सकाळी स्वच्छ उजेड होवु दिला , नंतर उठलो समोरच पाण्याची टाकी होती स्नानादी प्रातर्विधी आटोपून आरती पूजन झाले . बाबाजी बाहेर आले होते .. दोन तीन लोक दर्शनास आलेले होते . बाबाजीनी चहा बनवला , चहाघेवुन नर्मदेहर केलं .. मैयाचे किनाऱ्याने चालु लागलो .. सकाळची थंड वेळ बाजूस मैया ... अथांग हिरवाळीचा गालिचा मैलभर पसरलेला ...त्यावर मी एकटा चालतोय .. माझ्या मते तरी .... यापेक्षा मोठ सुख दुसर् नाहीच ... आणी मी स्वच्छंद बागडत होतो ... ..मैयाचे कडेवर .. आतापर्यंत परीक्रमेमधे कोणताच त्रास मैयाने होवू दिला नाही ... बराच वेळ तो आनंद घेत चालत होतो पुढे किनारा सोडुन वर यावे लागले , आणी सेमलदा कडे जातांना ... सगळीच बरोबरी झाली दुपारी एका आश्रमात भोजन झाले ..पुढे निघालो वाटेत गंगाकुंड येथे गंगा दर्शन करून पुढे या ठिकाणी गुप्त गंगा असल्याची मान्यता , गंगा दशहरा यादिवशी यात्रा असते अस इथल्या बाबाजीनी सांगितले ...पुढे चालतोय ..पेरखड ,शरीफपुरा ही गाव ओलांडून बडदा येथे पोचलो चौकशी करता महाकालेश्वर महादेव मंदिरात व्यवस्था होईल ... निघालो दोन अडीच की.मी. परत पुढं ... महाकालेश्वर मंदिरात आसन लावलं आरतीपुजन करून थोड्या गप्पा 7-8 जण होते भोजनं करून विश्रांती.
नर्मदेहर ( 61 )
प्रातःकाली लवकरच उठुन स्नानादी प्रातर्विधी आटोपले आरती पुजन केलं व मार्गस्थ झालो , कच्ची सड़क आजुबाजुला शेतं , मैयावरुन असंख्य पाईप लाईन केलेल्या .. काही ठिकाणी त्यातुन वाट काढावीं लागत होती , आज mp मधील दोघं बरोबर निघाले होते सर्व जण बरोबर चालत होतो 9:00 वाजेची वेळ .पाठीमागून जनावरेही येत होती .त्यातील एक म्हैस उधळली व पाठीमागे चालत असलेले mp चे तोताराम हया परिक्रमा वासीयाला जोरदार धक्का देवुन गेली , बराच मार लागला होता .चालणे शक्यच नव्हते ..रस्त्यावर वाहतूक कमीच ..बराच वेळ वाट पाहिल्यावर एक टेंपो आला त्यात त्यास बसवले व पुढे असलेल्या बाकानेर नावाच्या गावांत पाठवले ...दुसराजोडीदार शामबाबु व मी चालु लागलो . साधारण 2:30 -3:00 तासात आम्ही बाकानेर मधे पोचलो , भुक जाणवत होती आधी दिसेल त्या हॉटेल मधे शिरलो समोसे व चहा घेतला ... बाहेर येवुन दवाखांन्याची चौकशी ... तोताराम बेडवर .. गुडघा सुजलेला , आज चालणे शक्यच नव्हते ...त्यांचेशी बोललो .. बाहेर येवुन शामबाबु चा निरोप घेतला व निघालो रस्त्यात ATM शोधुन पैसे काढले , परत चहा घेऊन रस्त्यास लागलो . काही वेळ रस्ता .. काही मैया काठाने असा चालत होतो बोलण्यासाठी बरोबर कोणी असेल तर चालण्यावर परिणाम होतोच आज दुपारनंतर गती चांगलीच वाढली होती ... आज पळतच होतो . सायंकाळी रुद्रेश्वर हनुमानमंदीर .. लुन्हेरा .. भारतमाता सेवास्रम येथे ..आसन लावलं हातपाय धुवुन आरती पुजन केलं .. पुण्याचे देवधर व आणखी तिघे जण होते ... गप्पा मारत बसलो ...भाऊ संजयचा फ़ोन आला , काही वेळानंतर जेवणं आटोपल्यानंतर विश्रामच ...
नर्मदेहर ( 62 )
लुन्हेरा आश्रमात पहाटेच जाग आली , टाकीवर जाऊन स्नानादी प्रातर्विधी आटोपल्यानंतर आरती पुजन केलं सकाळचे 7:00 वाजता बाबाजीनी पोहे व वडा गावातुन मागवला होता , बालभोग घेवुन ..नर्मदेहर ..केले व मार्गस्थ झालो , आता जंगल भाग सुरू झाला होता . दुपारचे 12:30 पर्यंत सलग चालत होतो .. रामा धामा मार्गे काली बावड़ी पर्यंत गेलो . थोडा वेळ राम मंदिरात थांबलो , नंतर एका हॉटेल मधे कचोरी व समोसा .... चहा घेवुन पुढे निघालो मैया आता बरीच दुर रहाणार आहे ... (मी मांडवगड हून जाण्याचा निर्णय घेतला , बहुतेक परिक्रमावासी मांडवगड जाणे टाळतात ) बराच लांब घाट चढुन जायचे होते व सर्व जंगल होते त्यामुळे आज लवकर येईल त्या आश्रमात रहावं असा विचार करत होतो . 5-6 km गेल्यावर आश्रम लागला छोटसं मंदीर होत , समोर एक हॉल होता .. एक साधु बाबा व एक माताराम होते ... पण वेगळंच वाटत होत ... साधुबाबा ... जरा भीतीदायक होते . 7-8 परिक्रमावासी धरून आणल्या सारखे चुपचाप बसुन होते कुणीच कुणाशी बोलत नव्हते . बाजूला बरीच जंगलसंपत्ती , डींक , मूरड शेंगा , बेहाडा यांची पोते भरलेले होते , चंदन , रक्तचंदनची लाकडे रचून ठेवले होती ... थोडक्यात अंदाज येत होता ..समोर हॅण्डपंप होता हातपाय धुवुन पूजा आरती केली .. खिचडीप्रसादी भोजन आवरले थोडे बोलत बसलो ... लाईट नव्हते त्यामुळे लवकर झोपन्याशीवाय पर्याय नव्हता ...
नर्मदेहर ( 63 )
प्रातःकाली उठुन स्नानादी नित्यकर्म, आरती पुजन झाले , चहा घेवुन नर्मदेहर करून जंगलात शिरलो . सात km चा घाट समोर होता झपाट्याने निघालो . आज राजा भोज यांनी वसवलेल्या ( मांडु शहर ) ' मांडवगड ' या पर्वतावर असलेल्या प्रसिद्ध शहरात पोहचनार , दोन अडीच तासात घाट पार करून वर आलो ... निलकन्ठेश्वर महादेव परिसरात ..छत्रीधारी गणेशजी बाहेरच होते त्यांना आगमनाची वर्दी देवुन दर्शन घेतले .व महादेव मंदिरात पायऱ्या उतरून प्रवेश केला , काही हजार वर्ष पूर्वीचे ऐतिहासिक ठिकाण . पहाडात बांधलेले अप्रतीम व सुंदर प्रशस्त मंदिरात जावुन दर्शन घेतले , तेथेच थोडे थांबुन विश्रांती घेऊन वर आलो , ऐतिहासिक पर्यटन स्थळ असल्यामुळे हॉटेल ,दुकाने यांची रेलचेल ...बाहेर येवुन पुढील मार्गास लागलो . तीन km वर श्रीराम मंदीर ... चार हात असलेले रामप्रभु .. एकमेव मंदीर ईतर कुठेच चतुर्भुज राम मंदीर बघण्यात नाही . आत जाऊन दर्शन घेतले . आसन लावुन थोडा बसलो ... घाट चढल्यावर व्हायचा तो त्रास होत होताच . जेवणाची व्यवस्था नव्हती . काही वेळ आराम करून शहर बघायच ठरवुन पुढे ... मोगल कालीन जुने महाल , हत्ती हौद , अशर्फी महल , ई. ठिकाणं पहात फिरताना दिवस कसा गेला ते समजलं नाही , मोगल काळात खुरासन या देशातून आलेल्या मोठ्या आकाराच्या चिंचेच या भागात बी रुजले व मोठ मोठी( भूता सारखी दिसणारी ) झाडे उगवले . शेकडो मोठमोठी झाडे फक्त इथंच पहायला मिळतात .काही झाडांना मोठ्या भोपळयाएवढ्या आकाराच्या चिंचा बघायला मिळाल्या , आकारानुसार 100-150 रु. ला एक चिंच विकली जाते व पर्यटक हौसेने घेतात , आंबट गोड चव खुप छान .... बराच वेळ भटकुन थकलो होतो .एक हनुमान मंदिरात गेलो . थान्बन्याचि परवानगी घेऊन आसन लावलं , हातपाय धुवुन आरती पुजन केलं ... एकटाच होतो . बाबाजी बरोबरगप्पा मारल्या , स्वयंपाकास मदत केली जेवणं करून निद्रा धीन झालो ...
नर्मदेहर ( 64 )
प्रातःकाली उठुन स्नानादी , आरती पुजन आटोपून नर्मदेहर केलं , बाहेर येवुन हॉटेलवर चहा घेऊन रेवाकुंड येथे निघालो , रस्त्यात अनेक मोठी मोगलकालीन , इंग्रजकालीन बांधकामे बघत निघालो . रस्त्यास दुतर्फा मोठी झाड़ी मधुनच एखादा रिसोर्टचा बोर्ड , शेकडो एकर जागा कुंपण घालुन बंदीस्त , पाश्चात्यपध्दतीचे हॉटेल्स , घरे , मोठ्या तलावाला वळसा घालुन रेवाकुंडाकडे जाणारा चढ़ चढायला लागलो . राणी रूपमती साठी मैया या पहाडावर आली ते रेवाकुंड समोरच ... हातपाय धुवून डोळ्यांना पाणी लावुन वंदन केलं व पुढे राणी रुपमतीचे महाल , ( या महालाचे गच्चीवरुन 15 km दुर असलेल्या नर्मदा मैयाच दर्शन होते ) बाजबहादुर महाल बघुन महालाचे पाठीमागील रस्त्यानं पहाड़ उतरण्यास सुरवात केली . माझ्यामागेच परभणीचे दोघं व एक नांदेडचे असे तिघेजण निघाले होते , डोंगर उतरने खुप अवघडच होते , पाऊलवाट खाली जात होती तीला अनेक उप वाटा ... मी सांभाळून उतरत होतो .लक्ष वीचलीत झाले तर... गछंतीच .. उतरतांना कमरेइतक्या दगडांवरुन खाली पाय टाकावे लागत होते ,झाड़ी , वेलीची जाळी घनदाट होती , पाठीमागून येणारे परभणी वाले रस्ता चुकले होते ... त्या॑नी एकमेकास हाका मारलेल्या ऐकू येत होत्या अखेर खाली पोचलो . एका झाडाखाली बसलो ... एक पोरगा उंडे( गोवऱ्या ) वेचत होता त्याच्याशी बोलत होतो ... इधर कभी कभी शेर रहेता ..हे ऐकूनच हबकलो होतो ...मैय्याच रक्षण करणारी ... पाणी पिऊन पुढील मार्गास लागलो . हीरापुर , बणझारी मागे टाकुन बगवानीया येथे चित्रकूट अखंड सच्चिदानंद आश्रम मधे विसावलो . भोजन करून पुढे मार्गस्थ झालो . झपाट्याने चालत होतो . कुंडी ,धाम्नौद मागे टाकले ... खलघाट मधे चहा घेऊन थोडी विश्रांती घेतली . ... पुढे निघालो कनबाड्याहून पाऊलवाटेने महेश्वरला पोचलो ... पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या महेश्वरमधे ... दुसर्यांदा येत होतो .... कोणत्या आश्रमात जावे विचार करत होतो तेवढ्यात ...भीसे नाना समोरच दिसले , मला पाहून आनंदाने मीठीच मारली .. भावनाविवश झाले होते , माझी काळजी वाटत होती म्हणाले .... थोड्या गप्पा मारल्या , त्यांचे बरोबर संगमनेरकर होते ,पुर्वी दोन वेळेस भेट झालेली होती . ते सर्व जण दर्शनास जात होते ... ते सप्तमात्रुका आश्रमात थांबलेले होते . थोडेबोलुन ते दर्शनास गेले ... थोडे थांबलो विचार केला व मौनी बाबा आश्रमाकडे वळलो . आश्रमात नांवनोंदवून आसन लावलं . हातपाय धुवुन आरती पुजन केलं , 30 -35 परिक्रमावासी होते बरेच ओळखीचे होते .. गप्पा झाल्या एकमेकांचे अनुभव कथन झाले ...भोजन झाल्यावर विश्रांती ...
नर्मदेहर ( 65 )
मौनीबाबा आश्रमात पहाटेच लवकर उठलो घाटावर जाऊन स्नानादी प्रातर्विधी , आरती पुजन आटोपून चहा घेतला व महेश्वरदर्शन साठी निघालो . प्रशस्त असा घाट मैया खळांळ्त वहाते आहे घाट भावीकानी गजबजलेला होता सूर्योदय होत होता , मोठ सुंदर द्रूश्य होत . पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या कर्तुत्वाच मनोमन चिंतन करीत होतो. राजराजेश्वर सहस्रार्जुन मंदीर ...या मंदिरात हज़ारों वर्षापासुन शुध्द गायींच्या तुपांचे अखंड तेवत असलेले 11 नंदादीप ... दर्शन करून वर राजवाड्यात गेलो ,पुण्यश्लोक अहिल्याबाईमातेच दर्शन घेवुन महेश्वरचा शंभूमहादेवाचे दर्शन घेवुन बाहेर निघालो , एका टपरीवर चहा घेवुन महेश्वरनगरीला नर्मदेहर केलं . मैया किनारे असंख्य मंदीरे , घाट बघत निघालो होतो . ज्वालेश्वर दर्शन करून पुढे मन्डलेश्वर ... अचानक हाक ऐकु आली ... वर आश्रमातून मराठीतून हाका व बोलावणे होत होते ...पण मी खुप ख़ाली मला दिसत नव्हते ... भूकही लागली नव्हती व फक्त 11:00 वाजले होते , मी तसाच पुढे निघालो , वरतुन सारखे आवाज द्यायच काम चालुच ... शेवटी ते खाली उतरून आले .... काल भेटलेले परभणीकर होते ... राधे राधे करोबाबा अन्नक्षेत्र मधे त्यांनी स्वयंपाक केला होता वर असल्यामुळे त्यांना मी दीसलो होतो . वर जाऊन जेवण केलं व न थांबता पुढे निघालो .. कच्चा पक्का रस्ता तुडवत सायंकाळी 6:00 च्या सुमारास सेमल्दा इथे पोचलो आश्रमात आसन लावलं हातपाय धुवुन आरतीपुजन केलं .. रोजच्या प्रमाणे गप्पा ..रोज नवीन मंडळी , नवीन ओळख ... जेवण करून विश्रांती ..
नर्मदेहर ( 66 )
प्रातःकाली लवकरच उठलो टाकीवर जाऊन स्नानादी प्रातर्विधी आटोपले , चहा घेवुन नर्मदेहर केलं .. रस्त्यास लागलो एक गांव ओलांडून रामपाल घाट इथे पोचलो , एका आश्रमात चहा घेतला थोडे बसुन परत पुढे निघालो , मेहताखेडी ओलांडून चारूकेश्वर येथे दगडूमहाराज आश्रमात भोजन केलं ... इथे रस्ता विचारले असता बडवाह येथे जावुन तेथुन पुढे जावे लागेल असे सांगण्यात आले . त्याप्रमाणे बडवाह शहरात आलो ..शहर ओलांडून नागेश्वरमहादेव मंदिरात दर्शन घेतले , महोदरी आश्रम चौकशी करता आश्रम जंगलातच आहे , रस्ता डांबरी रोड आहे पण वन्य पशुंची भीती असते अस समजले . नागेश्वर मंदिराचे पुढे मिल्ट्रिकँप खुप मोठा आहे , योगायोग असा की एक फौजी बाजूस उभा होता , महाराष्ट्रीयन सातारा जिल्ह्यातील त्यांनी बोलणे ऐकून स्वतःहून पुढेयेवून मला रस्ता समजावून सांगीतला . त्याप्रमाणे पुढेनिघालो जंगल घनदाट होते , डांबरी रोड ... व मी एकटाच चालतोय ... मधुनच एखादी गाड़ी भरधाव निघुन जाई ... दोन अडीच तास चालत होतो ... दुपार टळून उन्हे उतरणीला लागली होती , अखेर उजव्या बाजूस झाड़ीकडे महोदरी आश्रमाचा बोर्ड दिसला ... कच्चा रस्ता , पाय वाट ... बडवाह मधून निघाल्यानंतर ... पायी चालणारा मी एकटाच ... रस्त्याने भीती वाटत होती बोर्ड दिसला तर हायसे वाटले ... आता त्या अरण्यात शिरलो होतो . मैयाचे विश्वासावर ... नर्मदेहर ... दोन km नंतर झाडीत लपलेला आश्रम दिसला ...जिवात जीव येणे म्हणजे काय ...ते नक्की समजले ... आश्रमात आलो दर्शन घेवुन हॉल मधे आसन लावलं . चवन ऋषींनी येथे महादेवाची तपश्चर्या करून आयुर्वेदज्ञान मिळवले .. अत्यंत पवित्र स्थान येथे आश्रमाचे मुख्य बाबाजी महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील आहेत . हातपाय धुवुन आरती पुजन केलं आश्रमातील आरतीला हजेरी लावली , भोजन करून बाबाजी बरोबर गप्पा मारल्या 20-22 परिक्रमावासी होते एकमेकांची चौकशी झाली व नंतर विश्रांती.
नर्मदेहर ( 67 )
प्रातःकाली लवकरच उठुन आश्रमा बाहेर आलो सर्वत्र अंधार होता , पाखरे ,जनावरे ,आळस झटकत नवीन दिवसाचे स्वागताला तयार होऊ लागली होती . काही उत्साही मंडळींनी शेकोटी पेटवली होती .थोडे अंग गरम करून आजच्या पुढील रस्ता व गावं , मुकाम कुठे करावा याबद्दल चर्चा ... आत आश्रमात जाऊन स्नानादी प्रातर्विधी आटोपून आरती पुजन केलं , चहा घेवुन धुळ्याचे बाबाजींना भेटलो त्यांचा निरोप घेवुन नर्मदेहर करून आश्रम सोडला . आता जंगलप्रवास सुरू झाला , कच्चारस्ता ,झाड़ी , डोंगर पार करत चाललो होतो . आज राजस्थान मधील एक त्यागी साधु बरोबर होते , मोठा उमदा तरुण होता व उत्साही होता अखंड बोलत असे . बाकी मंडळी मागे पुढे होते . हीरानीया या गावापर्यंत जंगलच होते . हीरानीया मधे थोडे थांबुन चहा घेतला . पुढे निघालो पीपरी गांव ओलांडून पुढे सीतावन येथे पोचलो . प्रभुश्रीरामचंद्र यांनी सीतामाईचा त्याग केला ,महर्षी वाल्मीकीऋषी सितामाईला या आश्रमात घेवुन आले व येथे लव अंकुश यांचा जन्म झाला ...श्रीराम,सीतामाइंच दर्शन घेऊन पुजारीजींबरोबर बोलत बसलो .. नीबीड अरण्यात मंदीर होतं ..पुजारीजीनी खालचे बाजूस जाणाऱ्या पायऱ्या दाखवल्या . सीताकुंड दगडातच गुहा .. छोटासा आश्रम दोन साधुबाबा संपुर्ण पायऱ्या , गुहा , आश्रमास पांढऱ्या चुन्याने रंगवलेल् .... वानरसेना भरपूर व खोडकर ... दर्शन केलं एक आळंदीचे एक तरुण परिक्रमावासी भेटले ते थांबणार होते . दर्शन करून वर मंदिरात आलो , पुजारीजी वाट पहात होते ... भोजन आटोपे पर्यंत गप्पा ... हिम्मतवान कुटुंब होतं ..घनदाटअरण्यात दोन मुलं , सुना , नातवंड सम्पूर्ण परिवार आणी विशेष म्हणजे सर्वजण आनंदी . नर्मदेहर करून पुढे निघालो . एक गांव ओलांडून जयंतीमाता मंदिरात पोचलो उद्या सकाळी लक्कडकोट जंगल पार करायच आहे , अतिशय खडतर प्रवास अस वर्णन ऐकलेल होत सलग चालायचे होते ... माझ्या व्यतिरिक्त ईतर 6जण होते , चार MP वाले , एक राजस्थानी , एक बंगाली .... बघु उद्याचं उद्या ... हातपाय धुवुन आरती पुजन करून ..लगेचच भोजन , नंतर सहाजणांची छोटीसी चर्चा व सकाळी 7:00 ला निघायचं ठरवुन सर्वजण आपापले आन्थरुनावर ....
नर्मदेहर ( 68 )
प्रातःकाली उठुन स्नानादी नित्यकर्म ,आरती पुजन झाले . सर्वजण एकत्र निघायचे होते सर्व जण तयार होते चहा झाला , कमंडलू व बाटली पाण्याने भरून घेतली , बिस्किटपुडे ,शेंगदाणे गूळ होतेच . बरोबर 7:00 ला नर्मदेहर करून मार्गस्थ झालो , जसे जसे पुढे जात होतो तसतसे जंगल गंभीर होत होतं . सलग चालत होतो , दररोज कुणी कुनासाठी थांबत नाही किंवा बरोबर चालतही नाहीत . पण आज ... उलट चित्र ....नर्मदेहर .. नर्मदेहर .. करीत एकमेकांच्या जवळच रहात होते . बंगाली परिक्रमावासी हळहळ करत होते ... त्यांच चार्जर राहुन गेले होते .... सर्वांच्या मधे राहाण्याची चपळाई करत होते , तीन साडेतीन तासाने जंगलाचे मध्यावर हनुमानजीचे चौथऱ्याजवळ पोचलो , सर्वजण बसुन बालभोग केला पाणी पिऊन वेळ न दवडता पुढे मार्गस्थ झालो .. जंगलात आम्हांला कोणताच भीतीदायक प्राणी दिसला नाही , किंवा भीतीही वाटली नाही , दमछाक मात्र झाली होती साधारण 3:30 चे आसपास पामाखेडी पोचलो , राममंदिरात दर्शन घेवुन बसलो , चहा मिळाला थोडा आराम करून पुढे निघालो , MP वाले चौघं तेथेच थांबले . आम्ही तीघे निघालो . एक गांव ओलांडून पुढे गेल्यावर एका आश्रमात पोचलो , हातपाय धुवुन आरती पुजन करून ... सदावर्त मिळाले स्वयंपाक ..बटाटा भाजी व ठिक्कर बनवले भोजन करून विश्रांती.
नर्मदेहर ( 69 )
सकाळी लवकरच उठलो आश्रमा समोरच शेतात मोटार चालु होती . स्नान ,आरती पुजन केलं चहा घेतला व नर्मदेहर करून पुढे मार्गस्थ झालो . सड़क मार्गे चालत होतो काही शॉर्टकट असे की 5-6 km अंतर वाचून जाई पण अवघडच होते , मैयाचे आशीर्वाद असतील तर अवघड काहीच नसते . ... दुपारचे दीड दोन वाजले असतील तमखान गावांत शिरलो सदावर्त देत होते पण वेळ जास्त लागेल म्हणुन नको म्हणालो , चहा घेवुन पुढे निघालो चालता चालता बिस्कीटपुडा संपवला . एक दोन गावं ओलांडून नेमावर येथे आलो ... नेमावर या ठिकानास मैयाचे नाभीस्थान समजले जाते .....काही हजार वर्षा पुर्वी भु मापनाचे कोणतीच संसाधन नसतांना हे स्थाननिश्चित कसे केले असेल , नदीपात्रात मध्यभागी ते ठिकाण आहे , धार ओलांडून जायचे नसल्यामुळे परिक्रमावासी जात नाहीत .मैयाचे शेजारीच ... ब्रम्हचारी आश्रम .. पु.वासुदेवानंद सरस्वती यांचे पदचिन्ह .. दर्शन घेतले . बरेच परिक्रमावासी होते , स्वामी विश्वानंद सरस्वती ( बंगलोरचे स्वामीजी) भेटले . त्यांना त्रास होत होता , ईतर चौकशी झाली . ब्रम्हचारी आश्रमात महाराष्ट्रीयन मंडळी बरेच होते . मंदिरासमोरचा मोकळा हॉल पुर्ण भरला होता , मला आसन लावण्यासाठी जागा नव्हती ..प्रफुल्ल महाराज यांना कल्पना दीली . त्यांनी एका रूममधे व्यवस्था करून दीली ... त्यांची परवानगी घेवुन स्वामीजीन्ना रूम मधे आणले पुढील दोन तीन दिवस ते इथेच राहुन ट्रिटमेंट घेणार होते . ईतरही ओळखीचे भेटले सर्वांसोबत बोललो ...आरतीपुजन केलं .... भोजन करून नीद्राधीन झालो .
नर्मदेहर ( 70 )
प्रातःकाली उठुन स्नानादी प्रातःकर्म आटोपल्यानंतर आरती पुजन केलं , विश्वानंदसरस्वती स्वामी यांनी त्यांचे ATM कार्ड दिलं व पैसे काढून आणुन द्या म्हणाले, त्याप्रमाणे त्यांना पैसे आणुन दिले ,तब्येतीची काळजी घ्या असे म्हणुन नर्मदेहर करून निरोप घेतला
4-5 km गौनी नदी संगम तूरनाल नावाचे गांव ... मैया काठावर परशुराम महादेव नर्मदासेवा आश्रम बाबाजीनी चहासाठी आवाज दिला ... चहा होईपर्यंत बोलत बसलो .. महाराज मूळचे महाराष्ट्रीयन मराठी जमेल तस बोलत होते. 38 वर्षापासुन मैया किनाऱ्याजवळच रहातात ... चहा घेतला .. निघताना त्यांचे नांव व गांव विचारले ...तुम्हे नाम से क्या करना ...सब मुझे ' भंडारी बाबा ' नाम से पहेचानते .फ़ोन नं मात्र दिला 7697073957 व श्रावण मासमे हम नासिक आते ..तब तेरे घर आ जाऊंगा अस आश्वासन दिलं ... नर्मदेहर .करून पुढे निघालो ...येथे श्री परशुराम प्रभु यांनी आई व वडिलांचे श्राद्ध तर्पण या ठिकाणी केलं . एका मोठ्या खडकात पाच पिंड कोरलेले आहेत . असाच आणखी एक खडक होता त्यावर ही असेच पाच पिंड होते ... पुराणवस्तु संग्रहालय संस्थेच्या लोकांनी काही वर्ष पुर्वी अख्खा खडक काढून नेला असे बाबाजींनी सांगितले . बिजलगाव , पीपलनेरीया ओलांडून पुढे छिपानेर गावांत .. रस्त्यातच मोठा प्रशस्त मंडप .. पंचकुंडी विष्णुयाग व श्रीमद्भागवत कथा आजपासुन सुरवात झालेली होती .. दर्शन घेतले , गावकरी समाप्ती पर्यंत इथेच राहण्यास आग्रह करीत होते त्यांना विनयपूर्वक नकार देत बालभोग घेतला . येथे नाशिकचे श्री प्रकाश गोविंद मटकर 9260004610 हे भेटले त्यांना नासिकला भेटण्याचे आश्वासन देऊन पुढे निघालो , सातदेव नावाचे गांव मधोमध एखाद्या जुन्या वाड्या सारखं श्रीराम मंदीर थोडे बसुन विश्रांती घेतली . एका माताराम यांनी जेवणाच ताट वाढून आणले , भुक नव्हतीच पण त्यांचा आदर म्हणुन अर्धी पोळी व भाजी हातावर घेवुन खाल्ली . पुढे निघालो नीलकंठ , सिलकंठ येथे दर्शन करून अंधार होता होता डिमावर येथे पंचनाथ महादेव मंदिरात ... , धुवुन आरतीपुजन केलं .. भोजन आटोपल्यानंतर सहपरिक्रमावासियान्बरौबर गप्पा ... आज खुपच प्रवास झाला होता पण त्रास अजिबात नाही ... झोप शांततेत ...
नर्मदेहर ( 71 )
प्रातःकाली उठुन टाकीवर जाऊन स्नानादी नित्यकर्म आवरुन आरती पुजन आटोपल्यानंतर चहा घेऊन बरोबर 7 :00 वाजता नर्मदेहर केलं , मैया काठाने , शेतातून , सडकेने असा चालु लागलो . मैलन मैल जिकडे नजर पडेल तिकडे फक्त गव्हाचे शेतं दिसत होते ... सीहोर हा जिल्हा MP चे गव्हाचे कोठार म्हटलं जातं , अधून मधून शेतात पाणी सोडलेले ... परिक्रमा वासींना रस्ता समजावा म्हणुन काही तरी खुणा करून ठेवलेल्या , चिखल आहे तेवढे अडचणीचे . बाकी चालण्यात आनंद वाटत होता , रेउगांव नर्मदा मंदीर थोडे बसुन विश्रांती , चहा घेऊन पुढील रस्ता सुरू .. मर्दानपुरा मागे टाकले आवलीघाटावर आलो .प्रशस्त मैया पात्र होडीने पात्रातून लोक ये जा करतात , मोठ्या जीप , मो.सा. होडीतून आणत होते मैयाच कौतुक . वर मंदिरात जाऊन पंचदेव महादेव दर्शन घेतले . इथे संस्कृत शाळा चालवली जाते , आनंद वाटला ... पलीकडेतीरावर पर्यटन केंद्र प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित केला जात आहे. एका टपरीवर कचोरी व चहा घेवुन पुढे मार्गस्थ झालो . एक गांव ओलांडून होलीपुरा इथं पोचलो ... हनुमान मंदिरात आसन लावलं हातपाय धुवुन आरती पुजन आटोपल . आणखी चार परिक्रमा वासी होते सर्वांनी मिळुन जेवण बनवले भोजणोत्तर विश्रांती ...
नर्मदेहर ( 72 )
प्रातःकाली अंधारात उठलो , आज थंडी खुप वाजली होती त्यामुळे शेकोटी शिवाय पर्याय नाही ... काटक्या गोळा करून पेटवली .हातपाय गरम करून घेतले स्नान न करताच ..चहा घेवुन नर्मदेहर केलं , बुधनी गांव ओलांडून गुलज़ारी घाट ... जर्रापुर गांव ..250 वर्ष जुनं श्री राम मंदीर सुंदर छोटासा घाट ... ठिकाण मनाला खुप भावलं , सॅक टेकवली घाट उतरून स्नान , आरती पुजन करून वर आलो पुजारीजी बाहेरच होते सदावर्त देतो म्हणाले ... वेळ घालवायचा नसल्या मुळे नको म्हणून नर्मदेहर केलं ... चाय ले लो महाराज. वो नावडी आ रहा है ...उस पार होडी से जाना , चक्कर बच जायेगा .... पुजारीजींनी माझी पुढची व्यवस्था करून दीली .... चहा घेवुन पुढे निघालो . मैयाला मिळणारी गदरीया नदी ओलांडून जाण्यास होडी मिळाली होती .... समोरच पैलतीरावर हौशंगाबादचा प्रसिध्द शेठानि घाट स्पष्ट दिसत होता ...बांद्राभान मधे दोन पेरू घेतले , चालता चालता सम्पवुन टाकले .. चिचली गांव ओलांडून सुहानीया मधे सीध्दीविनायक आश्रमात चहासाठि बोलावलं थोडे बसलो , स्वामी तरुणच होते , सर्व आश्रमाचा पसारा दोघे सांभाळत होते , स्वतः चहा करून दिला ... आज रुक जाओ यहीं .. हात जोडुन ..आगे जाता हूँ अस म्हटल ... महाराष्ट्रसे हो क्या ...? ...आगे सरदारनगर आयेगा .. केशवजी महाराज है वहाँ ... सीध्दीविनायकसे आया ..कहे देना ... व्यवस्था हो जायेगी . नर्मदेहर करून पुढे निघालो , अंधार होता होता सरदारनगर .. आश्रम मैया किनाऱ्याजवळच प्रशस्त मोठ बांधकाम , श्री राम सीता मंदीरच ... आसन लावलं नांव नोंदवून केशवजी महाराज यांची चौकशी केली ... बाहेरगांवी गेल्याचं समजले ... हातपाय धुवुन आरती पुजन केलं ... भाजी पोळी जेवण करून विश्रांती ...
नर्मदेहर ( 73 )
सकाळी उठुन स्नानादी नित्यकर्म ,आरती पुजन केलं , भन्डारीजीनी चहाची कॅन भरून ठेवली होती ग्लास भर चहा मैयाचे काठावर बसुन घेतला . केशवजी महाराज रात्री उशीरा आले होते . जाऊन नर्मदेहर केलं थोडे बोलुन , त्यांना सिढ्दीविनायक आश्रमाच्या बाबाजीनी सांगितले हसुन म्हणाले , माझे गुरुबंधु आहेत ते ... नर्मदेहर करून पुढील मार्गास लागलो , मैयाचे काठाने पुढे 3-4 km ...म.प्र. चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे गांव ' जत ' मधे पोचलो येणाऱ्या नर्मदामैया जन्मौस्तवाची तयारी चालु होती स्वतः मुख्यमंत्री येणार आहेत म्हणुन उत्साह ... चहा घेवुन पुढे .. मैयाचे काठाने गव्हाची शेतं , काही ठिकाण गव्हाला पाणी सोडलेले असेल तर ... मैया रक्षणच करते , भारकच्छ याठिकाणी थोडा फलाहार केला सायंकाळी अंधार होता होता बगलवाडा येथे पोचलो 7-8 जण आधीच पोचले होते हातपाय धुवुन आरती पुजन आटोपल ...लगेचच विश्रांती ..
नर्मदेहर ( 74 )
प्रातःकाली उठुन स्नानादी नित्यकर्म आरती पुजन आटोपून 7:00 ला नर्मदेहर केलं मैया काठाने निघालो , सतरावन गावात चहा ... एका मागोमाग तीन ठिकाणी .. थोडा थोडा ... ही मध्यप्रदेशमधील मंडळी रुबाबात बोलतात , शेवटी ..लेना पड़ेगा ... विषय संपला . पुढे निघालो मैयाचे वाळवंट प्रशस्त मधुनच डगर , घाट चढुन वर जावे लागायचे परत यायच . परिक्रमा वासी दिसल्या बरोबर बरेच जण स्वतःहूनच पुढचा रस्ता सांगतात , पण हा रस्ता म्हणजे शेतातील पाऊल वाटा . जिथं रस्ता सांगायला कुणी नाही तिथे पाच सहा (कधीकधी जास्तही) पाऊलवाटा त्यातुन परिक्रमा वाट निवड्ने ...चुकली तर बऱ्याच वेळा माघारी परत यावे लागते , खुप वेळा चुकलो कुणीतरी सांगतच बाबाजी ..इधरसे .. 4-5 km वरील एक गांव ओलांडून मांगरोल मधे रेवा मंदीर आश्रमात पोचलो भोजनतयार होण्यास एक दीड तास लागणार होता ...स्वतःचा निर्णय घेतला शुगरची गोळी आज पासुन बंद करायची ... कारण .... ... कमी झाल्याचे जाणवत होते , चहा बराच होतो परंतु चालणेही खुप होतय , बऱ्याच वेळा दुपारच जेवण मिळवण्यासाठी वेळ लागतो किंवा 3-4 km जास्तच चालाव लागतं .... बिस्किटपुडा .. मैयाच पाणी ..पुढे चालु लागलो . एक गांव ओलांडल . एका ओट्यावर सोंगट्यांचा डाव रंगलेला होता . बालपणी खुप आवडायच , केतुधाम इथं राधाकॄष्ण मंदिरात . खाली घाटावर जाऊन मैयाला नमस्कार करून हातपाय धुवून सायंपुजन केलं .. आणखी दोघं परिक्रमावासी होते खिचडीप्रसादी भोजन करून नीद्राधीन झालो ...
नर्मदेहर ( 75 )
प्रातःकाली उठुन आश्रमा बाहेर आलो थंडीच प्रमाण वाढल्यामुळे शेकोट्या पेट्ल्या होत्या जाऊन हातपाय शेकून थोडा गरम झालो . पुन्हा थंड पाण्याने आंघोळ , आरती पुजन करून चहाचा ग्लास घेऊन परत शेकोटी ... 7:30 ला नर्मदेहर करून मार्गास लागलो . नरेहरा गांव ..मौनीबाई का आश्रम .. चालताचालता दुरुनच नर्मदेहर .. केलं , मैयाची वाळू पार करत पुढे चालु लागलो मैया काठावरील जुनी मंदीर शक्य तेवढे बघायला उत्सुकता होती ..बऱ्याच वेळा निराशा हाती येई ..कारण धडपड करीत चढण चढून मंदिरात जावे ... आणी तिथली अनास्था पाहुन मन विशण्ण होई ... जिथे उत्पन्नाची शाश्वती ...तिथेच ..सेवा ,पूजा अर्चा चालते ... चांगली ऐतिहासीक ठिकाणं ... जनावरांचे व कुत्र्यांच आश्रयस्थान झालेले . केलकच घाटावर बसुन विश्राम केला ... पुढे निघालो अनघोरा गांव येथे ..जनकेश्वर महादेव ..प्रभु श्री रामांचे स्वशूर, जानकी माईचे वडील जनकराजा यांची तपोभूमी .. दर्शन घेवुन पुढे निघालो .... बिस्कीटपुडा चालता चालता संपवला ..पाणी पिऊन थोडा थांबुन विश्राम केला . पाणी पिऊन पुढे चालु लागलो टेकड्या चढ़ उतार ..मधुनच रस्ता ..करत करत .. शुक्लपुर इथे पोचलो , सुंदर घाट . मैयाचे जन्मोत्सव तयारी चालु होती , गावोगावी श्रीमद्भागवत सप्ताह , नर्मदापुराण ई .कार्यक्रम चालु ... गावांत शिरताच एखादा कार्यकर्ता घाईत असल्या सारखा येतो ... .चलो बाबाजी .. भोजन , चाय .. कुछ तो पां लीजिये .. आश्रमात जाऊन आसन लावल घाटावर हातपाय धुवुन आरतीपुजन आटोपल . आज भाऊ संजय व सुनील दोघांचेही फ़ोन आले , खुप बर वाटलं ..... भोजन करून विश्रांती ...
नर्मदेहर ( 76 )
प्रातःकाली अंधारातच उठुन स्नानादी नित्यकर्म , आरती पुजन आटोपल बाहेर येवुन शुक्लेश्वर महादेवाचे दर्शन घेतले . 7:00 वाजता चहा घेवुन नर्मदेहर केलं आज राजस्थानी परिक्रमावासी सोबत होते , 45-50 वयाचे दोघं मित्र , दोघेही अत्यंत बोलघेवडे अखंड बोलत होते परिक्रमेत घडलेल्या घटना आलेले अनुभव रंगवून सांगत होते . हीरापुर या गांवी पोचलो राजेश्वरी मातेच सुंदर मंदीर , क्षणभर कर्नाटकमधील बेलूर येथील केशवराज स्वामी मंदिराचीच आठवण आली .. थांबुन वेळ घालवन्याची ईच्छा ..तशीच मनात ठेवून पुढे निघालो .... रस्ता म्हणजे आडव्या तिडव्या पाऊलवाटा आजुबाजुच गवत वाळू लागले होते , धोतराला काटे लटकायला लागले होते , टेकड्या टेकड्या ओलांडत होतो ... रस्ता चुकायची भीती वाटतंच नाही .... चुकुन थोडे इकडेतिकडे गेलात तर ... महाराजजी ... इधरसे ...नही ..उधरसे ... अशी हाक येतेच ....करोउन्दी गावांत थोडे बसुन चहा घेवुन परत पुढे ..बेलथरी गांव प्रवेश करताच दोन तीन कार्यकर्त्यांनी ... चलो बाबाजी भोजन पां लो नर्मदापुराण चालू होते ... उद्या नर्मदा जयंती प्रत्येक गावातुन जात असता घाट सजलेले दिसतात ... त्या निमीत्त अन्नदान , भंडारा ..हे ठिकाण नर्मदा मैयाच्या इतिहासात महत्वाचे .. श्रीविष्णूंच्या वामन अवतार ... कालखंडात येथे बळीराजाने यज्ञ केला होता... जेवण केलं ,दोघं राजस्थानी येथेच थांबले , दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ झालो . झीरी व चावरपाटा ही दोन गांव ओलांडून ..बरमानघाट ..श्री ब्रम्हदेवाची तपोभूमी ...परिक्रमा मार्गातील महत्वाचे ठिकाणं .. हज़ारों वर्षांचा इतिहास . मैयाचे किनाऱ्यावर आता यात्रा (मेला) सुरू आहे. त्यामुळे येथे खूपच गर्दी आहे ... श्रीराम मंदिरात आसन लावलं हातपाय धुवुन आरती पुजन केलं खिचडीप्रसाद भोजन करून विश्रांती ...
नर्मदेहर ( 77 )
प्रातःकाली अंधारात उठुन ब्रम्हकुंडामध्ये स्नान , तिथेच आरती पुजन करून बाजूच्या होटेल मधे चहा घेतला थंडी मस्तच होती , त्यामुळे गर्दी नव्हतीच यात्रा ...झोपेतून उठत होती ... वर श्री राम मंदिरात आलो . परत एकदा चहा घेवुन 6:30 ला नर्मदेहर करून मार्गस्थ झालो .... रस्ता विचारत विचारत बाहेर पडलो छोट्या सड्केने चालत राहीलो .. सतधारा मागे टाकले ...एक छोटस गांव ... एका घरातुन .. नर्मदेहर .. बाबाजी .....चाय लेके जाओ.. समोरच एका पड़वीमधे दोनतीन खुर्च्या .. बसलो , पाणी घेऊन एक ग्रहस्थ आले पाणी पिऊन चहा होई पर्यंत चौकशी ...विचारपूस चालु ... तेवढ्यात एक तरुण परिक्रमा वासी पोचले , त्यांनी चहा घेत नाही म्हणून फक्त पाणी पिऊन ..मै आगे चलता ..म्हणुन नर्मदेहर केलं . मी ही चहा घेऊन निघालो गावाबाहेर जवळच एका वीट भट्टी वर चारपाच माताराम समोर आल्या , महाराजजी ... वो रस्तेसे मत जाओ.. वो जंगल रस्ता फॉरेस्टवालोने अब बंद कर दिया ... आप ये रस्तेसे जायीए .. आगे कुंडी गांव से मैया किनारेसे जाना .. वो आगे एक महाराज गये ..उन्हे भी बोला ...लेकीन उन्होने नही सुना वो यही रास्तेसे गये .. अब उन्हे वापिस आना पड़ेगा ... ठीक है ..म्हणुन त्यांनी दाखवलेल्या रस्त्याने निघालो ... आज नर्मदाजयंती आज कोणत्या गावात जेवण मिळेल ? कारण समोर जंगल .. कुंडी गावातुन पुढे निघालो मैयाचे किनाऱ्याने खडकाळ किनारा समोर एक दीड km वर छोटा धूवाधार दिसत होता ...मैयाचे किनाऱ्यापासून चालतोय ..आणी समोर पाणी.. मैया चे पाणी दोन टेकडयामधून अर्धाkm गेलेले ...रस्त्यांच निरीक्षण केलं अवघड डगर होती ...जवळपास 500-600 फुट अंतर तोल सांभाळून ओलांडून जाणे टाळावे अस वाटुन एक पाऊलवाट वर जंगलात जात होती त्या वाटेने जाऊन जेथून पाणी नसेल अशी जागा बघुन तेथुन पलीकडे जावे अस ठरवून जंगलात शिरलो .. तीन पर्याय स्वतःसमोर ठेवले ... जंगलातुन रस्ता नसेल तर .. डगरी वरुन जायचा प्रयत्न करायचा ..नाहीच जमले हिम्मत झालीच नाही तर दुपारचे दोन वाजे पर्यंत कोणी तरी यायची वाट पहायची ... नाहीच कुणी आलं ..तर..मैयाची क्षमा मागून पाण्यातून पलीकडे जायचे.. दोन तीन km गेलो उतरायला रस्ता नाहीच ..किर्र ..शांत जंगल ..पाचोळा तुडवल्याचा माझाच आवाज मला येत होता ..परत फिरलो ... मैयाचे काठावर आलो .. अजूनही आजुबाजुला कोणीच नाही . समोर पाणी गुडघ्याइतकेच ..पण ओलांडूनजायचेनाही .. कमंडलू रिकामा करून सॅकमधे टाकले व नर्मदेहर गर्जना करून डगर चढु लागलो ... पाठिवरिल सॅक सांभाळत काठीचे आधाराने तोल सांभाळत ... पडलो तर जखमी होणे , हातपाय मोडला जागेवरुन हलता आले नाही तर? दिवसभर मदत मिळाली नाही तर.. रात्री जंगली श्वापदे ... नर्मदेहर ..तिच्या वरील विश्वासानेच मी एकट्याने चालायचे ठरवले आणी आता मनात शंका.. मीच माझा धिक्कार करून नर्मदेहर.. पुढे पाय टाकला .. अखेर पाऊण तास लागला पण ... मी जिंकलो होतो ... पुढे छोटा धूवाधार धबधबा ....पाणी कमी असल्यामुळे . केवीलवानाच दिसत होता मैयाचे पात्रात एक होडी दिसत होती .. भुक लागली होती आज जवळ काहीच नव्हतं ... खडकावर बसुन विसावलो ... कानाजवळच आवाज ...बाबाजी ..खाना खाते क्या ... सकाळी जंगलातुन गेलेला तरुण विचारत होता .. मैया ... (.. नाना बरोबर असताना मी स्वतःला मैयाच लाडके लेकरु आहे ..अचानक आठवले ...) दोन दिवसापुर्वी त्याचे घरचे भेटायला आले होते त्यांनी घरून आणलेले जेवण एक लाडू , फरसाण तीन पोळ्या माझ्या समोर ठेवल्या ..तो स्नान , आरती , जेवण करून माझी वाट पहात होता , मला जंगलात भटकताना तो बघत होता ... तो कुंपनाच्या तारा डगडाने तोडुन आत आला राजू गुर्जर नांव त्याचे ... मला जेवायला देवून पठ्या मै .. चलता हूँ आगे इस झाड के पीछे ऊपर बिजली के खंबे से आगे रोड लगेगा ..अस सांगुन गेला ..निघुन ..जेवण करून निघालो पहाड़ चढत गेलो ...उतरलो गूरसी गांव नर्मदामंदीर .. बाजूला लालबाबांचा आश्रम .. बाबाजीना नर्मदेहर करून बसलो , एका भक्ताने चहा केला चहा घेतला .. खुप चिमण्या दाणे टिपित होत्या मी VDO शूट केला बाबाजीनी मला जवळ बोलावलं ते खुर्चीत ..मला ख़ाली जवळच ....बैठो... आणी वाकुन माझा ....गळा धरला ....आज यहीं रुक जाओ ... और मुझे ये मोबाईल ..सीखाओ ....आणी हसु लागले ... चुटकुले बड़े अच्छे आते है ..इसपर ... चलता हूँ अस म्हणालो ... थैलीतून पेढे असलेली पुडा काढून हातांत दिला रखले थैलेमे . .. पुढे चालुलागलो ..रामपूरा मधे भागवत सप्ताह समाप्ती ... दर्शन करून पुढे... केरापानी व पीथरा ओलांडून डोंगरगांव मधे ... आश्रमात आसन लावल व नर्मदा जयंती उत्सव बघुन भोजन व विश्रांती.
नर्मदेहर ( 78 )
प्रातःकाली उठलो , स्नानादी नित्यकर्म , आरती पुजन आवरुन चहा घेवुन नर्मदेहर केलं .. मार्गस्थ झालो ... मागील 7-8 दिवसांपासुन नर्मदाजयंती निमित्त प्रत्येक गावांत कीती उत्साही वातावरण ..लोक सगळे जात पात मतभेद , कामधाम , गरीब ,श्रीमंत सगळं विसरून नर्मदामैया प्रती ..प्रेम ,आदर , कृतज्ञता .. व्यक्त होत असते आपल्याकडे जशी गणेशमंडळ असतात , ( सांगली जवळच ..बत्तीसशिराळा येथे नागपंचमी बघण्यासाठी गेलो असता तेथे .. नाग मंडळ ..होते व DJ लावुन नाग मिरवणूक चालते) इकडे तसं नाही दिसल सगळ्या गावाची मैया ..सर्वजण एकत्रच ..छोटयाशा गावातील सर्व मुलींची मिरवणूक ,त्यांची पुजा , त्यांच्यासाठी कढ़ाईचा नैवेद्य , त्यांना नमस्कार करून दक्षिणा देणे ... कीती छान.. लहान मोठे, सर्व भक्तीभावाने मैया समोर येतात .. बेलखेड गावांत थोडे थांबुन चहा घेवुन पुढे... दुपारी दोनचे सुमारास एका मंदिरात थांबलो .. काल समाप्ती झाली होती बाबाजीनी दोन ओंजळीभरून बूंदी दिली ..पुढे निघालो .. दोन गावं ओलांडून ...सर्राघाट ..आश्रमात आसन लावल हातपाय धुवुन आरती पुजन आटोपून भोजन व विश्रांती.
नर्मदेहर ( 79 )
सकाळी उठुन त्रिवेणी संगमावर जाऊन स्नान , ( या ठिकाणी गंगा व यमुना या मैयास भेटण्यास आल्या अशी मान्यता आहे ) आरती पुजन आटोपल्यानंतर नीत्याप्रमाने शेकोटी... थोडे शेकत बसलो , चहा घेवुन .. 7:00 ला ..नर्मदेहर केलं आज नांदेडकर ( मांडवगड मधे भेट झाली होती ) त्यांची भेट झाली ... चौघांपैकी तीघेच बरोबर होते एकास त्रास झाल्यामुळे परत जावे लागले .. मैयाची मर्ज़ी ... एका छोट्या गावातुन जातांना शाळेत कार्यक्रम चालु होते .... लक्षात आले आज 26 जानेवारी .. प्रजासत्ताक दिन ..सगळं काही आपल्या महाराष्ट्रासारखाच .... पण टेबलवरील फोटो पाहुन ... आनंदासह .. आश्चर्यच वाटलं .... चक्क सरस्वती देवी ... सकल विद्येची देवता ... आमच्या पुरोगामी महाराष्ट्रात .... विषय काढला तरी .. जगबुडी .. पुढे निघालो .. एका शेतातून आवाज .. महाराजजी .. एक तरनाबांड पैलवान बसलो .. मोटार चालु होती मस्त पाणी पीलो .. त्याने मक्याची कणसं काढुन आणली , काट्क्या होत्याच ..काही सोलून काही न सोलताच .. व्वा .. मैया .. दोन तिथे बसुनच सम्पवली तिसर् खात खात ..नर्मदेहर करून पुढे .. किनाराखडकाळ , काटेरीझाड़ी .. एका ठिकाणी उतरत असता धोतर अडकून फाटले .. पडलो नाही हीच मैयाची क्रुपा .. मद्रासी पध्दतीने वर गुंडाळून पुढे .. एका आश्रमात चौकशी केली ... भेडाघाटला परिक्रमावासी जात नाहीत . त्या॑नी रस्ता दाखवला बऱ्याच उशीरा नर्मदेश्वर महादेव मंदिरात पोचलो आसन लावल हातपाय धुवुन आरती पुजन केलं , भोजन , थोड्या गप्पा व विश्रांती ..
नर्मदेहर ( 80 )
पहाटे उठुन स्नानादी नित्यकर्म आटोपून आरती पूजा केली , चहा घेऊन त्रिपुरासुंदरी मातेच दर्शन घेतले , नर्मदेहर करून मार्गस्थ झालो ... रस्ता खडतर , दगड गोटे , काटेरी झुडपे शिताफीने चुकवत सलग चालणे हा एकमेव उद्देश .... नर्मदातटावरील सुंदर घाट , मंदिर , मैयावर प्रेम करणारे , श्रध्देने परिक्रमावासीन्ची सेवा करणारे आश्रमातील साधु , हे सगळंच विलक्षण आहे .. दररोज वेगळ्या ठिकाणी नवीनच लोकांचा सहवास .. आणी आम्ही परिक्रमावासी आता चांगले सरावलो होतो , सुरवातीस बुजरेपणा , थोड़ी भीती आता संपली होती .. कोणत्याही आश्रमात कशी का होईना पडायची व्यवस्था होते हे समजलं ... दुपारी जेवणं अगदी सहज आणी चालता चालता मिळाले तर घ्यायचे , वेळ आणी श्रम वाचवायलाच हवे ... ग्वारीघाटावर एका आश्रमात द्रोण भरून प्रसादशिरा मिळाला ,पाणीपिऊन पुढे ..गौरसंगम हनुमान मंदीर थोडे बसुन चहा घेतला व पुढे निघालो बरेला मागे टाकून रीछाई मधे एका माताराम यांनी आवाज दिला .. पपई चिरून आणली .. छान व गोड होती .. नर्मदेहर करून पुढे ...चौराहा नर्मदा मंदिरात आसन लावलं . हातपाय धुवुन आरतीपूजन केलं .सदावर्त मिळाले तीघजण होतो भाजी नव्हती तिखटमीठ , गूळ ... छान जेवण करून विश्रांती..
नर्मदेहर ( 81 )
प्रातःकाली उठुन घाटावर जाऊन जाऊन स्नान ,आरती पुजन केलं वर आश्रमात येवुन चहाची वाट पहात थांबलो होतो बाबाजीनी चहा दिला ... नर्मदेहर करून निघालो , डांबरी सड़क रस्ता आजुबाजुला झाड़ी मधेच छोटसं गांव ... गावं बहुतेक उंचावर झाड़ीत ... दुरुन हिरव्या बेटा सारखे दिसतात . दोन गांव ओलांडून . निवास नावाचे गावांत थांबून बिस्किटपुडा व केळी घेतली .. रस्त्याने चालताचालता संपवले .पाणी पिऊन परत पुढे .. खाकीबाबा आश्रम .. मही पीओगे ... द्या .. दोन ग्लास ताक पिऊन पुढे बीचीया गावांत धर्मशाळेत आसनलावलं जास्तच थकलो होतो .. हातपाय धुवुन आरती पुजन केलं खिचडी प्रसाद भोजन करून विश्रांती.
नर्मदेहर ( 82 )
प्रातःकाली उठुन स्नानादी प्रातःकर्म आटोपून आरती पुजन केलं , चहासाठी थोडा अवकाश होता बाबाजी बरोबर बोलत बसलो , बाबाजी मूळचे UP मधील चार धाम , जोतिर्लिंग यात्रा झाल्यावर नर्मदा परिक्रमा करण्यास आले ... ते इकडेच राहीले .लहानपणीच कुटुंबाचा त्याग करून सन्यास स्वीकारला असल्यामुळे कुठेही राहिले तरी ... सारखेच .. बाबाजी सांगत होते ... अभी दो चार दिनो मे अमरकन्टक पहुंच जाओगे .. आगे महाशीवरात्री आयेगी , उसी दीन जल अर्पण कराके शिवजी का दर्शन करनेसे तीन ..परिक्रमा का फल मिलता है .... चहा घेवुन नर्मदेहर . . रस्त्यास लागलो ... सड़क , पाऊलवाटा , ओढ़ेनाले , चढ़ उतार सोबत ..नर्मदेहर सुरू असतंच दोन तीन गावं ओलांडून शाहापूर गावांत एका दुकानातून आवाज ..बाबाजी ... चाय .. चटाईवर बसलो ,समोरच मोठा तराजूकाटा होता ... बसल्याबसल्याच सॅक तराजूत ठेवली .... उडालोच चक्क सहा किलो कमी ... घरातुन निघताना 14kg 200 gr ..आता आठ kg ..शबनम सुध्दा अर्धा किलो कमी ... अनावश्यक सामान कमी झाल्यामुळे बर वाटलं चहा घेवुन निघालो . गावाबाहेर पडलो एक मोठा नाला ओलांडून पाऊल वाटेने , कच्च्या रस्त्याने निघालो दोन अडीच तास चालत होतो कुणी भेटतही नव्हतं ... खुरटी झाड़ी ,दगडगोटे मधुनच एखादी डगर ... आणी एका झाड़ाजवळ एक जण बसलेला दिसला , गांव कुणीकडे आहे विचारले ... त्याने इशारा केला त्या बाजूने निघालो ... दोन km वर एका गावांत ... एका घरातुन चहा मिळाला .. चार पाच जण जमले होते ... आणी मी रस्ता चुकलो होतो ..अस त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले .. पुढे कस जायचं यांवर त्यांच्यातच चर्चा... मी बाजूला ..मख्खपणे बसलेलो .. शेवटी ...बाबाजी आज यहाँ मुकाम करो ..सुबह चले जाना ... शाळेची खोली उघडून दिली... समोरच हॅण्डपंप होता ... हात पाय धुवुन आरतीपुजन केलं शाळेत लाईट नव्हते .. एका ग्रहस्थानी जेवणासाठी घरी घेवुन गेले .. परत येवुन अंधारातच झोपी गेलो.
नर्मदेहर ( 83 )
सकाळी लवकरच उठलो शाळेत लाईट नसल्यामुळे रात्री रूम मधे उंदीर .. बहुतेक मुलांच्या भोजनसाहित्य असावं , त्यामुळे रात्री उशीरा आत झोपन्याची भीती वाटली बाहेर येवुन लाकडे काट्क्या जमा करून शेकोटी पेटवून बाहेरच झोपलो पहाटे थंडीमुळे शेकोटी हाच उपाय ...हॅण्डपंपावर स्नान करून आरती पुजन केलं .. सकाळीच 7:00 ला शाळा सुरू होण्याचे आत शेकोटीवर चहा बनवला ग्लासभर मस्त गरम.. मुले जमा होऊ लागले होते , रुमला कडी लावून निघालो ..रात्री ज्यांचे घरी जेवण केलं त्यांचे दार वाजवले ... मोहनलाल बाहेर आले ... परत कालच्या प्रमाणे 3-4 जण जमवले ... मी आमथेडा पासुन 18 ते 20 km बाजूला निघुन आलो होतो , मार्गदर्शक पुस्तक काढले एक एक गांव विचारले .. 15-16 km वर विक्रमपूरला जाण्यास निघालो नलसींग भाटु नावाचे आजोबा व सोनू हा त्यांचा 10-12 वर्षाचा नातू तिकडं खदानीवर जाणार होते तेच मला रस्ता दाखवतो म्हणाले ... चालु लागलो सोनू बरोबर गप्पा मारणे ... गम्मत वाटत होती भाषा एकमेकास समजत नव्हतीच .. त्यांच शेत आल्यावर आजोबा थांबले .. सोनू पुढे दोन तीन km रस्ता दाखवण्यास आला . .पुढे दोन तीन छोटी गांव लागतील तिथे पुढचे विचारून घेईल अस सोनुला सांगून त्याला परत पाठवले .... व मी पुढेचालु लागलो . सतपूर व मुन्ढा ही गांव ओलांडून एका झाडाखाली बसुन शेंगदाणे व गुळ बालभोग घेऊन पाणी पिऊन पुढे चालत होतो ... साधारण चार साडेचारचे सुमारास विक्रमपूर गाठले चहा घेऊन पुढे निघालो ..अंधार होण्याचे आत नूनखान गावांत धर्मशाळामधे आसन लावल , हातपाय धुवुन आरती पुजन करून ... भोजन चौकशी .. एका घरून सदावर्त मिळाले , बटाटेभाजी व ठिक्कर बनवले भोजन करून विश्रांती ...
नर्मदेहर ( 84 )
प्रातःकाली 6:00 ला उठुन सॅक उचलली , धर्मशाळेत पाण्याची ब्यवस्था नाही बघु पुढे म्हणुन रस्त्यास लागलो , दुकाने उघडली नव्हतीच त्यामुळे ... .. पुढे शाहापूर मधे चहा पूर करून 10 - 10:30 चे आसपास जोगीटेकडीयाला पोचलो .. छान घाट , छोटसं मैयाच पात्रं मन प्रसन्न झाले . सॅक टेकवली , स्नानास उतरलो मनसौक्त पाणी पिऊन स्नान ,आरती पुजन केलं ... टपरीवर चहा घेऊन पुढे निघालो दोन तीन डगर चढ़उतर करून लंबेनारायण गुंफा हे पुरातन ठिकाणी दर्शन घेऊन बाबाजीनी चहा दिला , पुढे निघालो .. देवरा गावांत मैयाचे काठावर सुंदर दुमजली नर्मदा मंदीर ... पलीकडेतीरावर डिन्डोरी शहर खुप छान ...आज पौर्णिमा खग्रास चंद्रग्रहण परिक्रमा वासियांमधे आज रात्री ग्रहणानंतर कोणत्या ठिकाणी थांबायचे याची विचार विनिमय होत होता सदावर्त मिळाले , वेध लागण्याचे आधी स्वयंपाक करून भोजन केलं पुढे निघालो रामघाट ओलांडून शेषघाटावर पोचता पोहचता चांगला अंधार झाला होता , ग्रहण स्पर्श झालेला होता ..आसन लावलं बसुन राहीलो आणखी 5-6 परिक्रमावासी होते , हळु हळु गर्दी वाढू लागली होती आजुबाजुच्या गावातील मंडळी स्नानास येत होती , मैयाचे पात्रात उभे राहुन तीन साधु पुरश्चरण करत होते , खग्रास चंद्रग्रहण पर्वावर नर्मदा स्नानाचा योग आला होता . साडेनऊचे सुमारास स्नानास झुंबड उडाली साधुंची मंत्रोच्चारणं तीव्रऊच्चारात होऊ लागले आणखीही साधु ,पंडीत आलेले होते ... एक मोठ्याने जयजयकार होऊन थांबले ...... क्षणभर एक रिक्त शांतता .... स्नान आटोपलं ..कडाडून थंडी ... वेगळा अनुभव .. एका दिव्य अनुभवातून गेलो ... .. आरती पुजन करून चहा घेवुन .... शेकोटीचे आश्रयाला गेलो ....
नर्मदेहर ( 85 )
प्रातःकाली उठलो मैयावर जाऊन स्नानादी प्रातर्विधी , आरती पुजन आटोपून आश्रमात आलो , ग्लास घेवुन चहासाठी गेलो , दोन परिक्रमावासी चहा घेत होते त्यांच्यात सामील झालो . MP चे परिक्रमावासी होते . एक जण थकलेला होता , त्याला आरामाची गरज होती ... 7:30 ला चहा घेऊन नर्मदेहर केलं पुढे चालायला सुरवात केली ... चढ़ उतार करत एका ठिकाणी चांगलाच ठोकरलो .. पडलो नाही हेच नशीब , पण चपले वर निभावल होत .. ( नर्मदापरिक्रमा करत असता आजुबाजुला कोणी नाही अस पाहुन .. माझ्याच सुरेल आवाजात गाणं म्हणायचा छंद पुर्ण करून घेत होतो ) बराच वेळ चालत होतो चंदनघाट मागे टाकला .. एका गाडीवरुन फळं घेतली झाडाखाली बसुन बालभोग घेऊन पुढे निघालो शिवालाघाटा पासुन सड़केने तासंतास चालत होतो ,आता चालण्याचे काहीच वाटत नव्हते देवरी गावांत चहा झाला येथे नांदेडकर परिक्रमा वासी भेटले , बरोबरच पुढे निघालो दमखेडी गावांत आश्रमात आसन लावलं , हातपाय धुवुन आरती पुजन केलं चुल पेटवून खिचडी प्रसादी भोजन बनवले , सर्वांनी जेवण आटोपून काही वेळ बोलत बसलो , अनुभवान्ची उजळणी झाली ...शेकोटी भोवतीच आडवे झालो ...